शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळ्या लाल सोन्याची तस्करी!

By admin | Updated: May 23, 2015 00:33 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : कास तलाव परिसरातील कृत्रिम खड्ड्यांत साचतोय कचरा

पेट्री : साताऱ्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवरील कासचे जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झाल्याचा अभिमान बाळगला जातोय, पण त्याचे जनत करताना प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. कास तलाव परिसरातून दिवसाढवळ्या ‘लाल सोन्या’ची तस्करी केली जात आहे. यामुळे पडलेल्या कृत्रिम खड्ड्यांमध्ये कचरा साचत असल्याने तलावातील पाणी धोक्यात आले आहे.नैसर्गिक वारसा लाभलेल्या कास तलावाचे सौंदर्य लाल मातीमुळे उठून दिसत आहे. त्यामुळेच परिसरातील लाल मातीला जणू लाल सोन्याची उपमा दिली जाते. या मातीच्या गुणधर्मामुळे नारळ, आंबा, फणस, सुपारी आदींचे चांगले उत्पादन मिळत आहे. तसेच सुशोभीकरणासाठीही लाल मातीला मोठी मागणी आहे.मुबलक पाऊस, घनदाट झाडी, उंचसखल भाग यामुळे चित्रपटसृष्टीलाही भुरळ पडत असतानाच काही समाजकंठकांची दृष्ट लागायला लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून तलावालगतच्या जमिनीतील लाल मातीचे बेकायदेशीररीत्या उत्खनन केले जात आहे. यासाठी यंत्रांचाही वापर केला जात आहे. यामुळे तलाव परिसरात मोठ-मोठे खड्डे पडायला लागले आहेत.तलाव परिसरात वारंवार होत असलेल्या ओल्या, सुक्या पार्ट्या, मद्यपींनी टाकलेल्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, पत्रावळ्यांबरोबरच असंख्य अविघटनशील वस्तू टाकले जात आहेत. यामुळचे खड्ड्यांत कचऱ्याचे ढीग साठत आहेत. पावसाळा काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. पावसाचे पाणी डोंगर उतारावरून तसेच खड्ड्यातील हा कचरा वाहून तलावातील पाण्यात मिसळला जाण्याची शक्यत आहे. यामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास तलावही दूषित होण्याचा धोका वाढला आहे. परिसरात वेळोवेळी येणारे ट्रेकर्स, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी हा कचरा उचलतात. मात्र, पर्यावरणाच्या मुळावर उठलेल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पर्यावरण व महसूल विभागाने कडक पावले उचलावेत, अशी मागणी केली जात आहे. परिसरात फिरायला आल्यावर येथील रानमेव्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. परंतु, खड्डे पडून तेथील मातीचे उत्खनन झाल्याने करवंद, जांभूळ यासारख्या कित्येक वनस्पतींची हानी होत आहे. या खड्ड्यांतील कचऱ्याची विल्हेवाट नाही लावली तर नैसर्गिक सौंदर्य हरवून नाही बसलो तरच नवल. (वार्ताहर)४पार्ट्या केल्यानंतर खड्ड्यात कचरा टाकला जातो. तर काही ठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेला दिसतो. परंतु, येथील उकरण्यात आलेल्या मातीचे काय? यासंबंधी प्रश्न अनुत्तरित आहेत. यासंदंर्भात वेळीच पावले नाही उचलले तर भविष्यात हे प्रमाण आणखी वाढू शकते.पाण्यात पडलेल्या बाटल्या, ग्लास, प्लेट व अन्य प्लास्टिक वस्तू, थर्माकॉलच्या तुकड्यांमुळे भविष्यात पाण्यात किडे, अळ्या होण्याचा धोका असतो. तलाव परिसरात चालत असलेल्या ओल्या पार्ट्या रोखण्यासाठी कडक पावले उचण्यासाठी वेळीच सावध होण्याची गरज आहे.- मुकेश जाधव, पर्यटक, सातारा.