शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

१९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची छाया

By admin | Updated: July 6, 2014 23:22 IST

कोयनेच्या पोटात खड्डा :

कोयनेच्या पोटात खड्डा : धरण बांधण्यापूर्वीच्या गावठाणांचे अवशेष उघडे; ‘अतिवृष्टीच्या’ महाबळेश्वरची वनराईही तहानलीसूर्यकांत पाटणकर ल्ल पाटण , पावसाने दडी मारल्यामुळे ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळखले जाणारे कोयना धरणही आटले आहे. पावसाअभावी कोयनेच्या उपनद्याही कोरड्या पडल्या असून, धरणातील जलसाठ्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. धरणात फक्त सात टीएमसी पाणी शिल्लक आहे. पावसाची हीच स्थिती कायम राहिल्यास तेही पाणी संपेल आणि महाराष्ट्रावर १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची परिस्थिती ओढवेल. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांच्या विजेची व सिंचनाची गरज भागविणाऱ्या कोयना धरणात केवळ पंधरा दिवस पुरेल एवढा म्हणजेच सात टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाअभावी धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा पूर्णपणे बंद आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार पूर्वेकडे दररोज अर्धा टीएमसी पाणी सोडावे लागत आहे. एकीकडे पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी सोडावे लागणारे पाणी, पावसामुळे बंद असलेला येवा आणि दुसरीकडे कृष्णा लवादानुसार पूर्वेकडील सांगली पाटबंधारे विभागाला सिंचनासाठी सोडावे लागणारे पाणी यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. आगामी दिवसांत हीच स्थिती कायम राहिल्यास वीजटंचाईसह सिंचनाचाही प्रश्न गंभीर रूप धारण करणार आहे. राज्य शासनाने १९५६ ते १९६२ या काळात जलविद्युत निर्मितीसाठी हा प्रकल्प बांधला. १०५.२५ टीएमसी पाणी साठवणक्षमता असणाऱ्या कोयना प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामधून केवळ १६० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे, तर १००० मेगावॉट वीजनिर्मिती करणारा चौथा टप्पा पूर्णपणे बंद आहे. आणखी पंधरा दिवस पावसाची स्थिती कायम राहिल्यास कोयना प्रकल्पाची वीजनिर्मिती पूर्ण ठप्प होऊन पूर्वेकडील सिंचनाचा प्रश्न उग्र होऊ शकतो.कोयना धरणाच्या इतिहासात १९७२ आणि १९९५ या वर्षांनंतर यावर्षीच पाण्याची पातळी इतकी खोल गेली आहे. धरणातील खालावत गेलेल्या पाणीपातळीमुळे जुनी गावठाणे उघडी पडली आहेत. जुलै महिन्यात रस्त्यावरून दरवर्षी धरणाचे दिसणारे निसर्गरम्य दृश्य यंदा दिसत नसल्यामुळे जुन्या गावांचे अवशेष पाहून येथील भूमिपुत्र भूतकाळाला उजाळा देत आहेत. त्यांना हे दृश्य काहीसे सुखावणारे असले तरी राज्यातील जनतेच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे. एरवी धरणाच्या पाण्यातून तरंगत जाणारे ग्रामस्थ धरणातील उघड्या पडलेल्या गावठाणांच्या अवशेषांमधून उड्या मारत जात आहेत. यावरूनच धरणाच्या स्थितीची भीषणता स्पष्ट होत आहे. शिवसागरावर डौलाने डोलणाऱ्या लाँच आणि तराफाही कोरड्या जमिनीवर विखुरलेल्या दिसत आहेत.