शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

नदीकाठ ओरबाडला तस्करांनी...यातना भोगतायत शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यात नदीपात्र तसेच लगतच्या जमिनीतून वाळू, रेती यांचे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्यात नदीपात्र तसेच लगतच्या जमिनीतून वाळू, रेती यांचे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेले आहे. गौण खनिज उत्खननाच्या लिलावात वरचढ बोली घेतली की, आपण नद्या ओरबडायला मोकळे, अशा अविर्भावात लिलाव घेणाऱ्यांनी जेसीबी, पोकलॅन फिरवून वाळू, रेतीचा उपसा केला. आता नदीकाठ ढासळत असल्याने नदीकाठावर पिढ्यानपिढ्या शेती करणारे शेतकरी यातना भोगताना दिसत आहेत.

सातारा जिल्ह्यात कृष्णा, कोयना, माणगंगा, येरळा, नीरा या प्रमुख नद्या तसेच त्यांच्या उपनद्या, ओढे मोठ्या प्रमाणावर आहेत. जिल्ह्यात पूर्वी वाळू लिलाव होत होते; मात्र आता हरित लवादाच्या निर्बंधामुळे वाळू लिलाव थांबलेले आहेत. यापूर्वी नदीच्या पात्रातून वाळू उत्खनन होत असे. वाळू काढणारे यंत्राच्या साहाय्याने नदीपात्रालगतची सुपीक माती ओरबाडून घेत. आता याचा दुष्परिणाम जागोजागी पाहायला मिळतो. ठिकठिकाणी नद्यांचे पात्र बदलले आहे. पुराचे पाणी लगतच्या शेतामध्ये घुसून शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे.

नदीपात्रात मोठी डबकी निर्माण झाल्याने स्थानिक जनतेलादेखील धोका निर्माण झाला आहे. नद्या ओलांडून शेतकरी आपल्या शेतामध्ये कामाला जात होते, मात्र आता नदीमध्ये मोठाले डबरे पडल्याने धोका वाढला आहे. नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बुडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

पॉइंटर

- सातारा जिल्ह्यात वाळू असलेल्या नद्या

कृष्णा, वेण्णा, कोयना, माणगंगा, नीरा, मांड - वसना वांगणा येरळा, तारळी (१२)

-जिल्ह्यात सध्या ६ वाळूच्या ठेक्यांची कार्यवाही सुरू

नदीपात्र पाण्याखाली

सातारा जिल्ह्यामध्ये यंदा मोठा पाऊस झाल्याने प्रत्येक नदी दुथडी भरून वाहत आहे. प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू आहे. नदीपात्रातील वाळू लिलावावर बंदी आहे; मात्र पात्रालगतचे लिलाव होऊ शकतात. नदीपात्र देखील बहुतांश ठिकाणी पाण्याखाली आहे.

गेल्या पाच वर्षांत (२०१६ ते २०२०) वाळूचे एकूण ठेके आणि कंसात त्यातून मिळालेला महसूल

२०१६ : १३ ठेके (१६ कोटी ९८ लाख १२ हजार २८ रुपये)

२०१७ : २ (६ कोटी ९२ लाख १ हजार ७ रुपये)

२०१८ : १२ (५ कोटी १५ लाख ६३ हजार ९२३)

२०१९ : ०

२०२० : ६ (कार्यवाही सुरू आहे. पर्यावरण विभागाची मान्यता मिळाल्यानंतर याचा लिलाव होणार आहे)

वाळूला क्रश सॅन्डचा पर्याय

सातारा जिल्ह्यात वाळूचे लिलाव होत नसल्याने क्रश सॅन्डचा वापर केला जात आहे. जिल्हयात क्रश सॅन्डचे १०० प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतून दिवसाकाठी ७००० ब्रास क्रश सॅन्ड तयार होते. सॅन्ड क्रश ४ हजार रुपये प्रतिब्रास या दराने विकली जात आहे, तर चोरीच्या वाळूचा दर १0 ते १२ हजार रुपये लावला जात आहे.

कोट..१

वाळू व रेती तस्करांनी नदीपात्रालगतच्या जमिनी खरवडून काढल्याने कसायला जमीन राहिलेली नाही. या जमिनीत बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुसऱ्याच्या शेतात मजुरी करावी लागत आहे.

- राजू शेळके, शेतकरी

कोट २

पर्यावरण विभागाच्या मान्यतेशिवाय वाळू लिलाव आता केले जात नाहीत. सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षामध्ये ६ लिलाव करण्यात येणार आहेत, गौणखनिजाची चोरी करणाऱ्यांवर प्रशासनाचे काटेकोर लक्ष असून, धडक कारवायाही सुरू आहेत.

- शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा

कोट ३

नद्यांमधून तसेच पात्रालगतच्या जमिनींचे याआधीच मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेले आहे. नद्यांमधील जीव साखळी विस्कळीत झालेली आहे. ही जीव साखळी परस्पर पूरक काम करत असते. बेकायदा उत्खनन थांबले नाही, तर पर्यावरणाचे नुकसान कधीही भरुन येणार नाही. एखादी स्थानिक प्रजाती संपली, तर पुन्हा निर्माण होत नाही.

- डॉ. सुधीर कुंभार, पर्यावरण अभ्यासक

कोट ४

वाळू उपलब्ध होत नसल्याने बांधकामासाठी क्रश सॅन्डचा वापर केला जातो. भविष्यात वाळू ही इतिहासजमा होईल. क्रश सॅन्डच्या माध्यमातून अगदी उत्तम बांधकाम केले जाऊ शकते. क्रश सॅन्ड आणि सिमेंटचा योग्य वापर केला, तर बांधकाम मजबूत होत आहे.

- मजीद कच्छी, कच्छी प्रॉपर्टीज

कोट ५

वाळूचे लिलाव होत नसल्याने क्रश सॅन्ड वापरली जात आहे. क्रश सॅन्डमध्ये ओलावा कमी असतो. त्यामुळे बांधकाम करताना सिमेंटचा वापर जास्त करावा लागतो. योग्य प्रमाणात क्रश सॅन्ड आणि सिमेंट यांचे मिश्रण केले, तर बांधकाम मजबूत होते.

- प्रशांत सावंत, इनोव्हेटिव्ह कंस्ट्रक्शन, सातारा

फोटो ओळ : सातारा तालुक्यातील अंगापूर येथे बेसुमार वाळू उपशामुळे कृष्णा नदीत ठिकठिकाणी डबकी निर्माण झाली आहेत. (छाया : संदीप कणसे)

फोटो नेम : ०२रिव्हर