शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

शाहूनगरीसह जिल्हा झाला शिवमय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 23:45 IST

सातारा : स्वराज्याची राजधानी असणाºया सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सोमवारी शिवजयंती साजरी होत असून, या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साताºयात नगरपरिषदेतर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. भगवे झेंडे, पताका, बॅनर आणि रविवारी सकाळपासून निघालेल्या दुचाकी रॅली व ...

सातारा : स्वराज्याची राजधानी असणाºया सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सोमवारी शिवजयंती साजरी होत असून, या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साताºयात नगरपरिषदेतर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. भगवे झेंडे, पताका, बॅनर आणि रविवारी सकाळपासून निघालेल्या दुचाकी रॅली व ‘जय भवानी, जय शिवाजी’ आदींच्या जयघोषामुळे सर्वत्र शिवमय वातावरण आहे.साताºयाबरोबरच जिल्ह्यात सोमवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत. साताºयात दि. १९ रोजी सकाळी दहा वाजता नगरपरिषद कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता राजवाडा येथील गांधी मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्याच ठिकाणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य शाही मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. तसेच सातारा शहरातील विविध तरुण मित्र मंडळांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी सातारा शहरातील रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले. तर मुख्य चौक आणि बाजारपेठेत भगव्या पताका लावण्यात आल्या. अनेक मंडळांनी रस्त्यावरून दुचाकी रॅली काढली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक आणि कोरेगाव रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खरेदी करण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी झाली होती. तसेच बाजारपेठेत पंचधातूचे कडे व राजमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेले टीशर्ट खरेदी करण्यासाठीही गर्दी झाली होती.सायंकाळी अजिंक्यतारा किल्ल्यावरून मशाली पेटवून नेण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या तरुणांनी गर्दी केली होती. तसेच शहरातील मंडळे इतर जिल्ह्यांतील किल्ल्यांवरून ज्योत आणण्यासाठी रवाना झाली आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण शिवमय झाले आहे.