शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

‘तुझे गीत गाण्यासाठी’ सातारकर आतुरलेलेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 00:26 IST

पाडगावकरांच्या जाण्याने हळहळ : पावसातल्या आठवणी जाग्या

सातारा : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असं सांगत कवी मंगेश पाडगावकरांनी श्रोत्यांच्या मनावर जणू गारुड केलं. अशा या ज्येष्ठ कवींचं बुधवारी पहाटे निधन झालं अन् साताराभेटीच्या त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. दीड वर्षांपूर्वी ‘तुझे गीत गाण्यासाठी’ ते साताऱ्यात आले होते. भर पावसातही पाडगावकरांना ऐकण्यासाठी तुडुंब गर्दी झालेली. जणू त्यांच्या काव्यसौंदर्यानं सातारकरांना मोहिनी घातली होती. आताही त्याच कविता ऐकण्यासाठी सातारकर आतुरलेलेच आहेत!पुण्याचे विद्याधर रिसबूड आणि सातारा येथील राजेश जोशी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा शाहूपुरी यांनी दि. १४ जून २०१३ रोजी शाहू कलामंदिरात ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हा कार्यक्रम घेतला होता. त्यात पाडगावकरलिखित गीतांचे सादरीकरण झाले. स्वत: पाडगावकरांनी आपल्या कविता खास शैलीत म्हटल्या होत्या. बाहेर धो-धो पाऊस कोसळत असतानाही सातारकरांनी पाडगावकरांना ऐकण्यासाठी गर्दी केली होती.शाहुपुरी मसाप शाखेचे खजिनदार विनोद कुलकर्णी यांनी मंगेश पाडगावकरांच्या आठवणी जाग्या केल्या. ते म्हणाले, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या कार्यक्रमादिवशी सकाळीच पाडगावकर साताऱ्यात हजर होते. त्यामुळे दिवसभर आणि रात्री जेवतानाही त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारता आल्या. त्यावेळी त्यांचं वय ८४ वर्षांचं होतं. पण वयाचं अंतर न ठेवता त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. (प्रतिनिधी)मुलाखतीतून उलगडला काव्य लेखनाचा प्रवासया कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या मुलाखतीत पाडगावकरांनी सातारा ऐतिहासिक भूमीबद्दल पहिल्यापासून आकर्षण असल्याचे बोलून दाखविले होते. शूरवीरांच्या या भूमीत यायची फार इच्छा होती, तो योग आता ‘तुझे गीत गाण्यासाठी’च्या निमित्तानं आल्याचेही या मुलाखतीतून सांगितले होते. पाडगावकरांनी आपल्या काव्य लेखनाचा प्रवास उलगडला होता. पहिली कविता वयाच्या १४ व्या वर्षी केल्याचे सांगून ही काव्यप्रतिभा आपल्या आईकडून आल्याचेही बोलून दाखविले होते. माझी आई उत्तम काव्यवाचन करत. तिच्याकडूनच काव्यनिर्मितीचं बी माझ्यात रुजलं, अशा अनेक आठवणींचा पट त्यांनी सातारकरांसमोर उलगडून दाखविला होता..साताऱ्याला दुसऱ्यांदा भेटकाही वर्षांपूर्वी नगरवाचनालयातील एका कार्यक्रमासाठी मंगेश पाडगावकर साताऱ्यात आले होते. त्यावेळी पाहुणे म्हणून ते आले होते. मात्र त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे २०१३ मध्ये ते दुसऱ्यांदा ‘तुझे गीत गाण्यासाठी’च्या निमित्ताने साताऱ्यात आले अन् त्यांना समोर बसून ऐकण्याची संधी सातारकरांना लाभली.