शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

तांबवेत दुरंगी लढतीचे धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST

तांबवे : स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या तांबवे येथे ग्रामपंचायत निवडणूक लागली असून, तेरा जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात ...

तांबवे : स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या तांबवे येथे ग्रामपंचायत निवडणूक लागली असून, तेरा जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक दुरंगी होत आहे. सत्ताधाऱ्यांचे भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल विरोधात भैरवनाथ ग्रामविकास आघाडी पॅनेलच्या उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे.

तांबवे गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक लागली असतानाही कसलीही पोस्टरबाजी नाही. त्यामुळे वातावरण खेळीमेळीत आहे. दोन्ही गटांतील नेत्यांनी बॅनरबाजी न करता सोशल मीडियाचा वापर करून प्रचारात जोर धरला आहे. प्रभागनुसार सभा घेऊन प्रत्येकजण आपापल्या पॅनेलचे विकासाचे मुद्दे मांडत मतदारांना मत मागत आहेत. गाठीभेटी, कोपरासभा घेऊन प्रचार करीत आहेत. सत्ताधारी गटातील काही उमेदवार दुसऱ्या गटाला मिळाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. गावामध्ये दोन्ही गटातील कुणीही फलक लावलेले नाहीत. घरोघरी भेटी देऊन ते प्रचार करीत आहेत. सर्वच उमेदवारांनी सोशल मीडियाचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचे दिसून येत आहे.

सत्ताधारी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल गत पाच वर्षांत काय विकासकामे केली, हे सांगत विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत, तर विरोधी भैरवनाथ ग्रामविकास आघाडी पॅनेलचे उमेदवार गावाला सत्ताधाऱ्यांनी गत पाच वर्षांत कसे वेठीस धरले, हे ठासून सांगत आहेत. भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री कारखाना संचालक रामचंद्र पाटील, सतीश पाटील, माजी सरपंच पी. डी. पाटील, दिलीप पाटील, अशोक पाटील हे करीत आहेत, तर भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व यशवंत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवासराव पाटील, माजी उपसरपंच आनंदा ताटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अण्णासाहेब पाटील, विद्यमान उपसरपंच धनंजय ताटे, विठोबा पाटील हे करीत आहेत.