शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

दिवसाढवळ्या लाल सोन्याची तस्करी!

By admin | Updated: May 23, 2015 00:33 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : कास तलाव परिसरातील कृत्रिम खड्ड्यांत साचतोय कचरा

पेट्री : साताऱ्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवरील कासचे जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झाल्याचा अभिमान बाळगला जातोय, पण त्याचे जनत करताना प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. कास तलाव परिसरातून दिवसाढवळ्या ‘लाल सोन्या’ची तस्करी केली जात आहे. यामुळे पडलेल्या कृत्रिम खड्ड्यांमध्ये कचरा साचत असल्याने तलावातील पाणी धोक्यात आले आहे.नैसर्गिक वारसा लाभलेल्या कास तलावाचे सौंदर्य लाल मातीमुळे उठून दिसत आहे. त्यामुळेच परिसरातील लाल मातीला जणू लाल सोन्याची उपमा दिली जाते. या मातीच्या गुणधर्मामुळे नारळ, आंबा, फणस, सुपारी आदींचे चांगले उत्पादन मिळत आहे. तसेच सुशोभीकरणासाठीही लाल मातीला मोठी मागणी आहे.मुबलक पाऊस, घनदाट झाडी, उंचसखल भाग यामुळे चित्रपटसृष्टीलाही भुरळ पडत असतानाच काही समाजकंठकांची दृष्ट लागायला लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून तलावालगतच्या जमिनीतील लाल मातीचे बेकायदेशीररीत्या उत्खनन केले जात आहे. यासाठी यंत्रांचाही वापर केला जात आहे. यामुळे तलाव परिसरात मोठ-मोठे खड्डे पडायला लागले आहेत.तलाव परिसरात वारंवार होत असलेल्या ओल्या, सुक्या पार्ट्या, मद्यपींनी टाकलेल्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, पत्रावळ्यांबरोबरच असंख्य अविघटनशील वस्तू टाकले जात आहेत. यामुळचे खड्ड्यांत कचऱ्याचे ढीग साठत आहेत. पावसाळा काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. पावसाचे पाणी डोंगर उतारावरून तसेच खड्ड्यातील हा कचरा वाहून तलावातील पाण्यात मिसळला जाण्याची शक्यत आहे. यामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास तलावही दूषित होण्याचा धोका वाढला आहे. परिसरात वेळोवेळी येणारे ट्रेकर्स, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी हा कचरा उचलतात. मात्र, पर्यावरणाच्या मुळावर उठलेल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पर्यावरण व महसूल विभागाने कडक पावले उचलावेत, अशी मागणी केली जात आहे. परिसरात फिरायला आल्यावर येथील रानमेव्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. परंतु, खड्डे पडून तेथील मातीचे उत्खनन झाल्याने करवंद, जांभूळ यासारख्या कित्येक वनस्पतींची हानी होत आहे. या खड्ड्यांतील कचऱ्याची विल्हेवाट नाही लावली तर नैसर्गिक सौंदर्य हरवून नाही बसलो तरच नवल. (वार्ताहर)४पार्ट्या केल्यानंतर खड्ड्यात कचरा टाकला जातो. तर काही ठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेला दिसतो. परंतु, येथील उकरण्यात आलेल्या मातीचे काय? यासंबंधी प्रश्न अनुत्तरित आहेत. यासंदंर्भात वेळीच पावले नाही उचलले तर भविष्यात हे प्रमाण आणखी वाढू शकते.पाण्यात पडलेल्या बाटल्या, ग्लास, प्लेट व अन्य प्लास्टिक वस्तू, थर्माकॉलच्या तुकड्यांमुळे भविष्यात पाण्यात किडे, अळ्या होण्याचा धोका असतो. तलाव परिसरात चालत असलेल्या ओल्या पार्ट्या रोखण्यासाठी कडक पावले उचण्यासाठी वेळीच सावध होण्याची गरज आहे.- मुकेश जाधव, पर्यटक, सातारा.