शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

मेढ्यात विकास ‘पडद्याआड’ अन सुविधा दिवसाआड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST

सातारा : जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा शहराला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला अन् नागरिकांना मेढा शहराचा कायापालट होईल, ...

सातारा : जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा शहराला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला अन् नागरिकांना मेढा शहराचा कायापालट होईल, सुविधा मिळतील असे वाटले, पण मेढेकरांचे हे स्वप्न गेली ५ वर्षे दिवास्वप्नच राहिले असून लाखो रुपयांचा निधी मिळूनदेखील जीवनावश्यक असलेले पाणी आजही नागरिकांना एक दिवसाआड व फक्त अर्धा तास मिळत आहे. त्यामुळे मेढा नगरपंचायतीचा कारभार म्हणजे विकास पडद्याआड, सुविधा दिवसआड अशी झाली आहे.

नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत मेढा नगरपंचायत पहात असून आता कचरा गोळा करणारी घंटा गाडी देखील एक दिवसाआड कचरा गोळा करून नेत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपंचायतीचा कारभार बघून मेढा नगरपंचायतीची नोंद ‘गिनीज बुकात’केली पाहिजे, अशी संतप्त अन उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे.

मेढा नगरपंचायतीबाबत शासनाची २७ मे २०१६ रोजी अधिसूचना झाली अन् मेढा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. मात्र, मुख्याधिकारी यांची नेमणूक न झाल्याने नगरपंचायतीचा कारभार १८ डिसेंबर २०१६ अखेर प्रशासक म्हणून तत्कालीन तहसीलदार यांच्याकडे राहिला. मेढा नगरपंचायतीची निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ ला झाली. मात्र, नगराध्यक्ष निवडणूक ही १० जून २०१७ रोजी झाली.अन हौसाबाई मुकणे या नगराध्यक्षा म्हणून विराजमान झाल्या.

संपूर्ण राज्यात खेडोपाडीदेखील नागरिकांना जीवनावश्यक असलेल्या पाण्याचा पुरवठा दररोज होतो. मात्र, राज्यात मेढा या एकमेव शहरात गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ एक दिवसाआड फक्त अर्धा तास, फिल्टर न केलेला पाणीपुरवठा होत आहे. मात्र, पाऊस चांगला होत असलेल्या भागात ही स्थिती आहे.

मेढा नगरपंचायतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नगरसेवक १७, कारभारी १२ अन् कामाचे तीन तेरा, अशी आहे. आजपर्यंत मेढा नगरपंचायतीत मुख्याधिकारी म्हणून ६ तहसीलदार यांनी प्रशासक म्हणून तर ६ जणांनी मुख्याधिकारी म्हणून कारभार पाहिला आहे. मेढा नगरपंचायतीत १७ नगरसेवकांचा कार्यकाल सुरू झाला अन मेढा शहराचे रुपडे बदलेल, अशी अपेक्षा नागरिकांच्यात निर्माण झाली. मात्र, या अपेक्षांचा भंगच झाला असून सुविधा तर सोडाच, नागरिकांना जीवनावश्यक असणारा पाणीपुरवठा देखील गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ एक दिवसाआड व फक्त अर्धा तास होत आहे. तसेच हे पाणीदेखील फिल्टर होऊन मिळत नाही. पाणीपुरवठा ६ महिने अन् पाणीपट्टी ही १ वर्षाची घेतली जाते. सुविधांच्या नावाने बोंब असणाऱ्या मेढा नगरपंचायतीने आता कचरा गोळा करणेदेखील एक दिवसाआड सुरू केले असून त्यामुळे ओला कचरा नागरिकांना घरातच ४८ तास ठेवावा लागतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील धोका निर्माण झाला आहे. मेढा शहरात झालेल्या विकासकामांचे देखील ऑडिट होणे गरजेचे आहे. रस्त्यांचे डांबरीकरण, गटार कामाचा निकृष्ट दर्जा याबाबत देखील नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात आहे. अनेक बेकायदेशीर बांधकामे ‘पांडुरंगाच्या कृपेने’ चालू असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या प्रकरणी लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे.

तीन माकडांसारखी अवस्था...

मेढा नगरपंचायतीची अवस्था गांधीजींच्या तीन माकडाप्रमाणे असून प्रशासनाचे कानावर हात, नगरसेवकांचे डोळ्यावर हात अन नागरिकांचे तोंडावर हात म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी झाली आहे.