शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘शान’च्या आर्त सुरानंतर बरसले ‘काळे मेघ’...

By admin | Updated: June 3, 2016 00:44 IST

सर्कलवाडी : काले मेघा.. काले मेघा.. पानी तो बरसाओ; श्रमदानात गायकाचा आलाप...

वाठार स्टेशन : ‘काले मेघा... काले मेघा... पाणी तो बरसाओ..!’ हे अभिनेता अमीर खान यांच्या लगान या चित्रपटात ज्यांनी हे गीत गायलं, तेच गायक शान यांनी आज पुन्हा हे गीत कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी गावच्या रोहिडा, सोळकी डोंगरकपारीत पाण्यासाठी श्रमदान करणाऱ्या शेकडो लोकांसाठी गायलं. या गीताने मात्र उपस्थितांची मने हेलावून गेली. विशेष म्हणजे या परिसरात संध्याकाळी काळे मेघ चक्क बरसले.अभिनेता अमीर खान याच्या प्रयत्नातून वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी गावात गुरुवारी सकाळी ८ वाजता सुमारे ८०० लोक श्रमदानाच्या निमित्ताने डोंगर तळाशी सलग समतल स्तर खुदाईसाठी एकत्र जमले होते. लहान मुलांपासून आबालवृद्धही यामध्ये होते. तसेच शासनाच्या महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पार्श्वगायक शान, स्तंभलेखक डॉ. वेदप्रकाश वैदिक, रिना दत्ता, लेखक निरंजन अय्यंगार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, प्रांताधिकारी अजय पवार, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, नायब तहसीलदार रवींद्र रांजणे, तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ, कृषी मंडलाधिकारी मोहन गायकवाड, सरपंच रेश्मा काटकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. स्तंभलेखक डॉ. वेदप्रकाश वैदिक म्हणाले, ‘६० वर्षांपूर्वी विनोबा भावे इंदोरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी सर्वोदयच्या माध्यमातून अशी कामे सुरू केली होती. मात्र त्यानंतर आपला देश राजकारण्यांच्या हाती गेला. राजकारणी लोक अशा कुठल्याही श्रमदानाचा पुरस्कार करत नाहीत. ते त्यांना हवे असलेले काम नोकरशाहीकडून करून घेतात. नोकरशाहीकडून परिवर्तन आणि विकास करून घेता येतो असे राजकारण्यांना वाटते. मात्र श्रमदानही देशाला विकासाच्या मार्गावर नेणारी एक चावी आहे. जो ही फिरवेल तो या देशाचा नेता होऊ शकेल. आज पंतप्रधान, खासदार, आमदार होणे ही फार अवघड बाब राहिली नाही. मात्र जननायक होणं आज अवघड आहे. श्रमदान ही खूप मोठी शक्ती आहे; पण आज श्रमदानाला किंमत दिली जात नाही. श्रमदान करणाऱ्या व्यक्तीला अडाणी समजले जाते हीच खरी खंत आहे.’जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, ‘सर्कलवाडी ग्रामस्थांच्या एकीतून, श्रमातून झालेलं हे काम भविष्यातला दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करणार आहे. हे सातत्य कायम ठेवा. गावतील उर्वरित कामेही यापुढे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पूर्ण केली जातील.’ (वार्ताहर) बाशिंग मुंडावळ्यासह दाम्पत्य श्रमदानाला...सर्कलवाडी हे सुमारे १४०० लोकसंख्येचं गाव आहे. गेल्या ५० दिवसांपासून या गावाने पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग घेत वॉटर कप स्पर्धेचे निकष पूर्ण केले आहेत. आज या गावातील जवळपास ८०० लोकांनी श्रमदानात सहभाग घेतला होता. गावातील महेंद्र साळुंके यांचा नुकताच विवाह झाला होता. गावातील सर्वच लोक पाण्यासाठी यज्ञ करत असताना या दाम्पत्यालाही श्रमदानाचा मोह आवरला नाही. या नवविवाहीत दाम्पत्याने या ठिकाणी श्रमदानाचा हक्क बजावला. यावेळी शान यांनी या दाम्पत्यासाठी गाणं गाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. श्रमदानासाठी तुतारी, डॉल्बीगावापासून दोन मैल अंतरावर रोहिडा आणि सोळकी या डोंगरपायथ्याला साराच गाव जमला होता. सकाळच्या या वातावरणात काम करणाऱ्या युवकांसाठी खास डॉल्बीची धून तर वयोवृद्धांसाठी शिंगाडी, तुतारी वाजवत घोषणा देत लोक काम करत होते.सर्कलवाडी गावात ७० ते ८० टीसीएम पाणीसाठा होईल एवढं काम गावातील लोकांच्या श्रमदानातून झालं आहे. राहिलेल्या तीन दिवसांत १२५ टीसीएमचे उद्दिष्ट ही पूर्ण होईल. श्रमदानाचा हा जागर महिन्यापासून सुरू आहे. यासाठी ८० लोकांचा एक गट याप्रमाणे आम्ही ८ गट केले आहेत. त्यामुळे हे काम शक्य झाले आहे. - रेश्मा सरकाळे, सरपंच