शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

शरद पवारांनाच मार्केट कमिटीने लुटलेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:42 IST

सातारा : ‘पवार साहेबांनी फार अभ्यासपूर्ण आत्मचरित्र लिहिलंय. बारामती येथून शेतमाल घेऊन ते पुण्याला गेले होते. तेथील मार्केट कमिटीमध्ये ...

सातारा : ‘पवार साहेबांनी फार अभ्यासपूर्ण आत्मचरित्र लिहिलंय. बारामती येथून शेतमाल घेऊन ते पुण्याला गेले होते. तेथील मार्केट कमिटीमध्ये त्यांना कशा पद्धतीने लुटले गेले, याचे वर्णन केलेय. शेतकऱ्याला मार्केट कमिटीच्या बाहेर माल विकण्याचा अधिकार असावा असं त्यांनी म्हटलंय. शरद पवार यांचं आत्मचरित्रच कृषी नीती कायदा म्हणून लागू करावं,’ असे मत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलंय.

खोत यांनी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये प्रसिद्धीमाध्यमांशी साधलेल्या संवादात केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचे समर्थन केले तसेच विरोध करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने दिल्लीतील आंदोलनकर्त्यांशी अनेक चर्चेच्या फेऱ्या केल्या. चांद, तारे, आकाश द्या अशा संबंधित शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. या आंदोलकर्त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नात रस नाही. दिल्लीच्या दख्तावर पंतप्रधान कोण असावा, यात त्यांना रस आहे. नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आंदोलन सुरू आहे. निवडणूक होत नाही तोवर विरोधक आंदोलन तापवत राहतील. अन्याय होणार असेल तर सरकारसमोर मांडून मार्ग काढावा. केंद्र सरकारने आता चर्चेचे दरवाजे बंद करावेत आणि कृषी कायद्यांची अंमलबजावणी सक्षमपणे देशभर करावी, शेतकऱ्यांना सक्षम बाजारपेठा निर्माण करून शेतमाल विक्री करण्याची मुभा द्यावी. आमचा बाप पिकवायला शिकला विकायला शिकला नाही. दिल्लीतील आंदोलनात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणारे लोक आहेत, त्यांचा नाद आता सोडावा.’

कृषी कायद्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने काय आणलंय, ते मोदींनी स्पष्ट करावं. काही लोकांना केंद्रातील तिजोरीतून करोडो रुपये हाणायचे आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर चुराडा करायचा. या देशामध्ये शेतमाल आधारभूत किंमतीनं खरेदी करायला सरकार तयार आहे. शेतकऱ्याला माल कुठे विकावा, याचं स्वातंत्र्य मिळावं.

चौकट..

‘पॉप गायिकेच्या ट्विटवर सचिन तेंडुलकर याने रिट्विट केले, त्यावर सचिनला शेतीमधील काय कळतं, अशी टीका शरद पवारांनी केली होती. याचंच मला हसू आलं. शरद पवार कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कधी किस्ताक घातलं होतं. ते कधी हिंदकेसरी झाले होते,’ असा प्रश्न खोत यांनी उपस्थित केला. आम्हीही नारळाच्यावर कुस्त्या खेळल्या असतील. मी सोडून बाकीच्यांना काही कळत नाही म्हणत इतरांना कमी लेखण्याची पद्धत महाराष्ट्रात रुजवली जात आहे. अनुभवातून दीर्घकाळ एका क्षेत्रात असल्यानंतर सर्वच अधिकार आपल्याला मिळत आहेत, अशी मानसिकता आहे. हे नवनेतृत्वाला हानीकारक आहे, असं मतही सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

(शरद पवार आणि सदाभाऊ खोत यांचे आयकार्ड फोटो वापरावेत)