शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अवकाळी पावसाने शाळू भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST

गत आठवड्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत होता. त्यामुळे शेतकरी आधीच हैराण झाले होते. त्यातच सोमवारी रात्री ...

गत आठवड्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत होता. त्यामुळे शेतकरी आधीच हैराण झाले होते. त्यातच सोमवारी रात्री अवकाळी पावसाने परिसरातील शामगाव, अंतवडी, रिसवड, पाचुंद, मेरवेवाडी आदी गावांना झोडपल्याने शाळू पिके भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांवर अवकाळी संकट कोसळले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार आहे. शामगावच्या शिवारातील सुमारे पन्नास टक्के पीक भुईसपाट झाले आहे. तर अंतवडी, पाचुंद, मेरवेवाडी आदी गावांमध्येही नुकसान झाले आहे.

परिसरात यावर्षी पेरणी लवकर झाली होती. तसेच पोषक वातावरणामुळे पिकांची वाढ जोमाने झाली होती. चांगले उत्पन्न मिळणार, या आशेने शेतकरी सुखावले होते. मात्र, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व अपेक्षा धुळीस मिळविल्या आहेत. शामगाव येथील राजेंद्र धर्मा पोळ यांचे सर्व पीक जमीनदोस्त झाले आहे.

- चौकट

माळरानाच्या पिकांसाठी पाऊस पोषक

हा अवकाळी पाऊस माळरानावरील पिकांसाठी वरदान ठरला आहे. माळरानावरील पाणी नसलेले शाळू आता या पावसामुळे जोमाने वाढणार आहेत. परिणामी, माळरानावरील शेतकरी समाधानी आहेत. विभागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

फोटो : ०५केआरडी०५

कॅप्शन : शामगाव, ता. कऱ्हाड येथे अवकाळी पावसाने शाळू पीक भुईसपाट झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत. (छाया : बाळकृष्ण शिंदे)