शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

शाहूनगरीसह जिल्हा झाला शिवमय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 23:45 IST

सातारा : स्वराज्याची राजधानी असणाºया सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सोमवारी शिवजयंती साजरी होत असून, या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साताºयात नगरपरिषदेतर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. भगवे झेंडे, पताका, बॅनर आणि रविवारी सकाळपासून निघालेल्या दुचाकी रॅली व ...

सातारा : स्वराज्याची राजधानी असणाºया सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सोमवारी शिवजयंती साजरी होत असून, या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साताºयात नगरपरिषदेतर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. भगवे झेंडे, पताका, बॅनर आणि रविवारी सकाळपासून निघालेल्या दुचाकी रॅली व ‘जय भवानी, जय शिवाजी’ आदींच्या जयघोषामुळे सर्वत्र शिवमय वातावरण आहे.साताºयाबरोबरच जिल्ह्यात सोमवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत. साताºयात दि. १९ रोजी सकाळी दहा वाजता नगरपरिषद कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता राजवाडा येथील गांधी मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्याच ठिकाणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य शाही मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. तसेच सातारा शहरातील विविध तरुण मित्र मंडळांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी सातारा शहरातील रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले. तर मुख्य चौक आणि बाजारपेठेत भगव्या पताका लावण्यात आल्या. अनेक मंडळांनी रस्त्यावरून दुचाकी रॅली काढली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक आणि कोरेगाव रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खरेदी करण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी झाली होती. तसेच बाजारपेठेत पंचधातूचे कडे व राजमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेले टीशर्ट खरेदी करण्यासाठीही गर्दी झाली होती.सायंकाळी अजिंक्यतारा किल्ल्यावरून मशाली पेटवून नेण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या तरुणांनी गर्दी केली होती. तसेच शहरातील मंडळे इतर जिल्ह्यांतील किल्ल्यांवरून ज्योत आणण्यासाठी रवाना झाली आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण शिवमय झाले आहे.