शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

नीरा-देवघरच्या पाण्यासाठी वाघोशी ग्रामस्थांचे श्रमदान

By admin | Updated: May 3, 2017 14:53 IST

खंडाळा तालुका : प्रशासनाकडून कालव्याच्या कामाला उरक नसल्याने निर्णय

आॅनलाईन लोकमतखंडाळा (जि. सातारा), दि. 03 : नीरा-देवघरच्या पाण्यासाठी डोळे लावून बसलेल्या ग्रामस्थांच्या डोळ्यातून पाणी येण्याची परिस्थिती निर्माण झाली तरी कामाचा उरक नसल्याने वाघोशी ग्रामस्थांनी चक्क कालव्याच्या कामालाच हात घातला. काही करून पाणी मिळवायचेच असा निर्धार करून गावाने एकजुटीने श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. दिवसभर कडक उन्हात पाण्यासाठी घाम गाळला.

नीरा-देवघर प्रकल्पाच्या खंडाळ्यातील कालव्याचे काम गेली अनेक वर्षे संथ गतीने सुरू आहे. वास्तविक, या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाही यापूर्वी मिळालेल्या आश्वासनानुसार नीरा-देवघरचे पाणी मिळाले नाही. पाण्यासाठी ग्रामस्थांना टाहो फोडावा लागत आहे. विशेषत: पूर्व भागातील वाघोशी, कराडवाडी, अंदोरी या तीन गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गत आठवड्यात कालव्याचे काम पूर्ण करून पाणी सोडण्यासाठी ग्रामस्थांनी राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना निवेदन दिले होते. तर आमदार मकरंद पाटील यांनी वाई येथील बैठकीत अपूर्ण पुलाच्या जागी सिमेंट पाईप टाकून तात्पुरते पाणी वाघोशीपर्यंत सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार पाईप आणून काम सुरू झाले. मात्र, मनुष्यबळाअभावी काम होणे अशक्य असल्याने वाघोशी ग्रामस्थांनीच पाईप बसविणे, भरावा घालण्यासाठी मदत केली.

खंडाळा तालुक्यात नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. तालुक्यातील वाघोशीपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आश्वासन दिले होते. त्यानुसार या कालव्याचे काम गतीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे पाणी येणार हे आश्वासन हवेतच विरले. आता या भागातील वाघोशी, कराडवाडी या दोन गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावच्या पाणीपुरवठा विहिरींनी तळ गाठल्याने तीन दिवसांतून एकदाच पाणी मिळते. त्यामुळे मिळेल तेवढ्याच पाण्यात सर्व कामे करावी लागतात. अथवा पाण्यासाठी आसपास तसेच दूरवरच्याही विहिरींवरून महिलांना पाणी घेऊन यावे लागत आहे.

या कालव्याच्या मोर्वे येथील पुलाचे काम अर्धवटच आहे. त्यामुळे पाणी पुढे जाऊ शकणार नाही. या ठिकाणी पुलाच्या दोन स्लॅबच्यामध्ये तात्पुरत्या स्वरुपात सिमेंट पाईप टाकून पाणी गरजेपुरते पुढे नेले जाऊ शकते, हे लक्षात आल्यावर कामाची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आता वाघोशीपर्यंत पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)या कालव्याचे मोर्वे येथील रखडलेले काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. वाघोशी गावात दरवर्षी पाण्याची समस्या बिकट होत असते. सध्या गावच्या विहिरी आटल्या आहेत. पाण्यासाठी गावाने श्रमदान करायचे ठरवले होते. - लक्ष्मण धायगुडे,

माजी सरपंच, वाघोशी