शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तांबीवर ‘माळीण’ची छाया

By admin | Updated: September 1, 2014 23:06 IST

जीविताला धोका : ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा : सातारा तालुक्यातील तांबी या गावात जमीन खचली असून, झाडांच्या मुळांची माती सुटली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीविताला धोका असून, माळीण गावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, असे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.तांबी हे कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावठाण आहे.या गावाला आलवडी-धावली ग्रुप ग्रामपंचायत असून, ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसूल केली जाते. तथापि, ग्रामस्थांच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण केल्या जात नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. या गावाच्या खालच्या बाजूने रस्ता करण्यात आला आहे. तेथे खोल दरी व ग्रामस्थांच्या मालकीची जमीन आहे. यंदाच्या पावसाळ्यात ही जमीन खचली असून झाडांच्या मुळांची माती सुटली असल्याने धोका निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.१९६३ मध्ये या गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते. पन्नास वर्षे पूर्ण होऊनही ग्रामस्थांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. गावच्या वाघजाई महाकाली देवीच्या यात्रेला महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक जमतात.देवस्थानची २७०० एकर जमीन कसबे तांबी (ता. जावली) येथे होती; मात्र सातारा तालुक्यात एक गुंठाही जागा मिळाली नाही. या सर्व बाबींवर योग्य विचार करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)खडतर जीवनतांबी गावात एकूण बावीस घरे असून, लोकसंख्या शंभरच्या आसपास आहे. गवा, रानडुकरे यांसारख्या वन्यजीवांकडून शेतीचे नुकसान होत आहे. अतिपाऊस आणि वन्यजीवांमुळे शेती करता येत नसल्याने गावातील तरुण मुंबई-पुण्याला जाऊन उदरनिर्वाह करतात. आता जमीन खचल्याने नवेच संकट उभे राहिले असून, त्यामुळे ग्रामस्थ हादरून गेले आहेत.