शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

गडकोट संवर्धनाचा भटकंती ग्रुपने घेतलाय शिवसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:29 IST

वाई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा असलेले गड, किल्ले आजही मोठ्या थाटात ...

वाई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा असलेले गड, किल्ले आजही मोठ्या थाटात उभे आहेत. किल्ले पांडवगड, चंदन-वंदनगड, वैराटगड, किल्ले केंजळगड, कमळगड आपल्याला आवाज देत आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या या गडांची दुरवस्था होत आहे. याची जाण असल्याने ‘भटकंती सह्याद्रीची’ या ग्रुपच्या युवकांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे.

यामध्ये वाई शहरासह तालुक्यातील युवक सहभागी आहेत. तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या संवर्धन मोहिमेत रायरेश्वर, पांडवगड, केंजळगड, कल्याणगड, चंदनवंदन गडांचे अनेक वेळा श्रमदान करून संवर्धन केले.

सौरभ जाधव म्हणाले, ‘किल्ल्यावर ढासळलेली तटबंदी, ढासळलेले बुरूज, वाढलेली झाडे-जुडपे पाहायला मिळत आहेत. किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. तेच गडकिल्ले कोणत्या अवस्थेत आहेत बघा. त्या काळात त्या गडकोटांनी आपली रक्षा केली, आता त्यांचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे. संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारे किल्ले संवर्धन केल्यास पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल.

आता प्रत्येकाला प्रश्न निर्माण होईल की, आपण नक्की गड किल्ल्यांची रक्षा कशी करायची. आपण सर्वांनी एकत्र येऊन जिथे जिथे ज्या ज्या संस्था गड किल्ले संवर्धन काम करत आहेत, त्यांच्यावर संवर्धन काम करणे, तसेच आपण गड किल्ले फिरायला जातो, तिथे कचरा दिसला की गोळा करतात.

सर्व किल्ल्यांवर संवर्धन चळवळ सुरू आहे. वंदनगडला शिवंदनेश्वर प्रतिष्ठान आहे. किल्ले कमळगडला गोरक्षनाथ प्रतिष्ठान, किल्ले रायरेश्वर, पांडवगड, केंजळगडला भटकंती सह्याद्रीची या संस्था हातात हात घालून एकजुटीने गडकोट संवर्धन चळवळीत सामील झाल्या आहेत. या मोहिमेत सौरभ जाधव, रोहित मुंगसे, सिद्धेश सूर्यवंशी, अनिकेत वाडकर, ओंकार वरे, आशिष शिंदे, अनिल वाशिवले अजय वाशिवले, शुभम चव्हाण, शंकर कांबळे, प्रवीण कदम, प्रमोद कदम यांच्यासह अनेक युवक सक्रिय भाग घेत असतात.

गतवैभव प्राप्त करून देणार

सह्याद्रीमध्ये असलेले किल्ले हे महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी प्रेरणास्थान आहेत. येणाऱ्या पिढीसाठी दिशादर्शक आहेत. त्यांचे संवर्धन करणे आद्य कर्त्यव्य आहे. या मोहिमेत युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भटकंती सह्याद्रीची सदस्यांनी केले आहे.

१८वाई-किल्ले गटकोट

वाई तालुक्यातील भटकंती ग्रुपच्या सदस्यांनी गटकोट संवर्धनाचा संकल्प केला आहे. यामध्ये शेकडो तरुण सहभागी होत आहेत. (छाया : पांडुरंग भिलारे)