शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

काही लोक फुकटचे श्रेय घेत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

कोपर्डे हवेली : ‘सरपंच परिषद, पुणे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अखेर गावातील पथदिवे जोडण्याचा निर्णय राज्य ...

कोपर्डे हवेली : ‘सरपंच परिषद, पुणे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अखेर गावातील पथदिवे जोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला; पण काही लोक फुकटचे श्रेय घेत आहेत,’ अशी टीका सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष शंकरराव खापे यांनी केली.

सरपंच परिषदेने गावातील पथदिवे सुरू करणे किती आवश्यक आहे, यासाठी निवेदने, वेळोवेळी राज्य सरकारचे मंत्री यांची भेट घेणे या संदर्भाने सतत पाठपुरावा केला होता. यामध्ये मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. मंत्री हसन मुश्रीफ, नितीन राऊत यांना भेटून यातून मार्ग काढण्याची विनंती केली. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना सरपंच परिषदेचे पदाधिकारी भेटले. यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सांगलीचे जयंत पाटील, बीडचे धनंजय मुंडे, जालनाचे राजेश टोपे, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली. दि. १५ रोजी बैठक घेण्याचे ठरवले; परंतु काही कारणास्तव ती बैठक मंगळवार, दि. २० रोजी झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून सरपंच परिषदेचे पदाधिकारी अध्यक्ष जितेंद्र भोसले, शंकरराव खापे, ज्ञानेश्वर वायाळ, मंदाकिनी सावंत, कोहिनूर सय्यद, भाऊसाहेब भराटे, सुजित हंगरेकर, अमरनाथ गित्ते, सुशील तौर, भद्रिनाथ चिंदे, संदीप देशमुख, प्रदीप झांबरे यांनी परिश्रम घेतले आणि गावातील पथदिव्यांचा निर्णय झाला; पण कोणीतरी न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहे. कंदील घेऊन लाईट लागत नसते. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागतो. हे आंदोलन सरपंचांनी करायचे नसून, सरकारबरोबर राहून काम करायचे असते. याविषयी निर्णय झाल्यानंतर मागणीचे निवेदन देणे म्हणजे वरातीमागून घोडे, असा प्रसिद्धीसाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.