शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधिलकी फलकावर झळकली

By admin | Updated: October 13, 2015 00:13 IST

खंडाळा ग्रामपंचायतीचा उपक्रम : काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन

खंडाळा : ‘पाणी हे जीवन आहे,’ त्यामुळे पाण्याचा गरजेपुरता आणि काटकसरीने वापर केला पाहिजे. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विशेषत: यावर्षी गावोगावी दृष्काळसदृश परिस्थिती असल्याने पाण्याचे महत्त्व समजू लागले आहे. पाण्याच्या वापराबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी खंडाळा ग्रामपंचायतीने शहरातील चौकाचौकांमध्ये फलकाद्वारे जनप्रबोधन करण्याची नामीयुक्ती वापरली आहे. त्यामुळे एरव्ही कार्यक्रम वाढदिवसाचे फलक झळकणाऱ्या जागी पाणी वापराच्या सूचना देणारे फलक ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहे.यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे. सर्वत्र दुष्काळाची चिन्हे जाणवू लागली आहेत. त्यामुळे काही गावांतून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे पाणीचा योग्य वापर गरजेनुसार व काटकसरीने होणे आवश्यक आहे; परंतु हे लोकापर्यंत पोहोचविणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी खंडाळा ग्रामपंचायतींनी शहरातील प्रत्येक चौकात ‘काटकसरीने पाणी वापरा’ अशा आशयाचे फलक लावले आहेत. जाता येता हे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. आपोपच लोकांचे प्रबोधन होत आहे. वाढदिवसाचे फलक लावण्यापेक्षा जनजागृतीसाठी हा मार्ग चांगला असल्याचे ग्रामस्थांमध्येच चर्चा आहे. (प्रतिनिधी)‘पाणी जपून वापरा’ हे तोंडी किती जणांना सांगणार? यासाठी ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन फलक लावले आहेत. त्याचा प्रभाव जाणवत आहे. लोकांनी यापुढील काळात पाण्याचा दक्षतेने वापर करावा.- सुरेश गाढवे, उपसरपंच खंडाळा