शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याजवळ सहाजण ठार

By admin | Updated: June 12, 2015 00:38 IST

सांगवीवर शोककळा : डंपरची आठ वाहनांना धडक

आंबेगाव बुद्रुक (पुणे) : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एका डंपरने पाच मोटारी, दोन दुचाकी आणि एका सहा आसनी रिक्षाला धडक देत सहाजणांचा बळी घेतला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन मोटारींवरच हा डंपर उलटल्याने मोटारींचा अक्षरश: चक्काचूर झाला. यातील एका मोटारीमधील चारजणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक मुलगी बचावली. मृतांमध्ये सातारा जिल्ह्यामधील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावर वडगाव पुलाजवळ घडला. घटनास्थळावर डंपरमधील खडी पसरली होती.रवींद्र तुकाराम सावंत (वय ३५), सारिका रवींद्र सावंत (३०), रेवती रवींद्र सावंत (१०, सर्व, रा. सांगवी, ता. जावळी, जि. सातारा), सुभाष विनायक चौधरी (२९, रा. सुदाम पाटील चाळ, रामनगर, डोंबिवली), बालाजी तुकाराम राठोड (२५), महेंबर यादव गायकवाड (२३, रा. शिर्गापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत, तर भालचंद्र विठ्ठल कालुरकर (४२), रुपेश राजेंद्र पळसदेवकर (३४) बाळासाहेब विठ्ठल घाडगे (५६), शरद सर्जेराव मोरे (५४) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. डंपर चालक मात्र अपघातानंतर पसार झाला.असा झाला अपघातखडी आणि डांबराचे मिश्रण घेऊन वारज्याच्या दिशेने येणाऱ्या दहा चाकी डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. नऱ्हेजवळील तीव्र (पान १वरून) व्होल्वो बसला धडक दिली. ती एवढी जोरात होती की, बसची एका जीपला धडक बसली. ही बस दुभाजकावर चढून पुढे जात झाडाला धडकल्यामुळे थांबली. सुदैवाने या बसमध्ये कुणी प्रवासी नव्हते. प्रचंड वेगात असलेल्या या डंपरने नंतर तवेरा गाडीला ठोकरले आणि पुढे जाऊन सहा आसनी रिक्षाला धडक दिली. या धडकेत सहा आसनी रिक्षाचे दोन तुकडे झाले. त्यानंतर तीन दुचाकींना धडक देत पुन्हा एका मोटारीला डंपरची धडक बसली. वडगाव पुलाच्या सुरुवातीलाच रस्त्याच्या बाजूला ओम्नी आणि सॅन्ट्रो कार उभ्या होत्या. सॅन्ट्रोमध्ये पाचजण होते.भरधाव डंपरने सॅन्ट्रोला धडक दिल्यानंतर ओम्नीसह तिन्ही गाड्या पुलाचा कठडा तोडून सेवा रस्ता आणि महामार्गाच्या मधे असलेल्या मोकळ्या उतारावर घसरत गेल्या. तेथे मोठ्या झाडांना या गाड्या जाऊन धडकल्यामुळे थांबल्या; परंतु ओम्नी आणि सॅन्ट्रो डंपरखाली दबल्या गेल्या.अग्निशामक दलाच्या जवानांनी कटरच्या साहाय्याने चक्काचूर झालेल्या गाड्यांचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढले. एका मुलीला जिवंत बाहेर काढण्यात त्यांना यश आले.कुडाळ : पुणे येथे झालेल्या अपघातात जावळी तालुक्यातील सांगवी गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सांगवी गाव शोकसागरात बुडाले.रवींद्र सावंत हे कुटुंबीयांसमवेत मुंबईला स्थायिक झाले होते. ते पत्नी सारिका आणि रचना व रेवती या दोन मुलींसमवेत सांगवी या मूळगावी सुटीसाठी आले होते. दरम्यान, गुरुवारी त्यांनी सकाळी आपली वृद्ध आई इंदुबाई यांना कुडाळ येथून बाजार आणून दिला. त्यानंतर ते सुटी संपवून कुटुंबासमवेत मुंबईला निघाले होते. ‘मुंबईत पोहोचताच फोन कर,’ असं आई इंदुबाई यांनी बजावून सांगितले होते. त्यामुळे त्या मुलाच्या फोनच्या प्रतीक्षेत होत्या. मात्र, अचानक त्यांच्या अपघाताची बातमी सांगवीत धडकताच गावात शोककळा पसरली. मुलासह सून आणि नातीच्या मृत्यूची बातमी इंदुबार्इंना कशी सांगायची, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला; परंतु धाडस करून काहींनी इंदुबार्इंना या दुर्दैवी अपघाताची माहिती देताच इंदुबार्इंनी एकच आक्रोश केला. गावासह पंचक्रोशीत वाऱ्यासारखी बातमी पसरली. त्यामुळे सावंत यांच्या घराकडे गर्दी वाढू लागली.ग्रामस्थांना अश्रू अनावररवींद्र सावंत हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांनी मुंबईत व्यवसायात भरभराट करीत आपला व्यवसाय स्थिरस्थावर केला होता. त्यामुळे गावकऱ्यांना त्यांचा अभिमान असायचा; मात्र सावंत कुटुंबावर काळाने घाला घातल्याने गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.