शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

शुभमंगल @ बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:04 IST

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : विवाह म्हणजे विश्वासाचा सोहळा; पण सध्या याच सोहळ्यात बनवाबनवीचा फंडा वापरला जातोय. विवाह लाऊन देण्याच्या नावाखाली बोगसगिरी केली जातेय. इच्छूकांना लाखो रूपयांचा गंडा घातला जात असून वाग्दत्त वराला मुलगी दाखविण्यापासुन ते अक्षता टाकण्यापर्यंतचे सगळे कार्यक्रम बनावट पद्धतीने उरकले जातायत.कºहाड तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचे एकापाठोपाठ ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : विवाह म्हणजे विश्वासाचा सोहळा; पण सध्या याच सोहळ्यात बनवाबनवीचा फंडा वापरला जातोय. विवाह लाऊन देण्याच्या नावाखाली बोगसगिरी केली जातेय. इच्छूकांना लाखो रूपयांचा गंडा घातला जात असून वाग्दत्त वराला मुलगी दाखविण्यापासुन ते अक्षता टाकण्यापर्यंतचे सगळे कार्यक्रम बनावट पद्धतीने उरकले जातायत.कºहाड तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचे एकापाठोपाठ दोन गुन्हे दाखल झाले. लग्न लाऊन देण्याच्या नावाखाली काही जणांनी फसवणूक केल्याचे नवरदेवांचे म्हणणे आहे. संबंधितांनी पोलिसांना विवाहाची जी ‘स्टोरी’ सांगीतली, तीही एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी आहे. बनावट लग्नाच्या या कथानकाला विवाह इच्छूक सावज शोधण्यापासुनच सुरूवात होते. ज्यांची लग्न रखडली आहेत, असे युवक शोधून त्यांना आपल्या जाळ्यात ओढणारी टोळी कार्यरत आहे. या टोळीत कºहाड तालुक्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काहीजणांचा सहभाग आहे. ज्यांना विवाह करायचा आहे, असे युवक शोधून हे संशयीत त्यांना तात्काळ लग्न लाऊन देण्याचे अमिष दाखवतात. सांगली किंवा कोल्हापुरला नेऊन त्याठिकाणी मुलगी दाखविण्याचा कार्यक्रमही पार पाडला जातो. पसंती झाल्यानंतर विवाह लाऊन देण्यासाठी लाखोत रक्कम सांगीतली जाते. तसेच मुलीची परिस्थिती नसल्याने तिला दागिने घालण्यासही सांगण्यात येते. एवढे दिवस रखडलेले लग्न होऊ घातल्याने इच्छूक वरही पैसे आणि दागिने देण्यास तयार होतात. वराकडून पैसे मिळाल्यानंतर त्याचठिकाणी अथवा आसपासच्या मंदिरात वधु-वराला हार घालण्याचा आणि अक्षदा टाकण्याचा कार्यक्रम घेतला जातो. हा बनावट विवाह पार पडताच वराकडून ही टोळी पैसे उकळते. त्यानंतर दोनच दिवसात फिरायला जाण्याचा बहाणा करीत नववधु आपल्या पतीला परगावी घेऊन जाते. आणि तेथुनच त्याची नजर चुकवून ती दागिन्यांसह पसार होते.फसवणुकीत महिलांचाही सहभागकºहाड तालुका पोलीस ठाण्यात १५ जानेवारी २०१८ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात इचलकरंजी येथील एका महिलेचा समावेश आहे. तसेच त्यावेळीही इच्छूक वराला एक युवती दाखविण्यात आली होती. जी लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी पळून गेली. तर फसवणुकीची दुसरी फिर्याद २२ मार्च रोजी दाखल झाली. फिर्याद देणाºया संबंधित युवकालाही कोल्हापुरात आरती नावाच्या युवतीला भेटविण्यात आले होते. तसेच तिच्यासोबत त्याचा विवाहही लाऊन देण्यात आला होता.लग्नासाठी इच्छुकाने जमिनही विकलीलग्नाच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याची तक्रार देणाºया एका इच्छूक वराने विवाहासाठी जमिन विकल्याचा प्रकारही पोलीस तपासातून समोर आला आहे. जमिन विकून मिळालेले पैसे त्याने विवाह ठरविणाºयांना दिले होते. तसेच त्याच पैशातून त्याने आपल्या होणाºया पत्नीला दागिनेही खरेदी केले होते. मात्र, पैसे घेऊन संबंधित व्यक्ती तसेच विवाहानंतर दागिने घेऊन संबंधित युवती पसार झाली आहे.