शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

नीरा-देवघरच्या पाण्यासाठी वाघोशी ग्रामस्थांचे श्रमदान

By admin | Updated: May 3, 2017 14:53 IST

खंडाळा तालुका : प्रशासनाकडून कालव्याच्या कामाला उरक नसल्याने निर्णय

आॅनलाईन लोकमतखंडाळा (जि. सातारा), दि. 03 : नीरा-देवघरच्या पाण्यासाठी डोळे लावून बसलेल्या ग्रामस्थांच्या डोळ्यातून पाणी येण्याची परिस्थिती निर्माण झाली तरी कामाचा उरक नसल्याने वाघोशी ग्रामस्थांनी चक्क कालव्याच्या कामालाच हात घातला. काही करून पाणी मिळवायचेच असा निर्धार करून गावाने एकजुटीने श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. दिवसभर कडक उन्हात पाण्यासाठी घाम गाळला.

नीरा-देवघर प्रकल्पाच्या खंडाळ्यातील कालव्याचे काम गेली अनेक वर्षे संथ गतीने सुरू आहे. वास्तविक, या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाही यापूर्वी मिळालेल्या आश्वासनानुसार नीरा-देवघरचे पाणी मिळाले नाही. पाण्यासाठी ग्रामस्थांना टाहो फोडावा लागत आहे. विशेषत: पूर्व भागातील वाघोशी, कराडवाडी, अंदोरी या तीन गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गत आठवड्यात कालव्याचे काम पूर्ण करून पाणी सोडण्यासाठी ग्रामस्थांनी राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना निवेदन दिले होते. तर आमदार मकरंद पाटील यांनी वाई येथील बैठकीत अपूर्ण पुलाच्या जागी सिमेंट पाईप टाकून तात्पुरते पाणी वाघोशीपर्यंत सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार पाईप आणून काम सुरू झाले. मात्र, मनुष्यबळाअभावी काम होणे अशक्य असल्याने वाघोशी ग्रामस्थांनीच पाईप बसविणे, भरावा घालण्यासाठी मदत केली.

खंडाळा तालुक्यात नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. तालुक्यातील वाघोशीपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आश्वासन दिले होते. त्यानुसार या कालव्याचे काम गतीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे पाणी येणार हे आश्वासन हवेतच विरले. आता या भागातील वाघोशी, कराडवाडी या दोन गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावच्या पाणीपुरवठा विहिरींनी तळ गाठल्याने तीन दिवसांतून एकदाच पाणी मिळते. त्यामुळे मिळेल तेवढ्याच पाण्यात सर्व कामे करावी लागतात. अथवा पाण्यासाठी आसपास तसेच दूरवरच्याही विहिरींवरून महिलांना पाणी घेऊन यावे लागत आहे.

या कालव्याच्या मोर्वे येथील पुलाचे काम अर्धवटच आहे. त्यामुळे पाणी पुढे जाऊ शकणार नाही. या ठिकाणी पुलाच्या दोन स्लॅबच्यामध्ये तात्पुरत्या स्वरुपात सिमेंट पाईप टाकून पाणी गरजेपुरते पुढे नेले जाऊ शकते, हे लक्षात आल्यावर कामाची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आता वाघोशीपर्यंत पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)या कालव्याचे मोर्वे येथील रखडलेले काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. वाघोशी गावात दरवर्षी पाण्याची समस्या बिकट होत असते. सध्या गावच्या विहिरी आटल्या आहेत. पाण्यासाठी गावाने श्रमदान करायचे ठरवले होते. - लक्ष्मण धायगुडे,

माजी सरपंच, वाघोशी