शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
3
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
4
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
5
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
6
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
7
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
8
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
9
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
10
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
11
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
12
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
13
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
14
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
15
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
16
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
17
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
18
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
19
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?

मातंग समाजाचे विविध प्रश्न सोडवू -साठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST

सातारा : ‘मातंग समाजाला राजकारणाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच पश्चिम महाराष्ट्रात रिपाइं मातंग आघाडीच्या ...

सातारा : ‘मातंग समाजाला राजकारणाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच पश्चिम महाराष्ट्रात रिपाइं मातंग आघाडीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती रिपाइंचे (आठवले गट) मातंग आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंत साठे यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत साठे बोलत होते. यावेळी ‘रिपाइं’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव रूपा वायदंडे, मातंग आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक रघुनाथ बाबर, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, मातंग आघाडी उपाध्यक्ष अण्णा वायदंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हनुमंत साठे म्हणाले, ‘रिपाइं’चे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून महामेळाव्याचे ठिकाणी आणि तारीख जाहीर करण्यात येईल. या महामेळाव्याच्या माध्यमातून मातंग समाजाच्या विविध मागण्यांचे ठराव करण्यात येणार आहेत. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २०२० मध्ये एकही कार्यक्रम झालेला नाही. यावर्षी कार्यक्रम होण्यासाठी शासनाने १०० कोटींची तरतूद करावी अशी मागणी करणार आहोत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला ७ वर्षांत निधीची तरतूद नाही. हा निधी तातडीने मिळावा. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, यासाठी मातंग आघाडीचे एक शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधानांना भेटणार आहे.

यावेळी रिपाइं (आठवले गट) मातंग आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र किशोर गालफाडे यांना प्रदान करण्यात आले. तसेच इतर काही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

..............................................................