शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

काही लोक फुकटचे श्रेय घेत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

कोपर्डे हवेली : ‘सरपंच परिषद, पुणे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अखेर गावातील पथदिवे जोडण्याचा निर्णय राज्य ...

कोपर्डे हवेली : ‘सरपंच परिषद, पुणे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अखेर गावातील पथदिवे जोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला; पण काही लोक फुकटचे श्रेय घेत आहेत,’ अशी टीका सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष शंकरराव खापे यांनी केली.

सरपंच परिषदेने गावातील पथदिवे सुरू करणे किती आवश्यक आहे, यासाठी निवेदने, वेळोवेळी राज्य सरकारचे मंत्री यांची भेट घेणे या संदर्भाने सतत पाठपुरावा केला होता. यामध्ये मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. मंत्री हसन मुश्रीफ, नितीन राऊत यांना भेटून यातून मार्ग काढण्याची विनंती केली. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना सरपंच परिषदेचे पदाधिकारी भेटले. यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सांगलीचे जयंत पाटील, बीडचे धनंजय मुंडे, जालनाचे राजेश टोपे, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली. दि. १५ रोजी बैठक घेण्याचे ठरवले; परंतु काही कारणास्तव ती बैठक मंगळवार, दि. २० रोजी झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून सरपंच परिषदेचे पदाधिकारी अध्यक्ष जितेंद्र भोसले, शंकरराव खापे, ज्ञानेश्वर वायाळ, मंदाकिनी सावंत, कोहिनूर सय्यद, भाऊसाहेब भराटे, सुजित हंगरेकर, अमरनाथ गित्ते, सुशील तौर, भद्रिनाथ चिंदे, संदीप देशमुख, प्रदीप झांबरे यांनी परिश्रम घेतले आणि गावातील पथदिव्यांचा निर्णय झाला; पण कोणीतरी न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहे. कंदील घेऊन लाईट लागत नसते. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागतो. हे आंदोलन सरपंचांनी करायचे नसून, सरकारबरोबर राहून काम करायचे असते. याविषयी निर्णय झाल्यानंतर मागणीचे निवेदन देणे म्हणजे वरातीमागून घोडे, असा प्रसिद्धीसाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.