शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

शरद पवारांच्या वाढदिनी शिवसेनेचे उपोषण

By admin | Updated: December 10, 2015 01:02 IST

वासुदेव माने : रहिमतपूर पालिकेच्या भ्रष्टाचारप्रकरणी सुनील माने यांच्यावर हल्लाबोल

रहिमतपूर : ‘पाणी मीटर मधील भ्रष्टाचार लपविणेसाठी सभांमधून कोणाच्याही वैयक्तिक कुटुंबाची वाभाडे काढणार असाल तर मला खालच्या पायरीवर उतरायला लावू नका,’ असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख वासुदेव माने यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना दिला. तसेच भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रवारीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसापासून उपोषणास बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रहिमतपूर येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तानाजी शेडगे, अ‍ॅड. अमर माने, अ‍ॅड. वैभव माने, किरण भोसले, अमर मदने, बाळासाहेब बर्गे, शंकर माने, सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.माने म्हणाले, ‘पाणी मीटरमधील भ्रष्टाचार जोपर्यंत उघडं होत नाही. तोपर्यंत शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने शिवसेनेने उचलेले प्रत्येक पाऊल बहुजन हिताय व बहुजन सुखाय या न्यायाने करणार आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी आपण जनतेचे सेवक आहोत मालक नाही हे लक्षात घेऊन वागावे. शहरातील सर्व कामे सुयोग्य स्थितीत करावीत. नेहमी जवळच्या ठेकेदाराला टेंडर देऊ नये. अन्यथा त्याला जशास तसे उत्तर आगामी काळात दिले जाईल.’अ‍ॅड. अमर माने म्हणाले की, ‘शहरामध्ये भ्रष्टाचारी पाणी मीटर पद्धती घालवायची असेल तर लोकांनी घरपट्टी व पाणी पट्टी भरू नये. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा नागरिकांचे आर्थिक शोषण जे चालू आहे ते थांबवावे. भ्रष्टाचाराला सुद्धा काही मर्यादा असतात. त्या ओलांडण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.सतीश आडेकर यांनी सूत्रसंचालन केले. रणजित भोसले यांनी आभार मानले. यावेळी ा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितहोते. (वार्ताहर)मी शहराच्या विकासाच्या दृष्टीने कामकाज करत असून पाणी मीटर भ्रष्टाचारासंबंधी वासुदेव माने यांनी आरोप व उपोषण करण्यापेक्षा त्यांचे सरकार व पालकमंत्री असल्याने चौकशी लावावी. तसेच मीटर काढण्याची आॅर्डर त्यांच्या सरकारकडून त्यांनी घ्यावी. कोणावरही वैयक्तिक आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही.-सुनील माने, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उच्च न्यायालयात दावा दाखल करणारशहराचा दुसरा प्रारुप विकास आराखडा सर्व समाज घटकांना घेवून करणे गरजेचे होते. परंतु, सत्ताधाऱ्यांनी हुकुमशाही राबवुन हा आराखडा केला आहे. त्यामुळे रहिमतपूरकरांचे स्वास्थ बिघडले असून त्या धक्याने एकाचा बळी सुद्धा गेला आहे. रहिमतपूरमध्ये जी काही नियमबाह्य व विकास आराखड्याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे अ‍ॅड. वैभव माने यांनी सभेत सांगितले.