शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

महामार्गाचे सहापदरीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर !

By admin | Updated: January 1, 2016 00:05 IST

आंदोलनाचा पवित्रा : ओढ्याचे नैसर्गिक प्रवाह बदलून शेतीमध्ये सोडले

पाचवड : राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या सुरू असलेल्या सहापदरीकरणाच्या दिशाहीन व ढिसाळ नियोजनाविरोधात ‘लोकमत’ने वेळोवेळी आवाज उठवूनसुद्धा बेलगाम झालेल्या ठेकेदारांनी त्यांचा मनमानी कारभार सुरूच ठेवलेला आहे. शेतकऱ्यांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या मालिकेमधील आणखी एक शृंखला म्हणजे पाचवड गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यानजीक असलेल्या ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून तो महामार्गाशेजारील शेतकऱ्यांच्या थेट शेतीमध्ये सोडण्यात आला आहे. याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता हा गंभीर विषय दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पीडित शेतकऱ्यांनी सांगितले. विकासाच्या प्रक्रियेतील महामार्गाचे सहापदरीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून, प्रशासनानेही याबाबतची योग्य दखल न घेतल्याने सर्व पीडित शेतकरी व ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. महामार्गापासून वाई तालुक्यातील पाचवड गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यानजीक मोठा ओढा आहे. या ओढ्यावर महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या ओढ्याचा प्रवाह पश्चिमेकडून आला असून, तो महामार्ग ओलांडल्यानंतर उत्तरेकडे जाऊन मोठ्या ओढ्याला मिळतो. हा नैसर्गिक प्रवाह आहे; परंतु होऊ घातलेल्या सहापदरीकरणामध्ये या ओढ्याचा महामार्ग ओलांडल्यानंतर उत्तरेकडे जाणारा नैसर्गिक प्रवाह, महामार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदारांनी पूर्णपणे बंद केला आहे. तो पूर्वेकडील शेतकऱ्यांच्या बागायत शेतीमध्ये सोडण्यात आला आहे. सध्या दुष्काळी स्थिती असल्याने या ओढ्याला पाणी नाही; परंतु भविष्यात पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर या ओढ्याला पाण्याचा मोठा प्रवाह येणार आहे. यापूर्वीही मोठ्या पर्जन्यवृष्टीनंतर या ओढ्याला पूर आलेले आहेत. हे पाणी प्रवाह बदलल्याने थेट शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाणार असून, भविष्यात बागायत शेतीची मोठी हानी होणार आहे. हा प्रवाह पुढे पाचवडमध्ये जाणाऱ्या रस्त्याकडे जाणार आहे. हा रस्ताही रहदारीसाठी बंद होणार आहे. हा सर्व प्रकार महामार्गाच्या ठेकेदारांच्या लक्षात येऊनसुद्धा मंजुरी वरून घ्यावी लागेल, असे सांगत हात झटकले आहेत. (वार्ताहर) जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन वारंवार विनंती करूनही मनमानी करणाऱ्या महामार्गाच्या ठेकेदारांविरोधात सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन न्याय मिळविण्यासाठी महामार्गाचे कामकाज थांबवून प्रसंगी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. संबंधित पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेही या संदर्भात निवेदन देऊन दाद मागितली आहे.