शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

शंभू महादेव भक्तांची सावली हरपली!

By admin | Updated: January 18, 2016 23:34 IST

शिखर शिंगणापूर : उमाबनातील बेसुमार वृक्षतोडीमुळे पाणीटंचाईचे सावट

दहिवडी : दुष्काळ, पाणी टंचाईचे सावट गडद होत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड आणि संगोपन गरजेचे ठरत असताना, शिखर शिंगणापूरमध्ये मात्र उमाबनात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. वृक्ष तोडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर समस्यांना आमंत्रण दिले जात आहे.तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने शिखर शिंगणापूरला बारमाही भाविक येतात. शंभू महादेवाचे दर्शन घेऊन उमाबनातील झाडांच्या गडद सावलीत भाविक विश्रांती घेतात. दरवर्षीपेक्षा मागील पावसाळ्यात पडलेल्या पावसाळ्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. संपूर्ण राज्यात शेतकरी वर्ग दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेला असताना वृक्षराजी राखणे महत्त्वाचे ठरले आहे. एकीकडे शासन कोट्यवधींचा निधी वन संगोपनासाठी खर्ची घालत असताना दुसरीकडे शिखर शिंगणापूमध्ये या कार्यक्रमाला तिलांजली देण्याचे प्रकार पाहावयास मिळत आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून शिंगणापूर ग्रामपंचायतीत वनरक्षकच नसल्याने उमाबनातील झाडांची बेसुमार तोड होत आहे. वृक्षांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. राजरोसपणे चाललेली वृक्षतोड पाहूनही शिंगणापूर ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. उलट झाडे तोडणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसत आहे. शिंगणापूर मधील उमाबन हे सुमारे शंभर ते दीडशे एकर क्षेत्रावर पसरले असून, यात्रेकरूंच्या सोयीसाठी व देवाला सोडलेल्या गायींना चरण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. फेरफंड कमिटी ही ग्रामपंचायतीच्या स्थापनेपूर्वी होती. त्या काळापासून उमाबन यात्रेकरूंसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली उमाबन आहे. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपरण, चिंच, कारंज अशा गडद सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड जाणीवपूर्वक करण्यात आली होती. या वृक्षांखाली वर्षानुवर्षे कावडी घेऊन येणारे यात्रेकरू थांबतात. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बांधीव दगडी विहिरीद्वारे करण्यात आली होती. ही दगडी विहीर सुस्थितीत आहे.शिंगणापूरमध्ये चैत्र महिन्यात यात्रा भरते. ही यात्रा सर्वांत मोठी असते. ऐन उन्हाळ्यात यात्रा असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून येणाऱ्या यात्रेकरूंना उमाबनातील बहुवर्षीय, बहुपर्णी गडद सावली देणाऱ्या वृक्षांचा आधार वाटतो. याच वृक्षांची बेसुमार तोड होत आहे. संंबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक तोड सुरू ठेवली आहे. राज्याच्या जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी नुकतीच येथे भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या झाडांची जोपासना करण्याबाबत मौलिक सूचना दिल्या होत्या; परंतु त्याची अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. याबाबत निसर्गप्रेमींनी ग्रामपंचायतीत प्रश्न मांडूनसुद्धा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. ही बेसुमार वृक्षतोड न थांबल्यास उमाबनाचा केवळ उल्लेखच राहील आणि ते कुठे होते याचा शोध घ्यावा लागेल. उमाबनात वृक्षसंवर्धन, वृक्षसंख्येत वाढ होऊन पर्यटन विकास व्हावा, यासाठी काही ठोस उपाययोजना करून पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज आहे. शिंगणापूरचे शंभू महादेव हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे यात्राकाळात महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्यांना त्यांची हक्काची सावली मिळवून देण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे.जलसंधारण खात्याकडून शिंगणापूर येथील ऐतिहासिक विहिरीतील गाळ काढणे, डागडुजी करणे आणि विहीर पुनरुज्जीवित केल्यास पाणी टंचाईवर मात करणे शक्य आहे. ग्रामपंचायतीने विहिरीची स्वच्छता प्रत्यक्षात सुरू केल्याबद्दल शिंगणापूर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)ग्रामपंचायतीने कुऱ्हाडबंदी करावी : मोरेशिंगणापुरात उन्हाळ्यात यात्रा भरते. लाखोंच्या संख्येने भाविक येतात. उन्हाची तीव्रता कमी होण्यासाठी वृक्षतोड थांबविणे गरजेचे असून, वनसंवर्धनाची गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने कुऱ्हाडबंदी करावी,’ अशी मागणी जयकुमार मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.उमाबनात वीस वर्षांपूर्वी वृृक्षांची भरपूर संख्या होती. पर्जन्यमान चांगले होते. परंतु अलीकडच्या काळात बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या घटली आहे. निसर्गप्रेमी म्हणून मनावर मोठा आघात झाल्यासारखे वाटते.- संजय बडवे उमाबनात चाललेल्या बेसुमार वृक्षतोडीवर कारवाई होणे गरजेचे आहे. कायद्यात यासाठी तरतूद असून, त्याप्रमाणे अंमलबजावणी मात्र होत नाही. वृक्षांची जोपासना होऊन कत्तल थांबविली गेली पाहिजे.- रवी वाघ