शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावच्या पाण्याच्या टाक्या बनल्या शोपीस!

By admin | Updated: July 27, 2015 23:01 IST

येरळवाडी पाणीपुरवठा योजना बंद : औंधसह एकवीस गावांमधील स्थिती; लाखो रुपये पाण्यात

औंध : औंधसह २१ गावांसाठी दुष्काळी भागातील जनतेसाठी सुरू केलेली येरळवाडी मध्यम प्रकल्पाची नळ पाणीपुरवठा योजना १९९९ साली सुरू झाली. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून ही योजना थकबाकी, अनियमितता यामुळे योजना बंद असून प्रत्येक गावात लाखो रुपये खर्चून बांधलेल्या पाण्याच्या टाक्या शोपीस बनल्या आहेत. या योजनेत औंधसह निमसोड जायगाव म्हासुर्णे, नांदोशी, खबालवाडी, गणेशवाडी, गोसाव्याची वाडी, नागाचे कुमठे, गोपूज, पळशी, खरशिंगे, होळीचे गाव, सिद्धेश्वर कुरोली, वरुड व अन्य सहा गावांचा समावेश करण्यात आला होता. या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे या गावांना पाणीटंचाईपासून सुटका मिळाली होती. निदान आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला, यामुळे गावातील दुष्काळी जनता फार खुश होती. परंतु मागील काही वर्षांपासून या योजनेला घरघर लागल्याने औंधसह २१ गावांतील लोकांचा मोठा भ्रमनिरास झाला. यामुळे पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू झाली आहे.ही योजना बंद झाल्यापासून काही गावांनी आपल्या गावासाठी स्वतंत्र पाणीयोजना मंजूर करून आणली. तर काही गावांनी आपल्या गावातील जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेला संजीवनी दिली. यामुळे यातून काही गावे पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाली.सद्य:स्थितीत अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांनी या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने या येरळवाडी नळ पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या पाण्याच्या टाक्या पाईपलाईन मोटारी धूळखात पडल्या आहेत. औंध परिसरातील अनेक गावे, वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईस सोमोरे जावे लागत आहे. लाखो रुपयांची प्रत्येक गावांची असलेली थकबाकीवर शासन पातळीवर तोडगा काढून ही योजना सुरू व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. (वार्ताहर)करवसुली होता होईना...पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गावोगावच्या ग्रामपंचायतीने कर वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. अगोदर नळाला पाणी येऊ दे, मग पाणीपट्टी मागा, असे ग्रामस्थांकडून सुनावले जात आहे, त्यामुळे करवसुली होता होत नाही.बोअरवेलची संख्या वाढलीयेरळवाडी पाणीपुरवठा योजना बंद झाल्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. गावोगावी लोकांनी आपापल्या वाड्या-वस्त्या, भावकी यामध्ये सामाईक बोअरवेल घेतल्या आहेत, तर काही लोकांनी घरटी बोअरवेल घेतल्या असून वैयक्तिक पाणीप्रश्न सोडविला आहे.