शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सांगलीत आणखी सहा पिस्तूल जप्त

By admin | Updated: June 19, 2016 00:48 IST

तिघांना अटक : आंतरराज्य टोळी सक्रिय; धागदोरे हाती

सांंगली : रिव्हॉल्व्हर तसेच पिस्तूल तस्करी व विक्रीप्रकरणी अटकेत असलेल्या सांगलीतील टोळीकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी आणखी सहा पिस्तूल जप्त केली आहेत. टोळीतील आणखी तिघांना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यामागे आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय आहे. यासंदर्भात महत्त्वाचे पुरावेही मिळाले आहेत. लवकरच या टोळीचा पर्दाफाश केला जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले. शिंदे म्हणाले की, नव्याने अटक केलेल्यांमध्ये संतोष दत्तात्रय माळी (वय ३२, रा. विजय मराठा चौक, सांगलीवाडी), सुरेश बापूराव खोमणे (१९, कोराळे-खुर्द, ता. बारामती, जि. पुणे) व गणेश नेमिनाथ घोडके (१९, पाण्याच्या टाकीजवळ, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. यापूर्वी अस्लम ऊर्फ सय्यदलाल सुतार, प्रशांत कोळी, सचिन चंदनशिवे, तौफीक शेख या चौघांना अटक केली होती. ते साखर कारखाना परिसर व माधवनगर परिसरातील आहेत. त्यांच्याकडून एक रिव्हॉल्व्हर, चार पिस्तूल व १२ जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी या तिघांची नावे निष्पन्न झाली. त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सहा पिस्तूल सापडली. यातील एका पिस्तूलमधून एकावेळी १२ राऊंड झाडता येतात. शिंदे म्हणाले की, रिव्हॉल्व्हर तस्करी व विक्री करणारी ही टोळी मोठी आहे. यामागे आंतरराज्य टोळीचा हात आहे. त्यांना या शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य तस्कराचे नाव निष्पन्न झाले आहे. तो परराज्यातील आहे. त्याला पकडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पोलिसांचे एक पथक तपासासाठी पाठविले जाणार आहे. स्थानिक आणखी काही संशयितांचा सहभाग आहे का, याची माहिती काढण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या टोळीकडून दहा पिस्तूल व एक रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे. परराज्यातील तस्कर हाती लागला, तर तपासाला गती मिळेल. याचा मुळापर्यंत जाऊन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. जप्त केलेल्या पिस्तुलाचा वापर झाला आहे का, याची तपासणी केली जात आहे. नरळे यांना बक्षीस शिंदे म्हणाले की, पिस्तूलची खरेदी व विक्री करणारी सांगलीत टोळी सक्रिय असल्याची माहिती सर्वप्रथम स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस नाईक बिरोबा नरळे यांना मिळाली होती. त्यांच्या माहितीमुळे या टोळीचा पर्दाफाश करता आला. त्यामुळे त्यांना रोख दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे. गुन्हेगारी आढावा बैठकीत त्यांचा बक्षीस व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला जाईल.