शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

गावोगावच्या पाण्याच्या टाक्या बनल्या शोपीस!

By admin | Updated: July 27, 2015 23:01 IST

येरळवाडी पाणीपुरवठा योजना बंद : औंधसह एकवीस गावांमधील स्थिती; लाखो रुपये पाण्यात

औंध : औंधसह २१ गावांसाठी दुष्काळी भागातील जनतेसाठी सुरू केलेली येरळवाडी मध्यम प्रकल्पाची नळ पाणीपुरवठा योजना १९९९ साली सुरू झाली. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून ही योजना थकबाकी, अनियमितता यामुळे योजना बंद असून प्रत्येक गावात लाखो रुपये खर्चून बांधलेल्या पाण्याच्या टाक्या शोपीस बनल्या आहेत. या योजनेत औंधसह निमसोड जायगाव म्हासुर्णे, नांदोशी, खबालवाडी, गणेशवाडी, गोसाव्याची वाडी, नागाचे कुमठे, गोपूज, पळशी, खरशिंगे, होळीचे गाव, सिद्धेश्वर कुरोली, वरुड व अन्य सहा गावांचा समावेश करण्यात आला होता. या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे या गावांना पाणीटंचाईपासून सुटका मिळाली होती. निदान आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला, यामुळे गावातील दुष्काळी जनता फार खुश होती. परंतु मागील काही वर्षांपासून या योजनेला घरघर लागल्याने औंधसह २१ गावांतील लोकांचा मोठा भ्रमनिरास झाला. यामुळे पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू झाली आहे.ही योजना बंद झाल्यापासून काही गावांनी आपल्या गावासाठी स्वतंत्र पाणीयोजना मंजूर करून आणली. तर काही गावांनी आपल्या गावातील जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेला संजीवनी दिली. यामुळे यातून काही गावे पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाली.सद्य:स्थितीत अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांनी या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने या येरळवाडी नळ पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या पाण्याच्या टाक्या पाईपलाईन मोटारी धूळखात पडल्या आहेत. औंध परिसरातील अनेक गावे, वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईस सोमोरे जावे लागत आहे. लाखो रुपयांची प्रत्येक गावांची असलेली थकबाकीवर शासन पातळीवर तोडगा काढून ही योजना सुरू व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. (वार्ताहर)करवसुली होता होईना...पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गावोगावच्या ग्रामपंचायतीने कर वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. अगोदर नळाला पाणी येऊ दे, मग पाणीपट्टी मागा, असे ग्रामस्थांकडून सुनावले जात आहे, त्यामुळे करवसुली होता होत नाही.बोअरवेलची संख्या वाढलीयेरळवाडी पाणीपुरवठा योजना बंद झाल्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. गावोगावी लोकांनी आपापल्या वाड्या-वस्त्या, भावकी यामध्ये सामाईक बोअरवेल घेतल्या आहेत, तर काही लोकांनी घरटी बोअरवेल घेतल्या असून वैयक्तिक पाणीप्रश्न सोडविला आहे.