शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
3
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
4
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
5
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
6
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
7
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
8
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
9
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
10
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
11
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
12
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
13
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
14
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
15
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
17
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
18
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
19
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
20
'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

‘तुझे गीत गाण्यासाठी’ सातारकर आतुरलेलेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 00:26 IST

पाडगावकरांच्या जाण्याने हळहळ : पावसातल्या आठवणी जाग्या

सातारा : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असं सांगत कवी मंगेश पाडगावकरांनी श्रोत्यांच्या मनावर जणू गारुड केलं. अशा या ज्येष्ठ कवींचं बुधवारी पहाटे निधन झालं अन् साताराभेटीच्या त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. दीड वर्षांपूर्वी ‘तुझे गीत गाण्यासाठी’ ते साताऱ्यात आले होते. भर पावसातही पाडगावकरांना ऐकण्यासाठी तुडुंब गर्दी झालेली. जणू त्यांच्या काव्यसौंदर्यानं सातारकरांना मोहिनी घातली होती. आताही त्याच कविता ऐकण्यासाठी सातारकर आतुरलेलेच आहेत!पुण्याचे विद्याधर रिसबूड आणि सातारा येथील राजेश जोशी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा शाहूपुरी यांनी दि. १४ जून २०१३ रोजी शाहू कलामंदिरात ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हा कार्यक्रम घेतला होता. त्यात पाडगावकरलिखित गीतांचे सादरीकरण झाले. स्वत: पाडगावकरांनी आपल्या कविता खास शैलीत म्हटल्या होत्या. बाहेर धो-धो पाऊस कोसळत असतानाही सातारकरांनी पाडगावकरांना ऐकण्यासाठी गर्दी केली होती.शाहुपुरी मसाप शाखेचे खजिनदार विनोद कुलकर्णी यांनी मंगेश पाडगावकरांच्या आठवणी जाग्या केल्या. ते म्हणाले, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या कार्यक्रमादिवशी सकाळीच पाडगावकर साताऱ्यात हजर होते. त्यामुळे दिवसभर आणि रात्री जेवतानाही त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारता आल्या. त्यावेळी त्यांचं वय ८४ वर्षांचं होतं. पण वयाचं अंतर न ठेवता त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. (प्रतिनिधी)मुलाखतीतून उलगडला काव्य लेखनाचा प्रवासया कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या मुलाखतीत पाडगावकरांनी सातारा ऐतिहासिक भूमीबद्दल पहिल्यापासून आकर्षण असल्याचे बोलून दाखविले होते. शूरवीरांच्या या भूमीत यायची फार इच्छा होती, तो योग आता ‘तुझे गीत गाण्यासाठी’च्या निमित्तानं आल्याचेही या मुलाखतीतून सांगितले होते. पाडगावकरांनी आपल्या काव्य लेखनाचा प्रवास उलगडला होता. पहिली कविता वयाच्या १४ व्या वर्षी केल्याचे सांगून ही काव्यप्रतिभा आपल्या आईकडून आल्याचेही बोलून दाखविले होते. माझी आई उत्तम काव्यवाचन करत. तिच्याकडूनच काव्यनिर्मितीचं बी माझ्यात रुजलं, अशा अनेक आठवणींचा पट त्यांनी सातारकरांसमोर उलगडून दाखविला होता..साताऱ्याला दुसऱ्यांदा भेटकाही वर्षांपूर्वी नगरवाचनालयातील एका कार्यक्रमासाठी मंगेश पाडगावकर साताऱ्यात आले होते. त्यावेळी पाहुणे म्हणून ते आले होते. मात्र त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे २०१३ मध्ये ते दुसऱ्यांदा ‘तुझे गीत गाण्यासाठी’च्या निमित्ताने साताऱ्यात आले अन् त्यांना समोर बसून ऐकण्याची संधी सातारकरांना लाभली.