शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

शरद पवारांच्या वाढदिनी शिवसेनेचे उपोषण

By admin | Updated: December 10, 2015 01:02 IST

वासुदेव माने : रहिमतपूर पालिकेच्या भ्रष्टाचारप्रकरणी सुनील माने यांच्यावर हल्लाबोल

रहिमतपूर : ‘पाणी मीटर मधील भ्रष्टाचार लपविणेसाठी सभांमधून कोणाच्याही वैयक्तिक कुटुंबाची वाभाडे काढणार असाल तर मला खालच्या पायरीवर उतरायला लावू नका,’ असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख वासुदेव माने यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना दिला. तसेच भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रवारीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसापासून उपोषणास बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रहिमतपूर येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तानाजी शेडगे, अ‍ॅड. अमर माने, अ‍ॅड. वैभव माने, किरण भोसले, अमर मदने, बाळासाहेब बर्गे, शंकर माने, सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.माने म्हणाले, ‘पाणी मीटरमधील भ्रष्टाचार जोपर्यंत उघडं होत नाही. तोपर्यंत शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने शिवसेनेने उचलेले प्रत्येक पाऊल बहुजन हिताय व बहुजन सुखाय या न्यायाने करणार आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी आपण जनतेचे सेवक आहोत मालक नाही हे लक्षात घेऊन वागावे. शहरातील सर्व कामे सुयोग्य स्थितीत करावीत. नेहमी जवळच्या ठेकेदाराला टेंडर देऊ नये. अन्यथा त्याला जशास तसे उत्तर आगामी काळात दिले जाईल.’अ‍ॅड. अमर माने म्हणाले की, ‘शहरामध्ये भ्रष्टाचारी पाणी मीटर पद्धती घालवायची असेल तर लोकांनी घरपट्टी व पाणी पट्टी भरू नये. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा नागरिकांचे आर्थिक शोषण जे चालू आहे ते थांबवावे. भ्रष्टाचाराला सुद्धा काही मर्यादा असतात. त्या ओलांडण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.सतीश आडेकर यांनी सूत्रसंचालन केले. रणजित भोसले यांनी आभार मानले. यावेळी ा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितहोते. (वार्ताहर)मी शहराच्या विकासाच्या दृष्टीने कामकाज करत असून पाणी मीटर भ्रष्टाचारासंबंधी वासुदेव माने यांनी आरोप व उपोषण करण्यापेक्षा त्यांचे सरकार व पालकमंत्री असल्याने चौकशी लावावी. तसेच मीटर काढण्याची आॅर्डर त्यांच्या सरकारकडून त्यांनी घ्यावी. कोणावरही वैयक्तिक आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही.-सुनील माने, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उच्च न्यायालयात दावा दाखल करणारशहराचा दुसरा प्रारुप विकास आराखडा सर्व समाज घटकांना घेवून करणे गरजेचे होते. परंतु, सत्ताधाऱ्यांनी हुकुमशाही राबवुन हा आराखडा केला आहे. त्यामुळे रहिमतपूरकरांचे स्वास्थ बिघडले असून त्या धक्याने एकाचा बळी सुद्धा गेला आहे. रहिमतपूरमध्ये जी काही नियमबाह्य व विकास आराखड्याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे अ‍ॅड. वैभव माने यांनी सभेत सांगितले.