शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

सातारा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला गती, आतापर्यंत झाली 'इतकी' नोंदणी

By दीपक देशमुख | Updated: July 12, 2024 19:17 IST

सातारा : महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका यासाठी 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" ...

सातारा : महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका यासाठी 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. सातारा जिल्ह्यात योजनेची अंमलबजावणी गतीने सुरू असून आतापर्यंत १ लाख १२ हजार ८४ महिलांची या योजनेसाठी नोंदणी करण्यात आले आहे.या योजनेसाठी आवश्यक असलेल्या अटी शर्तींची पुर्तता करणाऱ्या महिलांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्याकडे सादर करावेत तर शहरी भागातील अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, वार्ड अधिकारी, सेतु सुविधा केंद्र यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यात या योजनेचे काम गतीने सुरू आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील सर्व घटक कसोशीने कार्यरत आहेत.या योजनेसाठी तहसील कार्यालयांतील सेतू केंद्रांवर गर्दी होऊून महिलांची ससेहोलपट होवू नये म्हणून अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक, तलाठी घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील तसेच पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागेवरच ॲपच्या माध्यमातून भरण्यात येतील, अशी यंत्रणा राबवली. त्यामुळे महिलांची नाेंदणी होण्याची काम गतीने सुरू आहे. आतापर्यंत १ लाख १२ हजार ८४ महिलांची नोंदणी झाली आहे. सेतू कार्यालयामधील गर्दीही आता ओसरली आहे

या योजनेच्या पात्रतेचे निकषया योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणारे २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, अविवाहित असणे आवश्यक आहेत. यासाठी डोमासाईल, डोमासाईल नसल्यास १५ वर्षा पूर्वीचे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला यापैकी कोणताही एक रहिवाशी पुरावा आवश्यक आहे. आधार लिंक असणारे बँक खाते आवश्यक आहे. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रक्कम २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे.

अपात्रतेचे निकषकुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत, सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे अपात्र राहतील. परंतु, बाहय यंत्रणाव्दारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. शासनाच्या इतर योजनांत दीड हजारांपेक्षा पेक्षा जास्त लाभ घेतला असेल, कुटूंबातील कोणत्याही सदस्याकडे चारचाकी असल्यास (ट्रॅक्टर वगळून) लाभार्थी अपात्र ठरणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWomenमहिला