शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याजवळ सहाजण ठार

By admin | Updated: June 12, 2015 00:38 IST

सांगवीवर शोककळा : डंपरची आठ वाहनांना धडक

आंबेगाव बुद्रुक (पुणे) : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एका डंपरने पाच मोटारी, दोन दुचाकी आणि एका सहा आसनी रिक्षाला धडक देत सहाजणांचा बळी घेतला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन मोटारींवरच हा डंपर उलटल्याने मोटारींचा अक्षरश: चक्काचूर झाला. यातील एका मोटारीमधील चारजणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक मुलगी बचावली. मृतांमध्ये सातारा जिल्ह्यामधील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावर वडगाव पुलाजवळ घडला. घटनास्थळावर डंपरमधील खडी पसरली होती.रवींद्र तुकाराम सावंत (वय ३५), सारिका रवींद्र सावंत (३०), रेवती रवींद्र सावंत (१०, सर्व, रा. सांगवी, ता. जावळी, जि. सातारा), सुभाष विनायक चौधरी (२९, रा. सुदाम पाटील चाळ, रामनगर, डोंबिवली), बालाजी तुकाराम राठोड (२५), महेंबर यादव गायकवाड (२३, रा. शिर्गापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत, तर भालचंद्र विठ्ठल कालुरकर (४२), रुपेश राजेंद्र पळसदेवकर (३४) बाळासाहेब विठ्ठल घाडगे (५६), शरद सर्जेराव मोरे (५४) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. डंपर चालक मात्र अपघातानंतर पसार झाला.असा झाला अपघातखडी आणि डांबराचे मिश्रण घेऊन वारज्याच्या दिशेने येणाऱ्या दहा चाकी डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. नऱ्हेजवळील तीव्र (पान १वरून) व्होल्वो बसला धडक दिली. ती एवढी जोरात होती की, बसची एका जीपला धडक बसली. ही बस दुभाजकावर चढून पुढे जात झाडाला धडकल्यामुळे थांबली. सुदैवाने या बसमध्ये कुणी प्रवासी नव्हते. प्रचंड वेगात असलेल्या या डंपरने नंतर तवेरा गाडीला ठोकरले आणि पुढे जाऊन सहा आसनी रिक्षाला धडक दिली. या धडकेत सहा आसनी रिक्षाचे दोन तुकडे झाले. त्यानंतर तीन दुचाकींना धडक देत पुन्हा एका मोटारीला डंपरची धडक बसली. वडगाव पुलाच्या सुरुवातीलाच रस्त्याच्या बाजूला ओम्नी आणि सॅन्ट्रो कार उभ्या होत्या. सॅन्ट्रोमध्ये पाचजण होते.भरधाव डंपरने सॅन्ट्रोला धडक दिल्यानंतर ओम्नीसह तिन्ही गाड्या पुलाचा कठडा तोडून सेवा रस्ता आणि महामार्गाच्या मधे असलेल्या मोकळ्या उतारावर घसरत गेल्या. तेथे मोठ्या झाडांना या गाड्या जाऊन धडकल्यामुळे थांबल्या; परंतु ओम्नी आणि सॅन्ट्रो डंपरखाली दबल्या गेल्या.अग्निशामक दलाच्या जवानांनी कटरच्या साहाय्याने चक्काचूर झालेल्या गाड्यांचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढले. एका मुलीला जिवंत बाहेर काढण्यात त्यांना यश आले.कुडाळ : पुणे येथे झालेल्या अपघातात जावळी तालुक्यातील सांगवी गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सांगवी गाव शोकसागरात बुडाले.रवींद्र सावंत हे कुटुंबीयांसमवेत मुंबईला स्थायिक झाले होते. ते पत्नी सारिका आणि रचना व रेवती या दोन मुलींसमवेत सांगवी या मूळगावी सुटीसाठी आले होते. दरम्यान, गुरुवारी त्यांनी सकाळी आपली वृद्ध आई इंदुबाई यांना कुडाळ येथून बाजार आणून दिला. त्यानंतर ते सुटी संपवून कुटुंबासमवेत मुंबईला निघाले होते. ‘मुंबईत पोहोचताच फोन कर,’ असं आई इंदुबाई यांनी बजावून सांगितले होते. त्यामुळे त्या मुलाच्या फोनच्या प्रतीक्षेत होत्या. मात्र, अचानक त्यांच्या अपघाताची बातमी सांगवीत धडकताच गावात शोककळा पसरली. मुलासह सून आणि नातीच्या मृत्यूची बातमी इंदुबार्इंना कशी सांगायची, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला; परंतु धाडस करून काहींनी इंदुबार्इंना या दुर्दैवी अपघाताची माहिती देताच इंदुबार्इंनी एकच आक्रोश केला. गावासह पंचक्रोशीत वाऱ्यासारखी बातमी पसरली. त्यामुळे सावंत यांच्या घराकडे गर्दी वाढू लागली.ग्रामस्थांना अश्रू अनावररवींद्र सावंत हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांनी मुंबईत व्यवसायात भरभराट करीत आपला व्यवसाय स्थिरस्थावर केला होता. त्यामुळे गावकऱ्यांना त्यांचा अभिमान असायचा; मात्र सावंत कुटुंबावर काळाने घाला घातल्याने गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.