शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

आघाडीधर्माला शिवेंद्रराजेंचा कोलदांडा

By admin | Updated: August 11, 2014 00:13 IST

सदाशिव सपकाळ : विधानसभेला विद्यमान आमदारांना मदत नाहीच

सातारा : ‘मागील विधानसभा निवडणुकीत सातारा-जावळी मतदारसंघातून विद्यमान आमदारांना निवडून आणले. पण, त्यांनी निवडणुकीनंतर आघाडीधर्माला कोलदांडा लावला. त्यामुळे या निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. प्रसंगी अपक्ष किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवेन; पण शिवेंद्रसिंहराजे यांना कोणत्याही परिस्थितीत कसलीही मदत करणार नाही,’ अशी घोषणा माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी केली.येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. यावेळी चंद्रसेन शिंदे, मोहन कासुर्डे, प्रकाश परामणे, सचिन करंजेकर, शिवाजी गोरे, संदीप गायकवाड तसेच इतर कार्यकर्ते, आदी उपस्थित होते.पत्रकार परिषदेत माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी कधी नाव घेऊन तर कधी नाव न घेता सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर तोंडसुख घेतले. ‘बोलल्याप्रमाणे त्यांनी कोणतीही मदत केली नाही, असा आरोपही केला.’सपकाळ पुढे म्हणाले, ‘सातारा-जावळी मतदारसंघातील जनतेची चाललेली पिळवणूक, चेष्टा, फसवणूक, भूलथापा यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या माध्यमातून आघाडीधर्म पाळायचा म्हणून विद्यमान आमदारांना निवडून आणण्यासाठी मनापासून व प्रामाणिक प्रयत्न केले. पण, त्यांनी या प्रामाणिकपणाची सामाजिक व राजकीय किंमत गेल्या पाच वर्षांत भोगायला लावली.माझ्या ग्लुकोजच्या कारखान्याला भागभांडवालाची ते मदत करणार होते. ती अद्याप मिळालेली नाही. जावळी तालुक्यातील हजारो बेरोजगारांना त्यांनी रोजगारापासून वंचित ठेवले आहे. याउलट त्यांनी ग्लुकोज कारखाना होऊ नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून विरोधात जोरदार प्रयत्नही केले.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला अग्रक्रमाने जागा देऊन आघाडीमार्फत निवडणूक लढविण्याचा निर्णय ठरला होता; परंतु शेवटी तो शब्दही त्यांनी पाळला नाही. त्यामुळे आता वेगळा निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)‘शेतकऱ्यांना भिकारी बनविण्याचा प्रयत्न’‘फळे-फुले नावाची एक संस्था आहे. या संस्थेमार्फत दिल्ली, हैद्राबाद, बंगळूर, पुणे येथे माल पाठवला जातो. तिकडे दर १५ रुपये मिळतो तर इथे शेतकऱ्यांना पाच रुपये दिले जातात. ही तफावत शेतकऱ्यांना सधन नाही तर भिकारी बनविण्यासाठी आहे. यासंबंधीचे पुरावे माझ्याकडे आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ‘कोण फुललं व कोण कोमेजलं’ हे जनतेसमोर उघड करणार आहे. याची साखळी दिल्लीच्या बागवानी बोर्डापासून सातारपर्यंत कशी कार्यरत आहे, हेही पुराव्यानिशी योग्यावेळी सांगणार आहे. विविध कामे ठराविक ठेकेदारांनाच देण्यात येत आहेत,’ असा आरोपही सपकाळ यांनी यावेळी केला.अजित पवारांवरही आरोपग्लुकोज कारखान्याला कोणाकोणाचा विरोध आहे, अशी विचारणा पत्रकारांनी सपकाळ यांना केली. यावर त्यांनी अजित पवार यांचा विरोध होता, असा आरोप करतानाच त्यांना कोण काय सांगत होते काय माहीत,’ अशी पुष्टीही त्यांनी जोडली.