शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

जनावरांचे बाजार बंद असल्याने व्यापाऱ्यांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील ऊसतोड कामगार सात महिन्यांनंतर परराज्यातून गावी परतले असून, आर्थिक तडजोड करण्यासाठी प्रत्येकवर्षी कारखान्यावरून परतल्यानंतर शेळ्या, ...

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील ऊसतोड कामगार सात महिन्यांनंतर परराज्यातून गावी परतले असून, आर्थिक तडजोड करण्यासाठी प्रत्येकवर्षी कारखान्यावरून परतल्यानंतर शेळ्या, म्हैस, बैल विकून आर्थिक अडचणी सोडवतात; मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावोगावी भरणारे जनावरांचे बाजार बंद आहेत. त्यामुळे शेळ्या, म्हैस, बैल आदी जनावरे विकायची कुठे? असा प्रश्न ऊसतोड मजुरांसमोर उभा राहिला. मंदीत संधी शोधणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांची चांदी झाली आहे.

गरजू मजुरांची अडवणूक करून व्यापारी त्यांना वाटेल त्या किमतीत जनावरे खरेदी करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने राज्यभरात निर्बंध लादले आहेत. संचारबंदी लागू असून, आठवडी बाजार, जनावरांचे बाजार बंद आहेत. यामुळे जनावरांची खरेदी-विक्री बंद आहे. आर्थिक अडचणी असलेल्या लोकांना पशुधन विक्रीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत. पशुधन विकणारे स्वतः होऊन दारात येत असल्याने अतिशय कमी दरात व्यापारी मागणी करतात. म्हैस, बैल, शेळ्या घेताना अतिशय कमी दरात घेतात; मात्र एखाद्या स्थानिक शेतकऱ्याला पशुधनाची खरेदी करायची झाल्यास, त्याला मात्र अव्वाच्या सव्वा किंमत सांगतात.

साखर कारखान्यावरून परतलेल्या मजुरांना आर्थिक तडजोड करून संसार चालविण्यासाठी पशुधन विकायचे आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी जोडधंदा म्हणून जनावरे खरेदी करायची आहेत. मात्र दोघांनाही स्वतः होऊन व्यापाऱ्यांकडे जावे लागत आहे. यात व्यापाऱ्यांची चांदी होत असून, ऊसतोड मजूर आणि शेतकरी या दोघांचीही आर्थिक लूट होताना निदर्शनास येत आहे. कोरोना कधी संपणार? आणि बाजार कधी सुरू होणार? याबद्दल काहीच निश्चित नसल्यामुळे डोळ्यासमोर होणारी लूट गरजवंतांना निमूटपणे सहन करावी लागत आहे. तालुक्यातील म्हसवड, तर माण तालुक्याच्या पूर्व भागाच्या सरहद्दीवर असणाऱ्या आटपाडीला जनावरांचा बाजार भरतो; मात्र सध्या कोरोनामुळे सर्वत्र जमावबंदी असल्याने, बाजार बंद असल्याने, व्यापाऱ्यांकडून गरजवंतांची आर्थिक कोंडी होत आहे.

कोट

व्यापाऱ्यांची मनमानी

साखर कारखान्यांवर ऊसतोडणीस जाताना आम्ही शेळ्या, म्हैस आदी जनावरे खरेदी करतो आणि कारखान्यावरून परतल्यानंतर गरजेपोटी जनावरांची विक्री करून पैसे रिकामे करतो. मात्र सध्या बाजार बंद असल्याने, जनावरे विक्री करणे कठीण झाले आहे. व्यापारी स्वतःची मनमानी करीत त्यांना हव्या त्या भावात जनावरे खरेदी करत आहेत. यामुळे आर्थिक नुकसान आम्हालाच सहन करावे लागत आहे.

- रमेश बनसोडे,

ऊसतोडणी मजूर, वरकुटे-मलवडी.