शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

मातंग समाजाचे विविध प्रश्न सोडवू -साठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST

सातारा : ‘मातंग समाजाला राजकारणाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच पश्चिम महाराष्ट्रात रिपाइं मातंग आघाडीच्या ...

सातारा : ‘मातंग समाजाला राजकारणाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच पश्चिम महाराष्ट्रात रिपाइं मातंग आघाडीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती रिपाइंचे (आठवले गट) मातंग आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंत साठे यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत साठे बोलत होते. यावेळी ‘रिपाइं’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव रूपा वायदंडे, मातंग आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक रघुनाथ बाबर, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, मातंग आघाडी उपाध्यक्ष अण्णा वायदंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हनुमंत साठे म्हणाले, ‘रिपाइं’चे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून महामेळाव्याचे ठिकाणी आणि तारीख जाहीर करण्यात येईल. या महामेळाव्याच्या माध्यमातून मातंग समाजाच्या विविध मागण्यांचे ठराव करण्यात येणार आहेत. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २०२० मध्ये एकही कार्यक्रम झालेला नाही. यावर्षी कार्यक्रम होण्यासाठी शासनाने १०० कोटींची तरतूद करावी अशी मागणी करणार आहोत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला ७ वर्षांत निधीची तरतूद नाही. हा निधी तातडीने मिळावा. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, यासाठी मातंग आघाडीचे एक शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधानांना भेटणार आहे.

यावेळी रिपाइं (आठवले गट) मातंग आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र किशोर गालफाडे यांना प्रदान करण्यात आले. तसेच इतर काही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

..............................................................