शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक भोंदूगिरीपासून समाजाने सावध राहावे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 00:43 IST

जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी घेतलेला समाजपरिवर्तनाचा ध्यास माणसांची मते, विचार बदलल्याशिवाय राहणार नाही,

कवठेमहांकाळ : माणसांनी श्रद्धा जरूर बाळगावी, परंतु अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये. अन्यथा आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन देवाच्या अन् धर्माच्या नावावर काही भोंदूगिरी करणारे पिळवणूक करतील. अशा भोंदूंपासून समाजाने सावध राहावे. शासनाने उचललेले हे विचारपरिवर्तनाचे पाऊल स्तुत्य असून, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी घेतलेला समाजपरिवर्तनाचा ध्यास माणसांची मते, विचार बदलल्याशिवाय राहणार नाही, असे मत जिल्ह्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग समाज कल्याण आयुक्तालयाच्यावतीने ‘जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘एक रात्र स्मशानात’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ. सुमनताई पाटील उपस्थित होत्या.सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शाहीन शेख व त्यांच्या पथकाने सामाजिक प्रबोधनाची गीते, तसेच जादूटोणा व चमत्काराचे प्रयोग सादर केले.यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी अशा कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देण्याची ग्वाही घोरपडे यांनी दिली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, कवठेमहांकाळच्या स्मशानभूमीतला हा दिवस ऐतिहासिक असून, येथील कार्यक्रम हा महाराष्ट्राला, देशाला एका नवविचाराची दिशा देईल, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमावेळी सहायक समाजकल्याण अधिकारी देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, जत विभागीय पोलीस अधिकारी नवनाथ वाकुंडे, तहसीलदार सचिन डोंगरे, बांधकाम सभापती गजानन कोठावळे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत सरपंच सुनील माळी यांनी, तर प्रास्ताविक बाळासाहेब पाटील यांनी केले.या कार्यक्रमासाठी नामदेवराव करगणे, सभापती वैशाली पाटील, प्राचार्य डॉ. अशोक बाबर, प्रा. दादासाहेब ढेरे, बाळासाहेब गुरव, मनोज सगरे, चंद्रकांत सगरे, दिलीप पाटील, हायूम सावनूरकर, भाऊसाहेब पाटील, तुकाराम पाटील यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)प्रबोधनाला सहकार्य : सुमनताई पाटीलआ. सुमनताई म्हणाल्या, आबा हे नेहमीच पुरोगामी विचारांचे समर्थन करायचे. भोंदूगिरीला, बुवाबाजीला ते विरोध करायचे. आपणही अशा प्रवृत्ती, प्रथेविरोधी असून, शासनाने असे विचारपरिवर्तनाचे, समाजपरिवर्तनाचे, प्रबोधनपर कार्यक्रम प्रत्येक गावोगावी घ्यावेत. अशा प्रबोधनाच्या कार्यक्रमांना आपण कायम सहकार्याचे धोरण स्वीकारू.परिवर्तनशील स्वागत..या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत कवठेमहांकाळ ग्रामपंचायतीच्यावतीने एक रोप, गुलाबपुष्प आणि पुस्तक भेट देऊन करण्यात आले.जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आपल्या संपूर्ण कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच महिलांची मोठी गर्दी या कार्यक्रमासाठी झाली होती. गर्दी अधिक झाल्याने बाहेर स्क्रिनवर कार्यक्रम पाहण्याची सोय करण्यात आली होती.ंशासनपातळीवरूनही विज्ञानवाद रूजवण्यासाठी व अंधश्रद्धेला गाडण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार