शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावच्या पाण्याच्या टाक्या बनल्या शोपीस!

By admin | Updated: July 27, 2015 23:01 IST

येरळवाडी पाणीपुरवठा योजना बंद : औंधसह एकवीस गावांमधील स्थिती; लाखो रुपये पाण्यात

औंध : औंधसह २१ गावांसाठी दुष्काळी भागातील जनतेसाठी सुरू केलेली येरळवाडी मध्यम प्रकल्पाची नळ पाणीपुरवठा योजना १९९९ साली सुरू झाली. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून ही योजना थकबाकी, अनियमितता यामुळे योजना बंद असून प्रत्येक गावात लाखो रुपये खर्चून बांधलेल्या पाण्याच्या टाक्या शोपीस बनल्या आहेत. या योजनेत औंधसह निमसोड जायगाव म्हासुर्णे, नांदोशी, खबालवाडी, गणेशवाडी, गोसाव्याची वाडी, नागाचे कुमठे, गोपूज, पळशी, खरशिंगे, होळीचे गाव, सिद्धेश्वर कुरोली, वरुड व अन्य सहा गावांचा समावेश करण्यात आला होता. या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे या गावांना पाणीटंचाईपासून सुटका मिळाली होती. निदान आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला, यामुळे गावातील दुष्काळी जनता फार खुश होती. परंतु मागील काही वर्षांपासून या योजनेला घरघर लागल्याने औंधसह २१ गावांतील लोकांचा मोठा भ्रमनिरास झाला. यामुळे पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू झाली आहे.ही योजना बंद झाल्यापासून काही गावांनी आपल्या गावासाठी स्वतंत्र पाणीयोजना मंजूर करून आणली. तर काही गावांनी आपल्या गावातील जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेला संजीवनी दिली. यामुळे यातून काही गावे पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाली.सद्य:स्थितीत अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांनी या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने या येरळवाडी नळ पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या पाण्याच्या टाक्या पाईपलाईन मोटारी धूळखात पडल्या आहेत. औंध परिसरातील अनेक गावे, वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईस सोमोरे जावे लागत आहे. लाखो रुपयांची प्रत्येक गावांची असलेली थकबाकीवर शासन पातळीवर तोडगा काढून ही योजना सुरू व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. (वार्ताहर)करवसुली होता होईना...पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गावोगावच्या ग्रामपंचायतीने कर वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. अगोदर नळाला पाणी येऊ दे, मग पाणीपट्टी मागा, असे ग्रामस्थांकडून सुनावले जात आहे, त्यामुळे करवसुली होता होत नाही.बोअरवेलची संख्या वाढलीयेरळवाडी पाणीपुरवठा योजना बंद झाल्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. गावोगावी लोकांनी आपापल्या वाड्या-वस्त्या, भावकी यामध्ये सामाईक बोअरवेल घेतल्या आहेत, तर काही लोकांनी घरटी बोअरवेल घेतल्या असून वैयक्तिक पाणीप्रश्न सोडविला आहे.