शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

काही लोक फुकटचे श्रेय घेत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

कोपर्डे हवेली : ‘सरपंच परिषद, पुणे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अखेर गावातील पथदिवे जोडण्याचा निर्णय राज्य ...

कोपर्डे हवेली : ‘सरपंच परिषद, पुणे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अखेर गावातील पथदिवे जोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला; पण काही लोक फुकटचे श्रेय घेत आहेत,’ अशी टीका सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष शंकरराव खापे यांनी केली.

सरपंच परिषदेने गावातील पथदिवे सुरू करणे किती आवश्यक आहे, यासाठी निवेदने, वेळोवेळी राज्य सरकारचे मंत्री यांची भेट घेणे या संदर्भाने सतत पाठपुरावा केला होता. यामध्ये मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. मंत्री हसन मुश्रीफ, नितीन राऊत यांना भेटून यातून मार्ग काढण्याची विनंती केली. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना सरपंच परिषदेचे पदाधिकारी भेटले. यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सांगलीचे जयंत पाटील, बीडचे धनंजय मुंडे, जालनाचे राजेश टोपे, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली. दि. १५ रोजी बैठक घेण्याचे ठरवले; परंतु काही कारणास्तव ती बैठक मंगळवार, दि. २० रोजी झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून सरपंच परिषदेचे पदाधिकारी अध्यक्ष जितेंद्र भोसले, शंकरराव खापे, ज्ञानेश्वर वायाळ, मंदाकिनी सावंत, कोहिनूर सय्यद, भाऊसाहेब भराटे, सुजित हंगरेकर, अमरनाथ गित्ते, सुशील तौर, भद्रिनाथ चिंदे, संदीप देशमुख, प्रदीप झांबरे यांनी परिश्रम घेतले आणि गावातील पथदिव्यांचा निर्णय झाला; पण कोणीतरी न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहे. कंदील घेऊन लाईट लागत नसते. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागतो. हे आंदोलन सरपंचांनी करायचे नसून, सरकारबरोबर राहून काम करायचे असते. याविषयी निर्णय झाल्यानंतर मागणीचे निवेदन देणे म्हणजे वरातीमागून घोडे, असा प्रसिद्धीसाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.