शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

हातात सातबारा.. तरीही कर्जाचा फॉर्म कोरा!

By admin | Updated: December 10, 2015 01:01 IST

शेतकऱ्यांना महसुली फटका : संगणकीकरणाच्या नावाखाली बोजा चढविण्यास प्रशासनाचा नकार; वाई तालुक्यातील शेतकरी त्रस्त

संजीव वरे -- वाई या वर्षी वाई तालुक्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. येत्या काळात पाणीटंचाई व दुष्काळाचे सावट उभे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले असताना अनेक शेतकऱ्यांची गोची झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकेतून पीक व शेतीपूरक कर्जे गेली दोन महिने मंजूर झालेली आहेत; मात्र शेतीच्या सातबाऱ्यावर त्याची नोंद व बोजा न चढवून मिळाल्यामुळे बँका पैसे देईना तर तलाठी, सर्कल व तहसील विभाग शासनाचे संगणीकृत उतारे देण्याचे आदेश असल्याने पूर्वीसारखे हस्तलिखित उतारे व दाखले देता येत नाहीत, हे कारण सांगून अडवणूक केली जातेय.गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी बँका व तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत; परंतु याची दखल कोणीच न घेत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. या विभागाबाबत शेतकऱ्यांच्यात असंतोष निर्माण झाला असून, संतापाची लाट उसळली आहे.दरवर्षी तालुक्यातील शेतकरी हे सोसायट्या, जिल्हा सहकारी बँक व राष्ट्रीयकृत अनेक बँकातून शेतीसाठी पीक कर्जे व पुरक व्यवसायासाठी कर्जे घेत असतात. या वर्षीही अनेक शेतकऱ्यांची बँकांनी कर्जे मंजूर केली आहेत.त्यांच्या खात्यावर रक्कम टाकण्यापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या कर्जाचा बोजा चढवून त्याचा फेरफार व सातबारा बँकांना द्यावा लागतो. दि. २३ आॅक्टोबर २०१५ च्या शासन संगणकाद्वारे सर्व सातबारे व दाखले देणार या आदेशाचे कारण पुढे देत तलाठी सर्कल व तहसील विभाग गेली दोन महिने सातबारे व दाखले देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मंजूर असलेले कर्जाऊ पैसे बँका देत नाहीत. उताऱ्यासाठी शेतकरी बँका व तलाठी कार्यालयामध्ये हेलपाटे मारत आहेत. व आर्थिक अडचणीत आले आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनस्तरावर लवकर निर्णय घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत.हेलपाट्यावर हेलपाटे..!संगणकीकरण उतारे व दाखले यांच्या नोंदी राहतात. परंतु हस्तलिखित उतारे व दाखले यांच्या नोंदी नसतात. याचे पैसे संबंधितांना मिळतात. त्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे त्यामुळेही अनेकवेळा टाळाटाळ व दिरंगाई लावली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारून त्याचा वेळ व प्रवासखर्च जातो.गेली दोन महिने झाले. बँकेतून कर्ज मंजूर झाले आहे. परंतु तलाठ्याकडून त्याचा बोजा चढवून फेरफार व सातबारा न मिळाल्यामुळे मला बँक पैसे देत नाही. याबाबत संबंधित विभागाकडे सारखे हेलपाटे मारत आहेत.- देविदास जगताप, शेतकरी, शेंदुरजणे,ता. वाई.मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र पाठवले आहे. परंतु आमची दखल घेतली जात नाही. संगणकीकरणाला अजून किती कालावधी लागणार व आम्हाला पैसे मिळणार का नाही? या चिंतेत सध्या आम्ही आहोत.- धनाजी शिंदे, परखंदीबँका ‘उदार’ अन्अण्णासाहेब ‘ताठ’बँकांनी शेतकऱ्यांना कर्जे मंजूर केली आहेत. काहीच्या खात्यावरही पैसे टाकले गेले आहेत़; परंतु तलाठ्याच्या कर्जाचा बोजा न चढवून सातबारा उतारा न मिळाल्याने पैसे देत नाहीत. तर आम्हाला अधिकार नाही यामुळे ‘अण्णासाहेब’ ताठ आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचे, त्यांना वाली कोण?तलाठीच मिळेनात..तालुक्यात एका तलाठ्याकडे पाच ते सहा गावे आहेत. त्यामुळे अनेक गावात तलाठीच पोहोचत नाहीत. अनेक गावे असल्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना दाखले उतारे वेळेवर मिळत नाहीत व अडचणी निर्माण होतात.