शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

शीलवंत यांचे कार्य भावी पिढीला प्रेरणादायी

By admin | Updated: November 13, 2015 23:44 IST

नागनाथ कोत्तापल्ले : ठोमसेत येथील कार्यक्रमात ‘आदर्श माता’ पुरस्काराचे वितरण

मल्हारपेठ : ‘मातीशी नाते जोडण्याचे काम सम्राट अशोकांचे पाईक अशोक शीलवंत यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभर तत्त्वज्ञान पोहोचविण्यासाठी आयुष्य झिजविले त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन वेगवेगळ्या पद्धतीने समाजातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी तेच कार्य देशभर पुढे चालू ठेवण्याचे कौतुकास्पद कार्य करण्याचा वसा शीलवंत यांनी घेतला आहे,’ असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पूर्व कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.पाटण तालुक्यातील ठोमसे येथे पुणे (पिंपरी) येथील अशोक सर्वांगीण विकास सोसायटी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवानिमित्त व कमल आई काव्य महोत्सवानिमित्त आई काव्य महोत्सव व पुस्तक तुला, आदर्श माता पुरस्कार व आई काव्य पुरस्कार वितरण अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्याभूषण डॉ. प्रशांत पगारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सत्यजितसिंह पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोत्तापल्ले म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेबांच्या विचारांने प्रेरित झालेल्या व्यक्तीकडून माती आणि मातेचा होत असलेला सन्मान हा येणाऱ्या पिढीपुढे प्रेरणादायी ठरणार आहे. संपूर्ण आयुष्यात बाबासाहेबांनी ज्या संघर्षातून आदर्श विचारांची ज्योत तेवत ठेवली, त्याच आदर्शांना अंगीकारून शीलवंत हे करत असलेले कार्य युवकांनाही आदर्श ठरत असून कौतुकास्पद आहे.’यावेळी आदर्श माता पुरस्कार केशरबाई कानडे (उस्मानाबाद), सुलोचना लादे (कऱ्हाड), कांताबाई सुर्वे (ठोमसे), अलका जोगदंड (राजगुरुनगर), सखुबाई कांबळे (पिंपरी) यांना देण्यात आला. तर आई काव्य पुरस्कार चंद्रकांत वानखेडे (जळगाव), लता ऐवळे (सांगली), रमजान मुल्ला (इस्लामपूर), राजेंद्र वाघ (वारजे), अस्मिता चांदणे (भोसरी), प्रभाकर वाघोले (निगडी), विद्या कदम (बिबवेवाडी) यांना देण्यात आला.डॉ. शीलवंत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सामाजिक, साहित्यिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कवी उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच दयानंद शीलवंत यांनी आभार मानले. (वार्ताहर)