शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

जलयुक्तमुळे हिवरे झाले हिरवेगार..!

By admin | Updated: August 26, 2016 01:13 IST

टँकर हद्दपार : लोकसहभागाचा अनोखा पॅटर्न; शिवारात पाणी खळाळले

कोरेगाव : सलग तीन वर्ष टँकर लागणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावात जलयुक्तमुळे केलेली कामे, मोठ्या प्रमाणातील लोकसहभाग आणि पडलेला पाऊस यातून हिवरे गावाच्या शिवारात पाणी तर खळाळले आहेच, त्याशिवाय हिरवीगार पिकं डोलू लागली आहेत. कोरेगाव तालुक्यातील हिवरे हे अवघे १ हजार ३७८ लोकसंख्या असलेले गाव. या गावामध्ये सलग तीन वर्षांपासून टँकर लागत असल्याची माहिती सरपंच अजित खताळ यांनी दिली. शासन, किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून गावामध्ये साडेसतरा हजार मीटर डीपसीसीटी, ३0 हेक्टर सीसीटी, लहान मोठे ३६ मातीचे बंधारे, ३२ जुन्या पाझर तालवांमधून गाळ काढण्यात आला आणि काढण्यात आलेला गाळ शेतामध्ये टाकून जमीन वहिवाटीखाली आणली. एकूण ५४0 हेक्टर जमिनीपैकी जवळपास ५0 टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यात आली आहे. यामध्ये ऊस, आले, घेवडा, सोयाबीन, बाजरी, टोमॅटो यांचा समावेश आहे. ३३ एकर गायरान जमिनीत साडेपाच हजार सिताफळांची रोपे लावण्यात आली आहेत. यापासून साडेपाच लाखाचे उत्पन्न हे गावासाठी मिळणार आहे. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, ग्रामपंचायतीच्या १३ व्या वित्त आयोग, पर्यावरण निधी, ग्रामपंचायत स्व निधी, लोक वर्गणी यामधून गावामध्ये जलसंधारणाची कामे करण्यात आली. यामधून ८ कोटी लिटर पाणी अडविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, अशी माहिती सरपंच खताळ यांनी यावेळी अभिमानाने दिली. (प्रतिनिधी)गावामध्ये जलयुक्त शिवारची कामे झाल्यामुळे शिवारात पाणी खेळू लागले आहे. त्यामुळे आम्हाला आता टंचाई भासणार नाही. निश्चितपणे आम्ही आता बारमाही पिके घेऊ शकतो. टँकर लागणाऱ्या हिवरे गावात जलयुक्त शिवार अभियानामुळे शिवारात पाणी दिसू लागले आहे. याच पाण्यावर सध्या हिरवीगार पिकं डोलू लागली आहेत. हे दृष्य निश्चितच इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे. - हणमंत जगदाळे, शेतकरी पाच विंधन विहिरी घेतल्या. अगदी ३00 फुटापर्यंत परंतु पाणी लागले मिळाले नाही. गावात जलयुक्त शिवारची कामे झाल्यामुळे विंधन विहीर पाण्याने भरुन वाहत आहे. विहीर पण भरुन वाहत आहेत. ही शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे. - शंकर खताळ, शेतकरी