शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

तांबीवर ‘माळीण’ची छाया

By admin | Updated: September 1, 2014 23:06 IST

जीविताला धोका : ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा : सातारा तालुक्यातील तांबी या गावात जमीन खचली असून, झाडांच्या मुळांची माती सुटली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीविताला धोका असून, माळीण गावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, असे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.तांबी हे कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावठाण आहे.या गावाला आलवडी-धावली ग्रुप ग्रामपंचायत असून, ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसूल केली जाते. तथापि, ग्रामस्थांच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण केल्या जात नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. या गावाच्या खालच्या बाजूने रस्ता करण्यात आला आहे. तेथे खोल दरी व ग्रामस्थांच्या मालकीची जमीन आहे. यंदाच्या पावसाळ्यात ही जमीन खचली असून झाडांच्या मुळांची माती सुटली असल्याने धोका निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.१९६३ मध्ये या गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते. पन्नास वर्षे पूर्ण होऊनही ग्रामस्थांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. गावच्या वाघजाई महाकाली देवीच्या यात्रेला महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक जमतात.देवस्थानची २७०० एकर जमीन कसबे तांबी (ता. जावली) येथे होती; मात्र सातारा तालुक्यात एक गुंठाही जागा मिळाली नाही. या सर्व बाबींवर योग्य विचार करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)खडतर जीवनतांबी गावात एकूण बावीस घरे असून, लोकसंख्या शंभरच्या आसपास आहे. गवा, रानडुकरे यांसारख्या वन्यजीवांकडून शेतीचे नुकसान होत आहे. अतिपाऊस आणि वन्यजीवांमुळे शेती करता येत नसल्याने गावातील तरुण मुंबई-पुण्याला जाऊन उदरनिर्वाह करतात. आता जमीन खचल्याने नवेच संकट उभे राहिले असून, त्यामुळे ग्रामस्थ हादरून गेले आहेत.