शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

साठ लाख पाण्यात; पण तहान भागेना !

By admin | Updated: March 11, 2017 10:45 IST

उरुलचा प्रकल्प झुडपांनी वेढला : आठ वर्षांपासून भिजत घोंगडे कायम; पाणीसाठाच नाही, प्रकल्पग्रस्त शेतकरी वाऱ्यावर

साठ लाख पाण्यात; पण तहान भागेना !उरुलचा प्रकल्प झुडपांनी वेढला : आठ वर्षांपासून भिजत घोंगडे कायम; पाणीसाठाच नाही, प्रकल्पग्रस्त शेतकरी वाऱ्यावरमल्हारपेठ : शासनाच्या दुर्लक्षतेमुळे आठ वर्षांपासून उरुल लघुपाटबंधारे प्रकल्पाचे भिजत घोंगडे आहे. अंदाजे साठ लाख रुपये मातीमोल झाले आहेत. ३० फूट माती-मुरूमाची भिंत अर्धवट अवस्थेत उभी असून, त्यावर बाभूळ व झाडेझुडपांनी अतिक्रमण केले आहे. आठ वर्षांत घोटभर पाणी साठले नसून जैसे थे अवस्थेत प्रकल्प पूर्णत्वाची वाट पाहत आहे. रखडलेला लघुपाटबंधारे प्रकल्प कोणत्या वर्षी पूर्ण होणार?, असा सवाल उपस्थित होत आहे. मल्हारपेठ येथून पाच किलोमीटरवर असणारा उरुल लघुपाटबंधारे प्रकल्प आठ वर्षांपासून बंद आहे. प्रकल्पग्रस्त व उरुल भागातील ग्रामस्थ याबाबत तक्रार करत नाहीत की बोलतही नाहीत. प्रकल्पात उरुल गावची ३६ एकर व ठोमसे बोडकेवाडीची २८ एकर क्षेत्र बाधित झाले आहे. ठोमसे गावाचा जाणारा रस्ता पाण्याखाली जाणार होता. म्हणून संबंधित ठेकेदाराने पर्यायी रस्ता म्हणून अगोदरच उत्खनन केले आहे. परंतु रस्त्याची दिशा व दशा काय असणार व रस्ता कोठून होणार याबाबत ग्रामस्थ संभ्रमावस्थेत आहेत. तसेच ठोमसे गावाची सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर व स्मशानभूमी ही बुडीत क्षेत्रात जात असल्यामुळे त्याला पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. नुकताच लघुपाटबंधाऱ्याने कालव्याऐवजी बंदिस्त पाईपलाईनचा सर्व्हे केला. लोकांच्या जीवनावश्यक गोष्टींचा विचार न करता पाणी साठविण्यासाठी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार न करता. बंदिस्त पाईपलाईनचा सर्व्हे हे गणित ग्रामस्थांच्या लक्षात आले नाही. प्रकल्पाची अर्धी भिंत बांधून तयार आहे. बंधाऱ्याच्या उत्तरेकडील बाजूने पाण्याच्या सांडव्याचे काहीही काम झाले नाही. तो अर्धवट अवस्थेत असून सांडवा बांधण्यासाठी लागणारी खडी, वाळू, स्टिल, सळी अज्ञातांनी गायब केली आहे. पाटण तालुक्यातील बराच भाग ओलिताखाली आला आहे. मात्र, उरुल भाग ओलितापासून वंचित आहे. उरुल भागातील ठोमसे, बोडकेवाडी, तांबेवाडी, मोरेवाडी, पोळाचीवाडी, बौद्धवस्ती, सनगरवाडी गावाचे शेतकरी आज ही पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. प्रकल्पाखाली दोन हजार ५०० एकर क्षेत्र ओलिताखाली आले असते. आज येथील शेतकरी कोरडवाहू शेती, पशुपालन करून कसेबसे पोट भरत आहेत. प्रकल्प झाला असता तर प्रकल्पाच्या दोन्ही काठाला असणारी सुपीक जमीन सुजलाम् सुफलाम् झाली असती. आठ वर्षे काम बंद झाल्यापासून प्रकल्प स्थळावरील एक दगड ही हललेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल, अशी आशा धुसर होत चालली आहे. आजअखेर प्रकल्पग्रस्तांना आठ वर्षांत उत्खनन केलेल्या जमिनीचे दोन वेळा तुटपुंजे भुईभाडे खातेनिहाय मिळाले आहे. मात्र, आजपर्यंत बाधित शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री अजितदादा पवार यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. आज केंद्र व राज्यात युतीचे सरकार असून, तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी विधानभवनात केली होती. यावर काही उपाययोजना वरिष्ठ पातळीवर झाली की नाही? हेही उरुल भागातील ग्रामस्थांना कळले नाही. वारंवार ग्रामस्थ लघुपाटबंधारे विभागास ग्रामस्थ विचारत आहेत. मात्र, निधीबाबत शासनाकडे चर्चा सुरू आहे एवढेच उत्तर मिळत आहे. (वार्ताहर)प्रकल्पाचे साहित्य भंगारातप्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील विहिरी, पाईपलाईन, फळ झाडे, साग, जांभूळ व जळावू झाडे नामशेष झाली असून, त्यांचे पंचनाम्याचे ही काम पूर्ण झाले आहे. त्याठिकाणी पुन्हा मोठमोठी झाडे आली आहेत. कामासाठी आलेले लोखंडी साहित्य अज्ञात चोरट्यांनी भंगार जमा केले असल्याची चर्चा आहे. आठ वर्षांपूर्वी प्रकल्पाचे काम चालू असताना बाधित शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदार व प्रशासनाला वारंवार भरपाई मागीतली मात्र ती न दिल्यामुळे अनेक वेळा प्रकल्पाचे काम बंद पाडले होते. ते बंदच अवस्थेत आहे.अडीच वर्षांत छदामही नाहीकारखाना कार्यस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व इतर अर्धा डझन मंत्री अडीच वर्षांच्या काळात येऊन गेले. मुख्यमंत्री आमदार देसार्इंचे मित्र असून सुद्धा प्रकल्पाला अडीच वर्षांत एक छदामही मिळालेला नाही. आजपर्यंत विधानसभा व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भरभरून मतदान देणाऱ्या उरुल भागातील जनतेची अशा प्रकारे चाललेली फरफट या अर्थसंकल्पात तरी पूर्ण होणार का?, असा सवाल उरुल भागातील वाड्या-वस्तीतून होत आहे.महिन्यापूर्वी लघुपाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या खालील बाजूस प्रत्येक क्षेत्रासाठी कालव्याऐवजी बंदिस्त पाईपलाईन करून शेतीला पाणीपुरवठा करण्याबाबत अहवाल तयार केला आहे. मात्र, बंधाऱ्याचे काम पूर्ण नसून पुढील पाण्याचे नियोजन का केले गेले हे लोकांना व आम्हालाही समजले नाही. मात्र, ठोमसे गावाचा रस्ता, सार्वजनिक विहीर व स्मशानभूमी बुडीत क्षेत्रात जात आहे त्यावरही पहिल्यांदा उपाययोजना होणे गरजेचे आहे.- बजरंग माने, माजी ग्रामपंचायत सदस्य२००७ मध्ये फक्त धरणास मंजुरी मिळून जमिनीचे अधिग्रहण न करता धरण क्षेत्रात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित ठेकेदारांनी पैसे मिळणार असल्याची भूलथाप मारून काम सुरू केले. फक्त तुटपुंजे भुईभाडे प्रकल्पग्रस्तांना मिळाले आहेत. मात्र, आश्वासन दिलेला मोबदला न मिळाल्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. व आज ही काम बंद अवस्थेत आहे. - रमेश मोरे, प्रकल्पग्रस्तगावात ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होत असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने गेल्यावर्षी पाटण तहसीलदारांना बंधाऱ्यांच्या भिंतीजवळ नदीपात्रात तात्पुरती सिमेंट भिंत बांधण्यासाठी निवेदन दिले होते. यामुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता मात्र, संबंधितांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. चालू वर्षीही ठोमसे गावात टंचाई भासण्याची शक्यता आहे. - कमल कदम, सरपंच, ठोमसे, ता. पाटण