शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

ओगलेवाडीत शंभर मिटरमध्ये सहा गतीरोधक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 15:09 IST

ओगलेवाडी : कºहाड-विटा मार्गावर नुकतेच चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या ओगलेवाडी गावात सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ शंभर मीटरच्या अंतरात तब्बल सहा गतीरोधक तयार करुन अक्षरश: अतिरेक केला आहे. नियमबाह्य पद्धतीने तयार करण्यात आलेल्या गतीरोधकामुळे वाहनांची गती कमी झाली असली तरी गतीरोधकाच्या आकारामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे नियमबाह्य पद्धतीने तयार करण्यात आलेल्या गतीरोधकामुळे वाहनांची गती कमीनियमांच्या पायमल्लीमुळे गंभीर अपघाताची शक्यता

 ओगलेवाडी : कºहाड-विटा मार्गावर नुकतेच चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या ओगलेवाडी गावात सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ शंभर मीटरच्या अंतरात तब्बल सहा गतीरोधक तयार करुन अक्षरश: अतिरेक केला आहे. नियमबाह्य पद्धतीने तयार करण्यात आलेल्या गतीरोधकामुळे वाहनांची गती कमी झाली असली तरी गतीरोधकाच्या आकारामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कºहाड-विटा मार्गावरील मोठे गाव म्हणून ओगलेवाडी-हजारमाचीची ओळख निर्माण झाली आहे. ही आजूबाजूच्या दहा ते बारा गावांची बाजारपेठ आहे. दोन-तीन महिन्यांपुर्वीच कºहाड-विटा मार्गावरील कृष्णा कॅनॉल ते करवडी फाटा या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने हा रस्ता दररोज यावरुन जाणाºया हजारो वाहनांसाठी पुरेसा रूंद झाला आहे.

रस्त्याच्या मधोमध दुभाजकही बसवण्यात आले आहेत. या रस्त्याचा दर्जाही ठेकेदाराकडून समाधानकारक ठेवल्यामुळे वाहनधारकांच्याकडून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु ओगलेवाडी परिसरातील काही लोकांच्या दबावापुढे झुकून बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी गावात केवळ शंभर मीटर अंतरादरम्यान तब्बल सहा भले मोठे गतीरोधक तयार केले आहेत. त्यामुळे वाहनांची गती भलेही कमी झाली असेल मात्र गंभीर अपघाताची शक्यता कित्येक पटीने वाढली आहे.गुहागर-विजापूर या पूर्वीच्या राज्यमार्गाला केंद्र सरकारकडून काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचाच भाग असणाºया कºहाड-ओगलेवाडी टप्प्यालाही सर्व नियम लागू होतात. राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्यमार्गावर गतीरोधक तयारच करु नये, असा नियम असताना बांधकाम विभागाने नियमांची उघड पायमल्ली करीत ओगलेवाडीमध्ये गतीरोधकांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. सुरुवातीला याठिकाणी रम्बलर गतीरोधक बसवण्यात आले. परंतु भुरट्या चोरट्यांनी स्टील चोरण्यासाठी संबंधित रम्बलर फोडले. त्यामुळे डांबरी गतीरोधक तयार करण्यात आले. ते तयार करतानाही कोणतेही निकष पाळलेले नाहीत.तब्बल एक फूट उंचीचे आणि तीन फूट रुंदीचे हे राक्षसी गतीरोधक म्हणजे सर्व लहानमोठ्या वाहनधारकांसाठी अक्षरश: कर्दनकाळ ठरत आहेत. त्यातच त्यावर काळे पांढरे पट्टेही मारण्यात आले नसल्यामुळे दूर अंतरावरुन त्यांचा अजिबात अंदाज येत नाही. परिणामी वाहनधारकांना अगदी समोर आल्यावरच त्यांची जाणीव होते आणि वाहन जोरदार आपटणे, स्लीप होणे, असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान तर होत आहेच. परंतु गेल्या आठवड्यापासून अनेक दुचाकीधारक प्रामुख्याने या परिसरात असलेल्या एका बँकेसमोरील गतीरोधकाजवळ जखमी झाले आहेत.हे गतीरोधक त्वरीत काढून टाकण्यात न आल्यास इथे एखादा गंभीर अपघात घडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला सर्वस्वी बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार राहणार आहेत.ओगलेवाडी-हजारमाची परिसरात शेकडो इतर समस्या असताना येथील काही स्थानिक लोकप्रतिनिधी वाहनांची गती ही एकमेव समस्या असल्याप्रमाणे गतीरोधकाच्या मागणीसाठी वारंवार आंदोलनाचा इशारा देत होते. या दबावाला बळी पडूनच बांधकाम विभागाने नियमबाह्य पद्धतीने गतीरोधक तयार केले असल्याची ग्रामस्थांच्यात चर्चा आहे.