शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

पुण्याजवळ सहाजण ठार

By admin | Updated: June 12, 2015 00:38 IST

सांगवीवर शोककळा : डंपरची आठ वाहनांना धडक

आंबेगाव बुद्रुक (पुणे) : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एका डंपरने पाच मोटारी, दोन दुचाकी आणि एका सहा आसनी रिक्षाला धडक देत सहाजणांचा बळी घेतला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन मोटारींवरच हा डंपर उलटल्याने मोटारींचा अक्षरश: चक्काचूर झाला. यातील एका मोटारीमधील चारजणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक मुलगी बचावली. मृतांमध्ये सातारा जिल्ह्यामधील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावर वडगाव पुलाजवळ घडला. घटनास्थळावर डंपरमधील खडी पसरली होती.रवींद्र तुकाराम सावंत (वय ३५), सारिका रवींद्र सावंत (३०), रेवती रवींद्र सावंत (१०, सर्व, रा. सांगवी, ता. जावळी, जि. सातारा), सुभाष विनायक चौधरी (२९, रा. सुदाम पाटील चाळ, रामनगर, डोंबिवली), बालाजी तुकाराम राठोड (२५), महेंबर यादव गायकवाड (२३, रा. शिर्गापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत, तर भालचंद्र विठ्ठल कालुरकर (४२), रुपेश राजेंद्र पळसदेवकर (३४) बाळासाहेब विठ्ठल घाडगे (५६), शरद सर्जेराव मोरे (५४) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. डंपर चालक मात्र अपघातानंतर पसार झाला.असा झाला अपघातखडी आणि डांबराचे मिश्रण घेऊन वारज्याच्या दिशेने येणाऱ्या दहा चाकी डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. नऱ्हेजवळील तीव्र (पान १वरून) व्होल्वो बसला धडक दिली. ती एवढी जोरात होती की, बसची एका जीपला धडक बसली. ही बस दुभाजकावर चढून पुढे जात झाडाला धडकल्यामुळे थांबली. सुदैवाने या बसमध्ये कुणी प्रवासी नव्हते. प्रचंड वेगात असलेल्या या डंपरने नंतर तवेरा गाडीला ठोकरले आणि पुढे जाऊन सहा आसनी रिक्षाला धडक दिली. या धडकेत सहा आसनी रिक्षाचे दोन तुकडे झाले. त्यानंतर तीन दुचाकींना धडक देत पुन्हा एका मोटारीला डंपरची धडक बसली. वडगाव पुलाच्या सुरुवातीलाच रस्त्याच्या बाजूला ओम्नी आणि सॅन्ट्रो कार उभ्या होत्या. सॅन्ट्रोमध्ये पाचजण होते.भरधाव डंपरने सॅन्ट्रोला धडक दिल्यानंतर ओम्नीसह तिन्ही गाड्या पुलाचा कठडा तोडून सेवा रस्ता आणि महामार्गाच्या मधे असलेल्या मोकळ्या उतारावर घसरत गेल्या. तेथे मोठ्या झाडांना या गाड्या जाऊन धडकल्यामुळे थांबल्या; परंतु ओम्नी आणि सॅन्ट्रो डंपरखाली दबल्या गेल्या.अग्निशामक दलाच्या जवानांनी कटरच्या साहाय्याने चक्काचूर झालेल्या गाड्यांचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढले. एका मुलीला जिवंत बाहेर काढण्यात त्यांना यश आले.कुडाळ : पुणे येथे झालेल्या अपघातात जावळी तालुक्यातील सांगवी गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सांगवी गाव शोकसागरात बुडाले.रवींद्र सावंत हे कुटुंबीयांसमवेत मुंबईला स्थायिक झाले होते. ते पत्नी सारिका आणि रचना व रेवती या दोन मुलींसमवेत सांगवी या मूळगावी सुटीसाठी आले होते. दरम्यान, गुरुवारी त्यांनी सकाळी आपली वृद्ध आई इंदुबाई यांना कुडाळ येथून बाजार आणून दिला. त्यानंतर ते सुटी संपवून कुटुंबासमवेत मुंबईला निघाले होते. ‘मुंबईत पोहोचताच फोन कर,’ असं आई इंदुबाई यांनी बजावून सांगितले होते. त्यामुळे त्या मुलाच्या फोनच्या प्रतीक्षेत होत्या. मात्र, अचानक त्यांच्या अपघाताची बातमी सांगवीत धडकताच गावात शोककळा पसरली. मुलासह सून आणि नातीच्या मृत्यूची बातमी इंदुबार्इंना कशी सांगायची, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला; परंतु धाडस करून काहींनी इंदुबार्इंना या दुर्दैवी अपघाताची माहिती देताच इंदुबार्इंनी एकच आक्रोश केला. गावासह पंचक्रोशीत वाऱ्यासारखी बातमी पसरली. त्यामुळे सावंत यांच्या घराकडे गर्दी वाढू लागली.ग्रामस्थांना अश्रू अनावररवींद्र सावंत हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांनी मुंबईत व्यवसायात भरभराट करीत आपला व्यवसाय स्थिरस्थावर केला होता. त्यामुळे गावकऱ्यांना त्यांचा अभिमान असायचा; मात्र सावंत कुटुंबावर काळाने घाला घातल्याने गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.