शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

शंभू महादेव भक्तांची सावली हरपली!

By admin | Updated: January 18, 2016 23:34 IST

शिखर शिंगणापूर : उमाबनातील बेसुमार वृक्षतोडीमुळे पाणीटंचाईचे सावट

दहिवडी : दुष्काळ, पाणी टंचाईचे सावट गडद होत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड आणि संगोपन गरजेचे ठरत असताना, शिखर शिंगणापूरमध्ये मात्र उमाबनात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. वृक्ष तोडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर समस्यांना आमंत्रण दिले जात आहे.तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने शिखर शिंगणापूरला बारमाही भाविक येतात. शंभू महादेवाचे दर्शन घेऊन उमाबनातील झाडांच्या गडद सावलीत भाविक विश्रांती घेतात. दरवर्षीपेक्षा मागील पावसाळ्यात पडलेल्या पावसाळ्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. संपूर्ण राज्यात शेतकरी वर्ग दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेला असताना वृक्षराजी राखणे महत्त्वाचे ठरले आहे. एकीकडे शासन कोट्यवधींचा निधी वन संगोपनासाठी खर्ची घालत असताना दुसरीकडे शिखर शिंगणापूमध्ये या कार्यक्रमाला तिलांजली देण्याचे प्रकार पाहावयास मिळत आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून शिंगणापूर ग्रामपंचायतीत वनरक्षकच नसल्याने उमाबनातील झाडांची बेसुमार तोड होत आहे. वृक्षांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. राजरोसपणे चाललेली वृक्षतोड पाहूनही शिंगणापूर ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. उलट झाडे तोडणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसत आहे. शिंगणापूर मधील उमाबन हे सुमारे शंभर ते दीडशे एकर क्षेत्रावर पसरले असून, यात्रेकरूंच्या सोयीसाठी व देवाला सोडलेल्या गायींना चरण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. फेरफंड कमिटी ही ग्रामपंचायतीच्या स्थापनेपूर्वी होती. त्या काळापासून उमाबन यात्रेकरूंसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली उमाबन आहे. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपरण, चिंच, कारंज अशा गडद सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड जाणीवपूर्वक करण्यात आली होती. या वृक्षांखाली वर्षानुवर्षे कावडी घेऊन येणारे यात्रेकरू थांबतात. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बांधीव दगडी विहिरीद्वारे करण्यात आली होती. ही दगडी विहीर सुस्थितीत आहे.शिंगणापूरमध्ये चैत्र महिन्यात यात्रा भरते. ही यात्रा सर्वांत मोठी असते. ऐन उन्हाळ्यात यात्रा असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून येणाऱ्या यात्रेकरूंना उमाबनातील बहुवर्षीय, बहुपर्णी गडद सावली देणाऱ्या वृक्षांचा आधार वाटतो. याच वृक्षांची बेसुमार तोड होत आहे. संंबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक तोड सुरू ठेवली आहे. राज्याच्या जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी नुकतीच येथे भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या झाडांची जोपासना करण्याबाबत मौलिक सूचना दिल्या होत्या; परंतु त्याची अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. याबाबत निसर्गप्रेमींनी ग्रामपंचायतीत प्रश्न मांडूनसुद्धा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. ही बेसुमार वृक्षतोड न थांबल्यास उमाबनाचा केवळ उल्लेखच राहील आणि ते कुठे होते याचा शोध घ्यावा लागेल. उमाबनात वृक्षसंवर्धन, वृक्षसंख्येत वाढ होऊन पर्यटन विकास व्हावा, यासाठी काही ठोस उपाययोजना करून पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज आहे. शिंगणापूरचे शंभू महादेव हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे यात्राकाळात महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्यांना त्यांची हक्काची सावली मिळवून देण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे.जलसंधारण खात्याकडून शिंगणापूर येथील ऐतिहासिक विहिरीतील गाळ काढणे, डागडुजी करणे आणि विहीर पुनरुज्जीवित केल्यास पाणी टंचाईवर मात करणे शक्य आहे. ग्रामपंचायतीने विहिरीची स्वच्छता प्रत्यक्षात सुरू केल्याबद्दल शिंगणापूर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)ग्रामपंचायतीने कुऱ्हाडबंदी करावी : मोरेशिंगणापुरात उन्हाळ्यात यात्रा भरते. लाखोंच्या संख्येने भाविक येतात. उन्हाची तीव्रता कमी होण्यासाठी वृक्षतोड थांबविणे गरजेचे असून, वनसंवर्धनाची गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने कुऱ्हाडबंदी करावी,’ अशी मागणी जयकुमार मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.उमाबनात वीस वर्षांपूर्वी वृृक्षांची भरपूर संख्या होती. पर्जन्यमान चांगले होते. परंतु अलीकडच्या काळात बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या घटली आहे. निसर्गप्रेमी म्हणून मनावर मोठा आघात झाल्यासारखे वाटते.- संजय बडवे उमाबनात चाललेल्या बेसुमार वृक्षतोडीवर कारवाई होणे गरजेचे आहे. कायद्यात यासाठी तरतूद असून, त्याप्रमाणे अंमलबजावणी मात्र होत नाही. वृक्षांची जोपासना होऊन कत्तल थांबविली गेली पाहिजे.- रवी वाघ