शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सिद्धेवाडीच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: September 15, 2015 00:45 IST

विषप्राशन : दहा महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; वडील प्रगतशील शेतकरी

सावळज : तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी येतील तरुण शेतकरी प्रदीप दगडू चव्हाण (वय २७) यांनी सोमवारी चव्हाण वस्ती येथील घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. वडिलांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. प्रदीप यांचे वडील दगडू चव्हाण परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांची १३ एकर शेती असून, त्यापैकी नऊ एकरवर शेवगा व तीन एकरवर द्राक्षबाग आहे. त्यांनी शेतीसाठी कर्ज काढले होते. प्रदीप चव्हाण आई, वडील, पत्नी, भाऊ व वहिनी यांच्यासह राहत होते. वडिलांना शेतीत मदत करत होते. शेतीतील अडचणीमुळे उत्पन्न कमी मिळत होते. त्यातच कर्जाचा डोंगर वाढल्याने आर्थिक विवंचनेतून प्रदीप यांनी सोमवारी विषारी द्रव्य प्राशन केले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र रस्त्यातच त्यांचे निधन झाले. प्रदीप चव्हाण यांचे १० महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून, लग्नाला वर्षही पूर्ण व्हायच्या आत घडलेल्या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पंधरवड्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या दि. ३ सप्टेंबर रोजी मणेराजुरी (ता. तासगाव) येथील किरण बाबासाहेब जमदाडे या तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या घटनेला १५ दिवस झाले नाहीत तोच सिद्धेवाडीतील प्रदीप दगडू चव्हाण या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. कर्जाचा ससेमिरा २००३-२००४ च्या दुष्काळामध्ये दगडू चव्हाण यांची द्राक्षबाग पाण्याअभावी जळून गेली होती. त्यानंतर त्यांनी त्या क्षेत्रामध्ये डाळिंबाची लागवड केली. मात्र वातावरणामुळे त्यांना डाळिंबातून फारसे उत्पन्न न मिळाल्याने परत शेवगा व द्राक्षबाग लावली होती. दरम्यान शेतीसाठीचे कर्ज वाढतच गेले व अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने प्रदीप यांनी आत्महत्या केली.