शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

तांबीवर ‘माळीण’ची छाया

By admin | Updated: September 1, 2014 23:06 IST

जीविताला धोका : ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा : सातारा तालुक्यातील तांबी या गावात जमीन खचली असून, झाडांच्या मुळांची माती सुटली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीविताला धोका असून, माळीण गावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, असे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.तांबी हे कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावठाण आहे.या गावाला आलवडी-धावली ग्रुप ग्रामपंचायत असून, ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसूल केली जाते. तथापि, ग्रामस्थांच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण केल्या जात नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. या गावाच्या खालच्या बाजूने रस्ता करण्यात आला आहे. तेथे खोल दरी व ग्रामस्थांच्या मालकीची जमीन आहे. यंदाच्या पावसाळ्यात ही जमीन खचली असून झाडांच्या मुळांची माती सुटली असल्याने धोका निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.१९६३ मध्ये या गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते. पन्नास वर्षे पूर्ण होऊनही ग्रामस्थांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. गावच्या वाघजाई महाकाली देवीच्या यात्रेला महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक जमतात.देवस्थानची २७०० एकर जमीन कसबे तांबी (ता. जावली) येथे होती; मात्र सातारा तालुक्यात एक गुंठाही जागा मिळाली नाही. या सर्व बाबींवर योग्य विचार करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)खडतर जीवनतांबी गावात एकूण बावीस घरे असून, लोकसंख्या शंभरच्या आसपास आहे. गवा, रानडुकरे यांसारख्या वन्यजीवांकडून शेतीचे नुकसान होत आहे. अतिपाऊस आणि वन्यजीवांमुळे शेती करता येत नसल्याने गावातील तरुण मुंबई-पुण्याला जाऊन उदरनिर्वाह करतात. आता जमीन खचल्याने नवेच संकट उभे राहिले असून, त्यामुळे ग्रामस्थ हादरून गेले आहेत.