शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

शरद पवारांनी केले दुष्काळी पर्यटन

By admin | Updated: September 5, 2015 23:25 IST

पालकमंत्र्यांचा हल्लाबोल : १५ वर्षांच्या सत्तेच्या काळात काही सुचलं नाही

सातारा : ‘शरद पवारांनी दुष्काळी जनतेवर सातत्याने अन्याय केला आहे. दुष्काळ हटविला तर आपली मते जातील, या भीतीने त्यांनी माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव, पुरंदर तालुक्यांतंील दुष्काळ मिटविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तसेच योजना रखडत ठेवून गरिबाला आणखी गरीब करण्याचे पाप त्यांनी केले आहे. आता ‘पुतणा मावशीचं’ प्रेम दाखवत त्यांनी माण-खटावच्या दुष्काळी भागात जाऊन ‘दुष्काळी पर्यटन’ केले,’ असा हल्लाबोल पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्'ाची टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर जोरदार टीका केली. पवार यांनी शुक्रवारी माण-खटावच्या दुष्काळी तालुक्यांचा दौरा केला होता, या अनुषंगाने ते म्हणाले, ‘शरद पवार यांच्यावर टीका करण्याइतपत मी मोठा नाही; पण ते चार वेळा मुख्यमंत्री होते. १५ वर्षे सातत्याने त्यांच्याकडे सत्ता होती. जलसंपदा खातेही त्यांच्याकडे होते. माण-खटाव तालुक्यांची त्यांना वाटणारी चिंता आधीच वाटली असती तर १९९७ मध्ये मंजुरी मिळालेली जिहे-कटापूर योजना त्याचवेळी पूर्ण झाली असती. या योजनेतून दुष्काळी तालुक्यांतील २७ हजार हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली आले असते. माण-खटावातील दुष्काळ हे शरद पवारांचेच पाप आहे. गरिबाला आणखी गरीब ठेवायचे. दुष्काळाच्या आधारावर मते मिळवायची, ती मते वर्षानुवर्षे आपल्यालाच कशी मिळतील, याची तजवीज करायची दृष्ट प्रवृत्ती त्यांची जुनीच आहे. ते देशाचे कृषिमंत्री असताना पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुके त्यांना का दिसले नाहीत.’ शरद पवारांवर केलेले आरोप आपण अत्यंत जबाबदारी करत असल्याचे स्पष्ट करत शिवतारे म्हणाले, ‘माण-खटाव तालुक्यांवर दुष्काळ हा पाचवीलाच पुजला आहे. त्यांच्या पुतण्याकडे सत्ता असताना त्यांनी हे काम पूर्ण केले नाही. अनुशेषाचं भूत माथ्यावर घातल्यानं पुरंदर, फलटण, कोरेगाव, माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांकडे दुर्लक्ष करुन त्यांनी आपल्या मतदारसंघापुरते बारामतीकडेच लक्ष केंद्रित केले. पाणी जाणीवपूर्वक त्यांनी बारामतीकडे पळविले. त्यांच्या या धोरणामुळे दुष्काळी तालुके अक्षरश: नागवले गेले आहेत.’