शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतलं सगळं नीटनेटकं करतो : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:12 IST

कºहाड : ‘तुम्ही उसाचं वजन कसं वाढंल, याची चर्चा करा. मुंबईत सध्या काय चाललंय, त्याची चर्चा करत बसू नका. ...

कºहाड : ‘तुम्ही उसाचं वजन कसं वाढंल, याची चर्चा करा. मुंबईत सध्या काय चाललंय, त्याची चर्चा करत बसू नका. मी ते सगळं नीटनेटकं करतो. त्याची काळजी करू नका. फक्त आमदार बाळासाहेब पाटील यांना तेवढं इथल्या जबाबदारीतून मुक्त करा,’ असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकप्रकारे राज्यात आपलेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला. तर बाळासाहेब पाटील यांच्या मंत्रिपदाचे संकेतही त्यांनी दिले.यशवंतनगर, ता. कºहाड येथील सह्णाद्री सहकारी साखर कारखान्याचा ४६ वा गळीत हंगाम प्रारंभ शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी पार पडला. यावेळी सह्णाद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटनही पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. तर माजी सहकारमंत्री डॉ. एन. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.शरद पवार म्हणाले, ‘आपण शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितले पाहिजे; पण आता शेतकऱ्यांच्या सगळ्याच पोरांनी शेती करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. जमिनीचे तुकडे होत चालल्याने शेतकऱ्यांच्या मुलांनी इतर व्यवसायाकडेही वळले पाहिजे.’खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘सह्याद्री’वर येता घाला, सह्यगिरी हा धावून गेला’ हा यशवंतराव चव्हाणांचा इतिहास आहे. तोच कणखर बाणा आज शरद पवारांच्या रुपाने आपल्याला पाहायला मिळत आहे.’आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘आम्ही मंडळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने जाणारी आहोत. तो विचार पुढे नेण्याचे काम शरद पवार करीत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची साथ कदापि सोडणार नाही. आम्हालाही सत्तेची स्वप्ने दाखविली गेली होती; पण आम्ही विचारापासून ढळणार नाही.’कार्यक्रमाला आमदार मोहनराव कदम, प्रभाकर देशमुख, अरुण लाड, सत्यजित पाटणकर, राजेश पाटील-वाठारकर, नितीन पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, रावसाहेब पाटील, नितीन पाटील यांच्यासह साखर कारखान्याचे सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी स्वागत केले. आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले.बक्षीस घ्यायचा कंटाळा येत नाही?सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा अतिशय उत्तम चाललेला कारखाना आहे. त्यामुळे प्रत्येकवर्षी त्याला शासनाचा कोणता ना कोणतातरी पुरस्कार मिळतच असतो. बºयाचदा पुरस्कार वितरणाला मीच असतो. तेव्हा एकदा मी बाळासाहेब पाटील यांना म्हटलं की, ‘तुम्हाला बक्षीस घ्यायचा कंटाळा येत नाही का? जरा दुसºयांना मिळू द्या...’ त्यावर एकच खसखस पिकली.