शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कुणी विकतोय भाजी तर कुणी फळं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:40 IST

सातारा : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून गेल्यावर्षी मार्चपासून शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाडीवरील ...

सातारा : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून गेल्यावर्षी मार्चपासून शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाडीवरील चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा चारित्रार्थ चालविण्यासाठी कुणी बसमधून भाज्या, फळे विकतोय तर कुणी कारागीर बनून गाड्यांची दुरुस्ती करत आहे.

जगभर कोरोना गेल्या वर्षापासून थैमान घालत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणेच बदलून गेले आहे. साताऱ्यातील अनेकांकडे दोन-तीन स्कूल बस होत्या. त्यावर भावंडे, वडील, मुलगा चालवत होते. व्यवसाय चांगला चालत असल्याने दुसरी गाडी घेत होते. पण अशातच कोरोनाचा शिरकाव झाला अन् शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आले. साहजिकच मुले घरातच होती. त्यामुळे या व्यवसायावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली.

या गाड्या इतर कारणांसाठी प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवाना नसतो. त्यामुळे त्या दारात उभ्या आहेत. मात्र बॅँकांचे हप्ते थांबलेले नाहीत. बॅँक अधिकारी तगादा लावत असल्याने अनेकजण मिळेल ते काम करुन गुजराण करत आहेत. मात्र त्यांच्यासाठी शासनाने अद्याप कसलेही पॅकेज दिलेले नाही. त्यामुळे आता काय करायचे हा प्रश्न आहे.

१. युनूस मुल्ला, स्कूल बसचालक

रुग्णवाहिकेवर चालक

युनूस मुल्ला यांनी पुढे केलेल्या मदतीच्या हातामुळे डाॅ. युनूस शेख यांनी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून घेतले आहे. ते केवळ कोरोना रुग्णांची ने-आण करणे हे काम सध्या करत आहेत. अनेकदा कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला उचलण्याचेही ते काम करत आहेत.

२. संजय पिसाळ, विद्यार्थी वाहतूक संघटना

दुचाकी गाड्यांची दुुरुस्ती

घरात दोन गाड्या होत्या. त्या सव्वा वर्षांपासून दारात उभ्या आहेत. त्यामुळे संजय पिसाळ यांच्याकडे काहीच काम नाही. मात्र दुसऱ्या गाडीवर चालक म्हणून काम करत असलेला भाऊ दुचाकी गाड्या दुरुस्त करण्याचे काम करत आहेत. त्यातून चरितार्थ भागवत आहेत.

३. भीमराव कांबळे, स्कूल बसचालक

मिळेल त्या गाडीवर चालक

कोरोनामुळे अकरा लाख रुपये कर्ज बाकी असतानाच गेल्यावर्षी सगळेच बंद झाले. रेशन भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून उपासमारीची वेळ आली. जगण्यासाठी काहीसतरी करावे म्हणून या काळात बदली ड्रायव्हर म्हणून मिळेल त्या गाडीवर जाऊन चार पैसे कमवून रेशनपाणी भरत आहेत.

४. प्रवीण भोसले, स्कूल बसचालक

कामच नसल्याने घरीच

साताऱ्यातील वेगवेगळ्या शाळेतून पन्नास विद्यार्थ्यांची वाहतूक दोन गाड्यांतून केली जात होती. मात्र आता गाड्या जागेवरच आहे. कसलंही काम नाही. अनेक ठिकाणी दुसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला पण लाॅकडाऊन असल्याने कामही मिळत नाही. त्यामुळे अडचणी वाढतच आहेत.

५. कृष्णात शेलार, स्कूल बसचालक

शेतीबरोबरच मजुरीची कामे

शाळाच बंद असल्यामुळे काम नाही. यशिवाय वाहनाचा आरटीओचा कर, इंन्शुरन्स व पासिंगसाठी एका गाडीला किमान ४५ हजार रूपये खर्च आहे. दोन्ही गाड्यांचा ९० हजार खर्च उरावर पडत आहे. रोजिरोटीसाठी शेती व रोजंदारी करण्यशिवाय पर्याय राहिला नाही.

कोण बाधकामावर लागला जाऊ

अनेकांनीच स्कूलबस या बॅँकेतून कर्ज काढून घेतल्या आहेत. त्यामुळे बॅँकांचे हप्ते भरण्याबाबत अधिकारी तगादा लावत आहेत. यातून वाचण्यासाठी शासनाने पॅकेज द्यावे, अशी मागणी भारतीय विद्यार्थी वाहतूक संघटनेकडून केली जात नाही. मात्र अद्याप काहीही मिळालेले नसल्याने काही जण तर बांधकामावर रोजगारीसाठी जात आहेत.