शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

शरद पवारांनी केले दुष्काळी पर्यटन

By admin | Updated: September 5, 2015 23:25 IST

पालकमंत्र्यांचा हल्लाबोल : १५ वर्षांच्या सत्तेच्या काळात काही सुचलं नाही

सातारा : ‘शरद पवारांनी दुष्काळी जनतेवर सातत्याने अन्याय केला आहे. दुष्काळ हटविला तर आपली मते जातील, या भीतीने त्यांनी माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव, पुरंदर तालुक्यांतंील दुष्काळ मिटविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तसेच योजना रखडत ठेवून गरिबाला आणखी गरीब करण्याचे पाप त्यांनी केले आहे. आता ‘पुतणा मावशीचं’ प्रेम दाखवत त्यांनी माण-खटावच्या दुष्काळी भागात जाऊन ‘दुष्काळी पर्यटन’ केले,’ असा हल्लाबोल पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्'ाची टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर जोरदार टीका केली. पवार यांनी शुक्रवारी माण-खटावच्या दुष्काळी तालुक्यांचा दौरा केला होता, या अनुषंगाने ते म्हणाले, ‘शरद पवार यांच्यावर टीका करण्याइतपत मी मोठा नाही; पण ते चार वेळा मुख्यमंत्री होते. १५ वर्षे सातत्याने त्यांच्याकडे सत्ता होती. जलसंपदा खातेही त्यांच्याकडे होते. माण-खटाव तालुक्यांची त्यांना वाटणारी चिंता आधीच वाटली असती तर १९९७ मध्ये मंजुरी मिळालेली जिहे-कटापूर योजना त्याचवेळी पूर्ण झाली असती. या योजनेतून दुष्काळी तालुक्यांतील २७ हजार हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली आले असते. माण-खटावातील दुष्काळ हे शरद पवारांचेच पाप आहे. गरिबाला आणखी गरीब ठेवायचे. दुष्काळाच्या आधारावर मते मिळवायची, ती मते वर्षानुवर्षे आपल्यालाच कशी मिळतील, याची तजवीज करायची दृष्ट प्रवृत्ती त्यांची जुनीच आहे. ते देशाचे कृषिमंत्री असताना पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुके त्यांना का दिसले नाहीत.’ शरद पवारांवर केलेले आरोप आपण अत्यंत जबाबदारी करत असल्याचे स्पष्ट करत शिवतारे म्हणाले, ‘माण-खटाव तालुक्यांवर दुष्काळ हा पाचवीलाच पुजला आहे. त्यांच्या पुतण्याकडे सत्ता असताना त्यांनी हे काम पूर्ण केले नाही. अनुशेषाचं भूत माथ्यावर घातल्यानं पुरंदर, फलटण, कोरेगाव, माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांकडे दुर्लक्ष करुन त्यांनी आपल्या मतदारसंघापुरते बारामतीकडेच लक्ष केंद्रित केले. पाणी जाणीवपूर्वक त्यांनी बारामतीकडे पळविले. त्यांच्या या धोरणामुळे दुष्काळी तालुके अक्षरश: नागवले गेले आहेत.’