शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वणव्याची धग टाकतेय जलसंधारणाच्या कामांवर माती॒

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गावांमध्ये जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. वणवा लागल्यानंतर जमीन पोकळ होते. वळीवाचा पाऊसही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : गावांमध्ये जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. वणवा लागल्यानंतर जमीन पोकळ होते. वळीवाचा पाऊसही जमीन अधिक नाजूक करतो. परिणामी मान्सूनच्या पावसात जमिनीचा उत्पादक थर जलस्त्रोतांमध्ये वाहून जातो. ज्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे झालेली आहेत, तिथंही वाहून आणलेल्या मातीने बांध-बंधारे भरून जातात. त्यामुळे बंधाऱ्यांची पाणीधारण क्षमता हळूहळू कमी होत नष्ट होते. केलेले कामही मातीमोल होते. त्यामुळे गावच्या हद्दीत वणवा लागू न देण्याच्या निकषाचा समावेश पुरस्कारांमध्ये करावा. जेणेकरुन स्थानिक पातळीवरच वणवा लावणाऱ्यांना प्रतिबंध बसेल, अशी अपेक्षा वन्यप्रेमी आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या साखळीसह वणव्याची साखळीही खंडित करणे प्रशासनापुढे आव्हान बनले आहे. गेल्या दीड महिन्यांत तब्बल १५० हून अधिक ठिकाणी वणवे लागून अनमोल वनसंपत्ती नष्ट झाली आहे. वणवे विझवण्यासाठी वनविभाग प्रयत्न करते, पण वणवा लागूच नये यावर जोर दिला तर ही वनसंपदा वाचवता येऊ शकेल, असा आशावाद पर्यावरणप्रेमींना आहे. गावांना मिळणाऱ्या पुरस्कारांमध्ये वणवामुक्तीसाठी काही गुण निर्धारित करण्यात आले तर गावपातळीवर वणवा रोखणं अधिक सोपं जाईल. जिल्ह्यात सुमारे १४०० चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. शिवाय डोंगरी भाग मोठ्या प्रमाणात आहे. फेब्रुवारीच्या मध्यावर या डोंगरांवर सायंकाळच्या वेळी वणवे दिसू लागतात. एका अहवालानुसार, जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांत १५० हून अधिक ठिकाणी वणवा लावण्याचे प्रकार घडले. खासगी मालकी क्षेत्रात लावलेला वणवा पुढे तोच वनक्षेत्रापर्यंत पोहोचतो. त्यामुळे हे वणवे विझवण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना धावाधाव करावी लागते.

वणवा कोण लावतो, याचा गावपातळीवर स्थानिकांना अंदाज असतो. वनविभागाने अशा लोकांना बोलावून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यास मोठ्या प्रमाणात अशा अघोरी प्रकारांना आळा बसू शकेल. शेतकरी या दिवसात बांध पेटवून निघून जातात. हीच आग वनक्षेत्रात पसरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांध पेटवताना तो विझेपर्यंत काळजी घेतल्यास वणव्याला आळा बसू शकेल. वणव्याच्या धगीमुळे वन्यजीव सैरभैर होऊन ते चुकून मानवी वस्तीत येतात. त्यातून मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका वाढतो.

चौकट :

वणव्याची जबाबदारी गावाकडे द्यावी

गावात कोण वणवा लावतो, याची माहिती स्थनिक पातळीवर पोलीस पाटील किंवा तत्सम यंत्रणेला असते. ग्रामस्वच्छता अभियानासारख्या लोकसहभागाच्या स्पर्धांमध्ये स्वच्छता, वैयक्तिक शौचालय, कुऱ्हाडबंदी याबरोबरच गावच्या हद्दीत वणवा लागू न देण्याच्या निकषाचा समावेश करावा. जेणेकरुन स्थानिक पातळीवरच वणवा लावणाऱ्यांना प्रतिबंध बसेल तसेच एखाद्याने आगाऊपणा केल्यास त्यांना शोधून केसेस दाखल करणे सोयीचे होईल.

कोट :

बऱ्याच वेळा वनक्षेत्रापासून एक-दीड किलोमीटरवर वणवा लावला जातो. वनक्षेत्रात तो येऊ नये म्हणून, कर्मचाऱ्यामार्फत विझवलाही जातो. मात्र वणवा लावल्याचे ठिकाण अज्ञात राहिल्याने तपासाला थोडा वेळ लागतो. यंत्रणेला याची माहिती मिळून तिथे यंत्रणा राबेपर्यंत वणव्याची धग वाढलेली असते. परिणामी वनक्षेत्राची अपरिमित हानी होते.

- शीतल राठोड, वनक्षेत्रपाल, सातारा

गावांमध्ये जलसंधारणाचे काम सुरू असताना बंधारा बांधण्यासाठी स्थानिकांनी वेळ आणि श्रम खर्ची घातलेले असतात. वणव्यामुळे हे कष्ट वाया जातात. स्‍थानिक पातळीवरच पुरस्कारांच्या निकषात वणवामुक्तीसाठी काही गुण गावांना मिळाले तर वणवामुक्ती शक्य होईल.

- सुनील भोईटे, मानद वन्यजीवरक्षक, सातारा