शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची छाया

By admin | Updated: July 6, 2014 23:22 IST

कोयनेच्या पोटात खड्डा :

कोयनेच्या पोटात खड्डा : धरण बांधण्यापूर्वीच्या गावठाणांचे अवशेष उघडे; ‘अतिवृष्टीच्या’ महाबळेश्वरची वनराईही तहानलीसूर्यकांत पाटणकर ल्ल पाटण , पावसाने दडी मारल्यामुळे ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळखले जाणारे कोयना धरणही आटले आहे. पावसाअभावी कोयनेच्या उपनद्याही कोरड्या पडल्या असून, धरणातील जलसाठ्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. धरणात फक्त सात टीएमसी पाणी शिल्लक आहे. पावसाची हीच स्थिती कायम राहिल्यास तेही पाणी संपेल आणि महाराष्ट्रावर १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची परिस्थिती ओढवेल. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांच्या विजेची व सिंचनाची गरज भागविणाऱ्या कोयना धरणात केवळ पंधरा दिवस पुरेल एवढा म्हणजेच सात टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाअभावी धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा पूर्णपणे बंद आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार पूर्वेकडे दररोज अर्धा टीएमसी पाणी सोडावे लागत आहे. एकीकडे पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी सोडावे लागणारे पाणी, पावसामुळे बंद असलेला येवा आणि दुसरीकडे कृष्णा लवादानुसार पूर्वेकडील सांगली पाटबंधारे विभागाला सिंचनासाठी सोडावे लागणारे पाणी यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. आगामी दिवसांत हीच स्थिती कायम राहिल्यास वीजटंचाईसह सिंचनाचाही प्रश्न गंभीर रूप धारण करणार आहे. राज्य शासनाने १९५६ ते १९६२ या काळात जलविद्युत निर्मितीसाठी हा प्रकल्प बांधला. १०५.२५ टीएमसी पाणी साठवणक्षमता असणाऱ्या कोयना प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामधून केवळ १६० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे, तर १००० मेगावॉट वीजनिर्मिती करणारा चौथा टप्पा पूर्णपणे बंद आहे. आणखी पंधरा दिवस पावसाची स्थिती कायम राहिल्यास कोयना प्रकल्पाची वीजनिर्मिती पूर्ण ठप्प होऊन पूर्वेकडील सिंचनाचा प्रश्न उग्र होऊ शकतो.कोयना धरणाच्या इतिहासात १९७२ आणि १९९५ या वर्षांनंतर यावर्षीच पाण्याची पातळी इतकी खोल गेली आहे. धरणातील खालावत गेलेल्या पाणीपातळीमुळे जुनी गावठाणे उघडी पडली आहेत. जुलै महिन्यात रस्त्यावरून दरवर्षी धरणाचे दिसणारे निसर्गरम्य दृश्य यंदा दिसत नसल्यामुळे जुन्या गावांचे अवशेष पाहून येथील भूमिपुत्र भूतकाळाला उजाळा देत आहेत. त्यांना हे दृश्य काहीसे सुखावणारे असले तरी राज्यातील जनतेच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे. एरवी धरणाच्या पाण्यातून तरंगत जाणारे ग्रामस्थ धरणातील उघड्या पडलेल्या गावठाणांच्या अवशेषांमधून उड्या मारत जात आहेत. यावरूनच धरणाच्या स्थितीची भीषणता स्पष्ट होत आहे. शिवसागरावर डौलाने डोलणाऱ्या लाँच आणि तराफाही कोरड्या जमिनीवर विखुरलेल्या दिसत आहेत.