शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गडकोट संवर्धनाचा भटकंती ग्रुपने घेतलाय शिवसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:29 IST

वाई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा असलेले गड, किल्ले आजही मोठ्या थाटात ...

वाई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा असलेले गड, किल्ले आजही मोठ्या थाटात उभे आहेत. किल्ले पांडवगड, चंदन-वंदनगड, वैराटगड, किल्ले केंजळगड, कमळगड आपल्याला आवाज देत आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या या गडांची दुरवस्था होत आहे. याची जाण असल्याने ‘भटकंती सह्याद्रीची’ या ग्रुपच्या युवकांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे.

यामध्ये वाई शहरासह तालुक्यातील युवक सहभागी आहेत. तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या संवर्धन मोहिमेत रायरेश्वर, पांडवगड, केंजळगड, कल्याणगड, चंदनवंदन गडांचे अनेक वेळा श्रमदान करून संवर्धन केले.

सौरभ जाधव म्हणाले, ‘किल्ल्यावर ढासळलेली तटबंदी, ढासळलेले बुरूज, वाढलेली झाडे-जुडपे पाहायला मिळत आहेत. किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. तेच गडकिल्ले कोणत्या अवस्थेत आहेत बघा. त्या काळात त्या गडकोटांनी आपली रक्षा केली, आता त्यांचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे. संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारे किल्ले संवर्धन केल्यास पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल.

आता प्रत्येकाला प्रश्न निर्माण होईल की, आपण नक्की गड किल्ल्यांची रक्षा कशी करायची. आपण सर्वांनी एकत्र येऊन जिथे जिथे ज्या ज्या संस्था गड किल्ले संवर्धन काम करत आहेत, त्यांच्यावर संवर्धन काम करणे, तसेच आपण गड किल्ले फिरायला जातो, तिथे कचरा दिसला की गोळा करतात.

सर्व किल्ल्यांवर संवर्धन चळवळ सुरू आहे. वंदनगडला शिवंदनेश्वर प्रतिष्ठान आहे. किल्ले कमळगडला गोरक्षनाथ प्रतिष्ठान, किल्ले रायरेश्वर, पांडवगड, केंजळगडला भटकंती सह्याद्रीची या संस्था हातात हात घालून एकजुटीने गडकोट संवर्धन चळवळीत सामील झाल्या आहेत. या मोहिमेत सौरभ जाधव, रोहित मुंगसे, सिद्धेश सूर्यवंशी, अनिकेत वाडकर, ओंकार वरे, आशिष शिंदे, अनिल वाशिवले अजय वाशिवले, शुभम चव्हाण, शंकर कांबळे, प्रवीण कदम, प्रमोद कदम यांच्यासह अनेक युवक सक्रिय भाग घेत असतात.

गतवैभव प्राप्त करून देणार

सह्याद्रीमध्ये असलेले किल्ले हे महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी प्रेरणास्थान आहेत. येणाऱ्या पिढीसाठी दिशादर्शक आहेत. त्यांचे संवर्धन करणे आद्य कर्त्यव्य आहे. या मोहिमेत युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भटकंती सह्याद्रीची सदस्यांनी केले आहे.

१८वाई-किल्ले गटकोट

वाई तालुक्यातील भटकंती ग्रुपच्या सदस्यांनी गटकोट संवर्धनाचा संकल्प केला आहे. यामध्ये शेकडो तरुण सहभागी होत आहेत. (छाया : पांडुरंग भिलारे)