शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पुण्याजवळ सहाजण ठार

By admin | Updated: June 12, 2015 00:38 IST

सांगवीवर शोककळा : डंपरची आठ वाहनांना धडक

आंबेगाव बुद्रुक (पुणे) : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एका डंपरने पाच मोटारी, दोन दुचाकी आणि एका सहा आसनी रिक्षाला धडक देत सहाजणांचा बळी घेतला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन मोटारींवरच हा डंपर उलटल्याने मोटारींचा अक्षरश: चक्काचूर झाला. यातील एका मोटारीमधील चारजणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक मुलगी बचावली. मृतांमध्ये सातारा जिल्ह्यामधील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावर वडगाव पुलाजवळ घडला. घटनास्थळावर डंपरमधील खडी पसरली होती.रवींद्र तुकाराम सावंत (वय ३५), सारिका रवींद्र सावंत (३०), रेवती रवींद्र सावंत (१०, सर्व, रा. सांगवी, ता. जावळी, जि. सातारा), सुभाष विनायक चौधरी (२९, रा. सुदाम पाटील चाळ, रामनगर, डोंबिवली), बालाजी तुकाराम राठोड (२५), महेंबर यादव गायकवाड (२३, रा. शिर्गापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत, तर भालचंद्र विठ्ठल कालुरकर (४२), रुपेश राजेंद्र पळसदेवकर (३४) बाळासाहेब विठ्ठल घाडगे (५६), शरद सर्जेराव मोरे (५४) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. डंपर चालक मात्र अपघातानंतर पसार झाला.असा झाला अपघातखडी आणि डांबराचे मिश्रण घेऊन वारज्याच्या दिशेने येणाऱ्या दहा चाकी डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. नऱ्हेजवळील तीव्र (पान १वरून) व्होल्वो बसला धडक दिली. ती एवढी जोरात होती की, बसची एका जीपला धडक बसली. ही बस दुभाजकावर चढून पुढे जात झाडाला धडकल्यामुळे थांबली. सुदैवाने या बसमध्ये कुणी प्रवासी नव्हते. प्रचंड वेगात असलेल्या या डंपरने नंतर तवेरा गाडीला ठोकरले आणि पुढे जाऊन सहा आसनी रिक्षाला धडक दिली. या धडकेत सहा आसनी रिक्षाचे दोन तुकडे झाले. त्यानंतर तीन दुचाकींना धडक देत पुन्हा एका मोटारीला डंपरची धडक बसली. वडगाव पुलाच्या सुरुवातीलाच रस्त्याच्या बाजूला ओम्नी आणि सॅन्ट्रो कार उभ्या होत्या. सॅन्ट्रोमध्ये पाचजण होते.भरधाव डंपरने सॅन्ट्रोला धडक दिल्यानंतर ओम्नीसह तिन्ही गाड्या पुलाचा कठडा तोडून सेवा रस्ता आणि महामार्गाच्या मधे असलेल्या मोकळ्या उतारावर घसरत गेल्या. तेथे मोठ्या झाडांना या गाड्या जाऊन धडकल्यामुळे थांबल्या; परंतु ओम्नी आणि सॅन्ट्रो डंपरखाली दबल्या गेल्या.अग्निशामक दलाच्या जवानांनी कटरच्या साहाय्याने चक्काचूर झालेल्या गाड्यांचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढले. एका मुलीला जिवंत बाहेर काढण्यात त्यांना यश आले.कुडाळ : पुणे येथे झालेल्या अपघातात जावळी तालुक्यातील सांगवी गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सांगवी गाव शोकसागरात बुडाले.रवींद्र सावंत हे कुटुंबीयांसमवेत मुंबईला स्थायिक झाले होते. ते पत्नी सारिका आणि रचना व रेवती या दोन मुलींसमवेत सांगवी या मूळगावी सुटीसाठी आले होते. दरम्यान, गुरुवारी त्यांनी सकाळी आपली वृद्ध आई इंदुबाई यांना कुडाळ येथून बाजार आणून दिला. त्यानंतर ते सुटी संपवून कुटुंबासमवेत मुंबईला निघाले होते. ‘मुंबईत पोहोचताच फोन कर,’ असं आई इंदुबाई यांनी बजावून सांगितले होते. त्यामुळे त्या मुलाच्या फोनच्या प्रतीक्षेत होत्या. मात्र, अचानक त्यांच्या अपघाताची बातमी सांगवीत धडकताच गावात शोककळा पसरली. मुलासह सून आणि नातीच्या मृत्यूची बातमी इंदुबार्इंना कशी सांगायची, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला; परंतु धाडस करून काहींनी इंदुबार्इंना या दुर्दैवी अपघाताची माहिती देताच इंदुबार्इंनी एकच आक्रोश केला. गावासह पंचक्रोशीत वाऱ्यासारखी बातमी पसरली. त्यामुळे सावंत यांच्या घराकडे गर्दी वाढू लागली.ग्रामस्थांना अश्रू अनावररवींद्र सावंत हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांनी मुंबईत व्यवसायात भरभराट करीत आपला व्यवसाय स्थिरस्थावर केला होता. त्यामुळे गावकऱ्यांना त्यांचा अभिमान असायचा; मात्र सावंत कुटुंबावर काळाने घाला घातल्याने गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.