शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

भाजपच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन..

By admin | Updated: May 11, 2017 23:03 IST

भाजपच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन..

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी आहे. बेताल वक्तव्य करून त्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरेल. बळीराजाची चालवलेली मस्करी कदापिही खपवून घेणार नाही. त्यामुळे रावसाहेब दानवेंनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,’ अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना कऱ्हाड येथे दत्त चौकात गुरुवारी शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुकाप्रमुख विनायक भोसले, शहरप्रमुख शशिराज करपे, किरण नलवडे, मयूर देशपांडे, महेश पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.हर्षद कदम म्हणाले, ‘एकीकडे शेतकरी चहूबाजूंनी संकटात आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबविण्याची गरज असताना जबाबदार व्यक्तींकडून अशी वक्तव्य केली जात आहेत. जालन्यातील कार्यकर्ता मेळाव्यात राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली तरीही रडगाणं चालूच आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. त्यांच्या या वक्तव्याने शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.कऱ्हाड येथे गुरुवारी दत्त चौकात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला.’ भाजपविरोधात जिल्ह्यातील पहिले आंदोलनसातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेची आक्रमकता आघाडी सरकारच्या काळामध्ये अनेक आंदोलनातून पाहायला मिळाली आहे. मात्र, सध्या राज्यात आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपचा शिवसेना हा मित्रपक्ष म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत शिवसेनेने सातारा जिल्ह्यात भाजपच्या विरोधात केलेले हे पहिलेच आंदोलन म्हणून याचा विशेष उल्लेख करावा लागेल. भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणात भाजप सेनेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. रखरखत्या उन्हात घोषणारखरखत्या उन्हात शिवसैनिक एकत्र आले. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत त्यांनी परिसर दुमदुमून सोडला आणि दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्याने वातावरण अधिकच तापले.