शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे सहापदरीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर !

By admin | Updated: January 1, 2016 00:05 IST

आंदोलनाचा पवित्रा : ओढ्याचे नैसर्गिक प्रवाह बदलून शेतीमध्ये सोडले

पाचवड : राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या सुरू असलेल्या सहापदरीकरणाच्या दिशाहीन व ढिसाळ नियोजनाविरोधात ‘लोकमत’ने वेळोवेळी आवाज उठवूनसुद्धा बेलगाम झालेल्या ठेकेदारांनी त्यांचा मनमानी कारभार सुरूच ठेवलेला आहे. शेतकऱ्यांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या मालिकेमधील आणखी एक शृंखला म्हणजे पाचवड गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यानजीक असलेल्या ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून तो महामार्गाशेजारील शेतकऱ्यांच्या थेट शेतीमध्ये सोडण्यात आला आहे. याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता हा गंभीर विषय दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पीडित शेतकऱ्यांनी सांगितले. विकासाच्या प्रक्रियेतील महामार्गाचे सहापदरीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून, प्रशासनानेही याबाबतची योग्य दखल न घेतल्याने सर्व पीडित शेतकरी व ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. महामार्गापासून वाई तालुक्यातील पाचवड गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यानजीक मोठा ओढा आहे. या ओढ्यावर महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या ओढ्याचा प्रवाह पश्चिमेकडून आला असून, तो महामार्ग ओलांडल्यानंतर उत्तरेकडे जाऊन मोठ्या ओढ्याला मिळतो. हा नैसर्गिक प्रवाह आहे; परंतु होऊ घातलेल्या सहापदरीकरणामध्ये या ओढ्याचा महामार्ग ओलांडल्यानंतर उत्तरेकडे जाणारा नैसर्गिक प्रवाह, महामार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदारांनी पूर्णपणे बंद केला आहे. तो पूर्वेकडील शेतकऱ्यांच्या बागायत शेतीमध्ये सोडण्यात आला आहे. सध्या दुष्काळी स्थिती असल्याने या ओढ्याला पाणी नाही; परंतु भविष्यात पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर या ओढ्याला पाण्याचा मोठा प्रवाह येणार आहे. यापूर्वीही मोठ्या पर्जन्यवृष्टीनंतर या ओढ्याला पूर आलेले आहेत. हे पाणी प्रवाह बदलल्याने थेट शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाणार असून, भविष्यात बागायत शेतीची मोठी हानी होणार आहे. हा प्रवाह पुढे पाचवडमध्ये जाणाऱ्या रस्त्याकडे जाणार आहे. हा रस्ताही रहदारीसाठी बंद होणार आहे. हा सर्व प्रकार महामार्गाच्या ठेकेदारांच्या लक्षात येऊनसुद्धा मंजुरी वरून घ्यावी लागेल, असे सांगत हात झटकले आहेत. (वार्ताहर) जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन वारंवार विनंती करूनही मनमानी करणाऱ्या महामार्गाच्या ठेकेदारांविरोधात सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन न्याय मिळविण्यासाठी महामार्गाचे कामकाज थांबवून प्रसंगी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. संबंधित पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेही या संदर्भात निवेदन देऊन दाद मागितली आहे.