शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

शरद पवारांच्या वाढदिनी शिवसेनेचे उपोषण

By admin | Updated: December 10, 2015 01:02 IST

वासुदेव माने : रहिमतपूर पालिकेच्या भ्रष्टाचारप्रकरणी सुनील माने यांच्यावर हल्लाबोल

रहिमतपूर : ‘पाणी मीटर मधील भ्रष्टाचार लपविणेसाठी सभांमधून कोणाच्याही वैयक्तिक कुटुंबाची वाभाडे काढणार असाल तर मला खालच्या पायरीवर उतरायला लावू नका,’ असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख वासुदेव माने यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना दिला. तसेच भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रवारीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसापासून उपोषणास बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रहिमतपूर येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तानाजी शेडगे, अ‍ॅड. अमर माने, अ‍ॅड. वैभव माने, किरण भोसले, अमर मदने, बाळासाहेब बर्गे, शंकर माने, सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.माने म्हणाले, ‘पाणी मीटरमधील भ्रष्टाचार जोपर्यंत उघडं होत नाही. तोपर्यंत शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने शिवसेनेने उचलेले प्रत्येक पाऊल बहुजन हिताय व बहुजन सुखाय या न्यायाने करणार आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी आपण जनतेचे सेवक आहोत मालक नाही हे लक्षात घेऊन वागावे. शहरातील सर्व कामे सुयोग्य स्थितीत करावीत. नेहमी जवळच्या ठेकेदाराला टेंडर देऊ नये. अन्यथा त्याला जशास तसे उत्तर आगामी काळात दिले जाईल.’अ‍ॅड. अमर माने म्हणाले की, ‘शहरामध्ये भ्रष्टाचारी पाणी मीटर पद्धती घालवायची असेल तर लोकांनी घरपट्टी व पाणी पट्टी भरू नये. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा नागरिकांचे आर्थिक शोषण जे चालू आहे ते थांबवावे. भ्रष्टाचाराला सुद्धा काही मर्यादा असतात. त्या ओलांडण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.सतीश आडेकर यांनी सूत्रसंचालन केले. रणजित भोसले यांनी आभार मानले. यावेळी ा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितहोते. (वार्ताहर)मी शहराच्या विकासाच्या दृष्टीने कामकाज करत असून पाणी मीटर भ्रष्टाचारासंबंधी वासुदेव माने यांनी आरोप व उपोषण करण्यापेक्षा त्यांचे सरकार व पालकमंत्री असल्याने चौकशी लावावी. तसेच मीटर काढण्याची आॅर्डर त्यांच्या सरकारकडून त्यांनी घ्यावी. कोणावरही वैयक्तिक आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही.-सुनील माने, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उच्च न्यायालयात दावा दाखल करणारशहराचा दुसरा प्रारुप विकास आराखडा सर्व समाज घटकांना घेवून करणे गरजेचे होते. परंतु, सत्ताधाऱ्यांनी हुकुमशाही राबवुन हा आराखडा केला आहे. त्यामुळे रहिमतपूरकरांचे स्वास्थ बिघडले असून त्या धक्याने एकाचा बळी सुद्धा गेला आहे. रहिमतपूरमध्ये जी काही नियमबाह्य व विकास आराखड्याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे अ‍ॅड. वैभव माने यांनी सभेत सांगितले.