शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पेरू आणायला गेलेल्या मुलाचा शॉक लागून मृत्यू

By admin | Updated: July 4, 2016 00:11 IST

वडगाव हवेलीतील घटना : उसात पडलेल्या तारेत अडकला पाय

वडगाव हवेली : पेरू आणण्यासाठी मित्रासोबत शिवारामध्ये गेलेल्या मुलाचा शेतात पडलेल्या वीज तारेत अडकून शॉक लागल्याने मृत्यू झाला. वडगाव हवेली येथील चव्हाण मळा रस्त्यावर ‘देशपांडके’ नावाच्या शिवारात रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय सुरेश मुळीक (वय १५, कार्वे-मुळीकमळा, ता. कऱ्हाड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव हवेली येथे चव्हाण मळा रस्त्यावर देशपांडके नावाचे शिवार आहे. या शिवारातून वीजवाहक तारा गेल्या आहेत. संबंधित तारेमधील वीजपुरवठा अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे हे खांब हटवून तारा काढाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी वीजवितरण कंपनीकडे केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वीज प्रवास सुरू नसल्याने त्या तारांकडे कोणीही लक्ष देत नव्हते. अशातच गत काही महिन्यांपासून या तारा लोंबकळत होत्या. काही ठिकाणी तारांचा पिकालाही स्पर्श होत होता. मात्र, प्रवाह नसल्याने शेतकरीही निर्धास्त होते. रविवारी कार्वे-मुळीकमळा येथील अक्षय मुळीक हा मुलगा त्याच्या एका मित्रासमवेत देशपांडके शिवारात पेरू आणण्यासाठी गेला होता. पेरूचे झाड उसाच्या बांधावर असल्याने दोघे मित्र उसातून वाट काढीत बांधाकडे निघाले होते. त्याचवेळी उसात तुटून पडलेली वीज तार अक्षयच्या पायाखाली आली. त्यामुळे त्याला जोराचा धक्का बसून तो तेथेच कोसळला. या घटनेमुळे घाबरलेला मित्र तेथून पळाला. त्याने आपल्या घरी जाऊन या घटनेची माहिती दिली. गावातून ग्रामस्थ त्याठिकाणी येईपर्यंत शेतात काम करणाऱ्या काही ग्रामस्थांनी अक्षयला उसात निपचित पडल्याचे पाहिले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता अक्षयचा जागीच मृत्यू झाला होता. संबंधित तारेतून वीजप्रवाह सुरू नसला तरी पावसामुळे प्रवाह उलटा वाहत असावा व त्यामुळेच अक्षयचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वीजकंपनीच्या कारभारामुळे मुलाचा नाहक बळी गेल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात आला. (वार्ताहर) दूरक्षेत्र असूनही पोलिस गायब... वडगाव हवेली येथे पोलिस दूरक्षेत्र आहे. मात्र, तेथे अपवाद वगळता कधीही अधिकारी किंवा कर्मचारी फिरकत नाहीत. रविवारी घटनेनंतर काही ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. मात्र, उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळी आले नव्हते. वाटेत आहे, पावसात अडकलोय, अशी उत्तरे त्यांच्याकडून दिली जात होती. त्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.