शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी केले दुष्काळी पर्यटन

By admin | Updated: September 5, 2015 23:25 IST

पालकमंत्र्यांचा हल्लाबोल : १५ वर्षांच्या सत्तेच्या काळात काही सुचलं नाही

सातारा : ‘शरद पवारांनी दुष्काळी जनतेवर सातत्याने अन्याय केला आहे. दुष्काळ हटविला तर आपली मते जातील, या भीतीने त्यांनी माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव, पुरंदर तालुक्यांतंील दुष्काळ मिटविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तसेच योजना रखडत ठेवून गरिबाला आणखी गरीब करण्याचे पाप त्यांनी केले आहे. आता ‘पुतणा मावशीचं’ प्रेम दाखवत त्यांनी माण-खटावच्या दुष्काळी भागात जाऊन ‘दुष्काळी पर्यटन’ केले,’ असा हल्लाबोल पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्'ाची टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर जोरदार टीका केली. पवार यांनी शुक्रवारी माण-खटावच्या दुष्काळी तालुक्यांचा दौरा केला होता, या अनुषंगाने ते म्हणाले, ‘शरद पवार यांच्यावर टीका करण्याइतपत मी मोठा नाही; पण ते चार वेळा मुख्यमंत्री होते. १५ वर्षे सातत्याने त्यांच्याकडे सत्ता होती. जलसंपदा खातेही त्यांच्याकडे होते. माण-खटाव तालुक्यांची त्यांना वाटणारी चिंता आधीच वाटली असती तर १९९७ मध्ये मंजुरी मिळालेली जिहे-कटापूर योजना त्याचवेळी पूर्ण झाली असती. या योजनेतून दुष्काळी तालुक्यांतील २७ हजार हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली आले असते. माण-खटावातील दुष्काळ हे शरद पवारांचेच पाप आहे. गरिबाला आणखी गरीब ठेवायचे. दुष्काळाच्या आधारावर मते मिळवायची, ती मते वर्षानुवर्षे आपल्यालाच कशी मिळतील, याची तजवीज करायची दृष्ट प्रवृत्ती त्यांची जुनीच आहे. ते देशाचे कृषिमंत्री असताना पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुके त्यांना का दिसले नाहीत.’ शरद पवारांवर केलेले आरोप आपण अत्यंत जबाबदारी करत असल्याचे स्पष्ट करत शिवतारे म्हणाले, ‘माण-खटाव तालुक्यांवर दुष्काळ हा पाचवीलाच पुजला आहे. त्यांच्या पुतण्याकडे सत्ता असताना त्यांनी हे काम पूर्ण केले नाही. अनुशेषाचं भूत माथ्यावर घातल्यानं पुरंदर, फलटण, कोरेगाव, माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांकडे दुर्लक्ष करुन त्यांनी आपल्या मतदारसंघापुरते बारामतीकडेच लक्ष केंद्रित केले. पाणी जाणीवपूर्वक त्यांनी बारामतीकडे पळविले. त्यांच्या या धोरणामुळे दुष्काळी तालुके अक्षरश: नागवले गेले आहेत.’