शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

शरद पवारांनाच मार्केट कमिटीने लुटलेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:42 IST

सातारा : ‘पवार साहेबांनी फार अभ्यासपूर्ण आत्मचरित्र लिहिलंय. बारामती येथून शेतमाल घेऊन ते पुण्याला गेले होते. तेथील मार्केट कमिटीमध्ये ...

सातारा : ‘पवार साहेबांनी फार अभ्यासपूर्ण आत्मचरित्र लिहिलंय. बारामती येथून शेतमाल घेऊन ते पुण्याला गेले होते. तेथील मार्केट कमिटीमध्ये त्यांना कशा पद्धतीने लुटले गेले, याचे वर्णन केलेय. शेतकऱ्याला मार्केट कमिटीच्या बाहेर माल विकण्याचा अधिकार असावा असं त्यांनी म्हटलंय. शरद पवार यांचं आत्मचरित्रच कृषी नीती कायदा म्हणून लागू करावं,’ असे मत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलंय.

खोत यांनी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये प्रसिद्धीमाध्यमांशी साधलेल्या संवादात केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचे समर्थन केले तसेच विरोध करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने दिल्लीतील आंदोलनकर्त्यांशी अनेक चर्चेच्या फेऱ्या केल्या. चांद, तारे, आकाश द्या अशा संबंधित शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. या आंदोलकर्त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नात रस नाही. दिल्लीच्या दख्तावर पंतप्रधान कोण असावा, यात त्यांना रस आहे. नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आंदोलन सुरू आहे. निवडणूक होत नाही तोवर विरोधक आंदोलन तापवत राहतील. अन्याय होणार असेल तर सरकारसमोर मांडून मार्ग काढावा. केंद्र सरकारने आता चर्चेचे दरवाजे बंद करावेत आणि कृषी कायद्यांची अंमलबजावणी सक्षमपणे देशभर करावी, शेतकऱ्यांना सक्षम बाजारपेठा निर्माण करून शेतमाल विक्री करण्याची मुभा द्यावी. आमचा बाप पिकवायला शिकला विकायला शिकला नाही. दिल्लीतील आंदोलनात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणारे लोक आहेत, त्यांचा नाद आता सोडावा.’

कृषी कायद्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने काय आणलंय, ते मोदींनी स्पष्ट करावं. काही लोकांना केंद्रातील तिजोरीतून करोडो रुपये हाणायचे आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर चुराडा करायचा. या देशामध्ये शेतमाल आधारभूत किंमतीनं खरेदी करायला सरकार तयार आहे. शेतकऱ्याला माल कुठे विकावा, याचं स्वातंत्र्य मिळावं.

चौकट..

‘पॉप गायिकेच्या ट्विटवर सचिन तेंडुलकर याने रिट्विट केले, त्यावर सचिनला शेतीमधील काय कळतं, अशी टीका शरद पवारांनी केली होती. याचंच मला हसू आलं. शरद पवार कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कधी किस्ताक घातलं होतं. ते कधी हिंदकेसरी झाले होते,’ असा प्रश्न खोत यांनी उपस्थित केला. आम्हीही नारळाच्यावर कुस्त्या खेळल्या असतील. मी सोडून बाकीच्यांना काही कळत नाही म्हणत इतरांना कमी लेखण्याची पद्धत महाराष्ट्रात रुजवली जात आहे. अनुभवातून दीर्घकाळ एका क्षेत्रात असल्यानंतर सर्वच अधिकार आपल्याला मिळत आहेत, अशी मानसिकता आहे. हे नवनेतृत्वाला हानीकारक आहे, असं मतही सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

(शरद पवार आणि सदाभाऊ खोत यांचे आयकार्ड फोटो वापरावेत)