शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

प्रवेशासाठी ससेहोलपट !

By admin | Updated: July 2, 2016 23:57 IST

वाई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आॅनलाईन प्रवेशप्रकिया बारगळली

कवठे : शासकीय व खासगी आयटीआयच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची व्यवस्था व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली असली तरी या आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रकियेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. ही प्रक्रिया २४ जूनच्या दरम्यान सुरू होणार होती. काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली व त्याची जाहिरात करण्यात आली होती. ही प्रक्रिया २७ जूनपासून नव्याने सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. प्रक्रिया सुरू झालीही; पण त्यामध्ये असंख्य अडथळे येऊ लागले. सुरुवातीला विद्यार्थ्यांची नोंदणी होत नव्हती तर गेले चार दिवस सर्व आॅनलाईन माहिती दिल्यानंतर पासवर्ड द्या व पासवर्ड तपासा, अशी सूचना येत होती. या दोन्ही ठिकाणी पासवर्ड दिला असता व नोंदणी प्रक्रिया निश्चित करा या बटणावर क्लिक केल्यानंतर पासवर्ड द्या, अशी माहिती स्क्रीनवर दाखवली जात आहे. या पानाला दोन मिनिटांत प्रतिसाद न दिल्यास आपण या प्रक्रियेतून बाहेर पडाल, अशा प्रकारची सूचना वजा माहिती संगणकाच्या पडद्यावर दाखविली जाते आहे. एकदा पासवर्ड दिल्यानंतर पुन्हा पासवर्ड द्या, असा संदेश संगणकाच्या पडद्यावर आल्यानंतर विद्यार्थ्यांना काहीच करता येत नाही. या प्रक्रियेमध्ये संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारे दुरुस्ती करण्यात आली नसून, याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. थोड्या-थोड्या कालावधीने विद्यार्थी आॅनलाईन फॉर्म भरण्याचा प्रयत्न करीत असून, यामध्ये त्यांच्या वेळेचा व पैशाचा नाहक अपव्यय होत आहे. एकीकडे नोंदणीसंदर्भात पूर्ण माहिती नसल्याने व कागदपत्रांची जुळवणी करताना विद्यार्थ्यांची व पालकांचीही धावपळ होत असल्याने या प्रक्रियेतून कधी एकदा नोंदणी करून मुक्तता होतेय असेच पालकांसह विद्यार्थ्यांना वाटत आहे. (वार्ताहर) रात्री दोन-तीन वाजताही फॉर्म भरण्यासाठी धडपड एकाच वेळी सगळीकडे फॉर्म भरले जात असल्याने सर्व्हरवर लोड असेल व त्यामुळे आपला फॉर्म भरला जात नाही, असा समज होऊन काही विद्यार्थी रात्रीचे जागे राहून सायबर कॅफेमध्ये जाऊन हे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु सध्या ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महाविद्यालयात प्रवेश मिळेपर्यंत प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. त्यातच आॅनलाईन यंत्रणेतील बिघाडामुळे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे. सलग तीन तास घालवूनही संबंधित पान सुरू झाले नाही, त्यामुळे एक-एक दिवस वाया जात आहे. यावर तातडीने उपाय करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. - गजानन गायकवाड, पालक