शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

शाहूनगरीसह जिल्हा झाला शिवमय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 23:45 IST

सातारा : स्वराज्याची राजधानी असणाºया सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सोमवारी शिवजयंती साजरी होत असून, या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साताºयात नगरपरिषदेतर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. भगवे झेंडे, पताका, बॅनर आणि रविवारी सकाळपासून निघालेल्या दुचाकी रॅली व ...

सातारा : स्वराज्याची राजधानी असणाºया सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सोमवारी शिवजयंती साजरी होत असून, या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साताºयात नगरपरिषदेतर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. भगवे झेंडे, पताका, बॅनर आणि रविवारी सकाळपासून निघालेल्या दुचाकी रॅली व ‘जय भवानी, जय शिवाजी’ आदींच्या जयघोषामुळे सर्वत्र शिवमय वातावरण आहे.साताºयाबरोबरच जिल्ह्यात सोमवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत. साताºयात दि. १९ रोजी सकाळी दहा वाजता नगरपरिषद कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता राजवाडा येथील गांधी मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्याच ठिकाणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य शाही मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. तसेच सातारा शहरातील विविध तरुण मित्र मंडळांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी सातारा शहरातील रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले. तर मुख्य चौक आणि बाजारपेठेत भगव्या पताका लावण्यात आल्या. अनेक मंडळांनी रस्त्यावरून दुचाकी रॅली काढली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक आणि कोरेगाव रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खरेदी करण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी झाली होती. तसेच बाजारपेठेत पंचधातूचे कडे व राजमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेले टीशर्ट खरेदी करण्यासाठीही गर्दी झाली होती.सायंकाळी अजिंक्यतारा किल्ल्यावरून मशाली पेटवून नेण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या तरुणांनी गर्दी केली होती. तसेच शहरातील मंडळे इतर जिल्ह्यांतील किल्ल्यांवरून ज्योत आणण्यासाठी रवाना झाली आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण शिवमय झाले आहे.