शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

रेशनिंगसाठी दुकानदारांचा कऱ्हाडात मोर्चा

By admin | Updated: February 10, 2015 23:57 IST

हजारोंचा सहभाग : दुकानदारांसह लाभधारक महिलांची लक्षणीय उपस्थिती

कऱ्हाड : ‘आमच्या मागण्या पूर्ण करा; रॉकेल-धान्य चालू करा’ अशी घोषणाबाजी करीत रॉकेलची रोख सबसिडी तत्काळ रद्द करून बायोमेट्रीक पध्दत बंद करावी, अशा अकरा मागण्यांसाठी मंगळवारी कऱ्हाड येथे स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल विक्रे ते संघटनतर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांसह हजारो लाभधारक नागरिक सहभागी झाले होते. आॅल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व पुण्यातील रॉकेल परवानाधारक महासंघ व कऱ्हाड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांसह तालुक्यातील गावागावातून आलेल्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला. पंचायत समितीपासून सकाळी ११.३० वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. दत्तचौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा दत्त चौकातून भेदा चौकात व तेथून स्थलांतरित झालेल्या मार्केट यार्डमधील तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. संघटनेचे राज्याध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब तोडकरी, तालुका अध्यक्ष व मोर्चाचे मुख्य संयोजक अशोकराव पाटील, उपाध्यक्ष के.एम.पवार, खजिनदार सुरेश पाटील, शंकर रामुगडे, तुकाराम देसाई, सचिन इनामदार, प्रदीप शिर्के, वि. तु. सुकरे, बाळासाहेब पाटील आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.स्वस्त धान्य व रॉकेल विक्रेता संघटनेतर्फे निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांना एकूण १३ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रतिव्यक्ती रॉकेल कोटा २ लिटर मिळावा, शुभ्र कार्डधारकांना रॉकेल दिले जावे, रेशनकार्डवरील अनुदानाबदल्यात धान्य मिळावे, शासनाने रेशन धान्य दुकानामध्ये बसविण्यात येणारी बायोमेट्रीक पद्धतीचे यंत्र बंद करावे, २ गॅस सिलिंडर धारकांना रॉकेल दिले जावे, रेशनकार्डवरील साखर, पामतेल, डाळ, गहू, तांदूळ यासारख्या जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात, बी. पी. एल. व अंत्योदय कार्डवरील धान्य सुरू करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये केले जाणारे बदल याविषयी जनतेला माहिती देण्यात यावी, अशा मागण्या संघटनेद्वारे करण्यात आल्या.यावेळी तालुकाध्यक्ष अशोक पाटील म्हणाले, ‘शासन कोणतेही असो परंतु जनतेचा आवाज हा त्या शासनाला जागे केल्याशिवाय राहत नाही. या मोर्चातून सामान्य जनतेसाठी मोठा लढा उभा केला आहे. तो तसाच पुढे चालू ठेवणार आहे.’ (प्रतिनिधी)राज्यकर्त्यांनाच अच्छे दिनपंतप्रधान नरेंद्र मोदींनी अच्छे दिन आणतो, असे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या भुलभुलैय्याला भुलून सर्वांनी त्यांना निवडून दिले. मात्र, आता त्यांचेच अच्छे दिन आले असून आपल्याला बुरे दिन पाहायला मिळत आहेत, असे आप्पासाहेब गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले.रणरागिणींचा आक्रमकपणाग्रामिण भागातील महिलांनी रेशनिंग धान्याबाबत आज आक्रमक पवित्रा घेतला होता. रानात मजुरीसाठी जाणाऱ्या महिला आज मात्र प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे पहावयास मिळाले. या महिलांनी शासनाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.