शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

प्रवेशासाठी ससेहोलपट !

By admin | Updated: July 2, 2016 23:57 IST

वाई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आॅनलाईन प्रवेशप्रकिया बारगळली

कवठे : शासकीय व खासगी आयटीआयच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची व्यवस्था व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली असली तरी या आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रकियेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. ही प्रक्रिया २४ जूनच्या दरम्यान सुरू होणार होती. काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली व त्याची जाहिरात करण्यात आली होती. ही प्रक्रिया २७ जूनपासून नव्याने सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. प्रक्रिया सुरू झालीही; पण त्यामध्ये असंख्य अडथळे येऊ लागले. सुरुवातीला विद्यार्थ्यांची नोंदणी होत नव्हती तर गेले चार दिवस सर्व आॅनलाईन माहिती दिल्यानंतर पासवर्ड द्या व पासवर्ड तपासा, अशी सूचना येत होती. या दोन्ही ठिकाणी पासवर्ड दिला असता व नोंदणी प्रक्रिया निश्चित करा या बटणावर क्लिक केल्यानंतर पासवर्ड द्या, अशी माहिती स्क्रीनवर दाखवली जात आहे. या पानाला दोन मिनिटांत प्रतिसाद न दिल्यास आपण या प्रक्रियेतून बाहेर पडाल, अशा प्रकारची सूचना वजा माहिती संगणकाच्या पडद्यावर दाखविली जाते आहे. एकदा पासवर्ड दिल्यानंतर पुन्हा पासवर्ड द्या, असा संदेश संगणकाच्या पडद्यावर आल्यानंतर विद्यार्थ्यांना काहीच करता येत नाही. या प्रक्रियेमध्ये संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारे दुरुस्ती करण्यात आली नसून, याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. थोड्या-थोड्या कालावधीने विद्यार्थी आॅनलाईन फॉर्म भरण्याचा प्रयत्न करीत असून, यामध्ये त्यांच्या वेळेचा व पैशाचा नाहक अपव्यय होत आहे. एकीकडे नोंदणीसंदर्भात पूर्ण माहिती नसल्याने व कागदपत्रांची जुळवणी करताना विद्यार्थ्यांची व पालकांचीही धावपळ होत असल्याने या प्रक्रियेतून कधी एकदा नोंदणी करून मुक्तता होतेय असेच पालकांसह विद्यार्थ्यांना वाटत आहे. (वार्ताहर) रात्री दोन-तीन वाजताही फॉर्म भरण्यासाठी धडपड एकाच वेळी सगळीकडे फॉर्म भरले जात असल्याने सर्व्हरवर लोड असेल व त्यामुळे आपला फॉर्म भरला जात नाही, असा समज होऊन काही विद्यार्थी रात्रीचे जागे राहून सायबर कॅफेमध्ये जाऊन हे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु सध्या ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महाविद्यालयात प्रवेश मिळेपर्यंत प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. त्यातच आॅनलाईन यंत्रणेतील बिघाडामुळे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे. सलग तीन तास घालवूनही संबंधित पान सुरू झाले नाही, त्यामुळे एक-एक दिवस वाया जात आहे. यावर तातडीने उपाय करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. - गजानन गायकवाड, पालक