शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

हातात सातबारा.. तरीही कर्जाचा फॉर्म कोरा!

By admin | Updated: December 10, 2015 01:01 IST

शेतकऱ्यांना महसुली फटका : संगणकीकरणाच्या नावाखाली बोजा चढविण्यास प्रशासनाचा नकार; वाई तालुक्यातील शेतकरी त्रस्त

संजीव वरे -- वाई या वर्षी वाई तालुक्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. येत्या काळात पाणीटंचाई व दुष्काळाचे सावट उभे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले असताना अनेक शेतकऱ्यांची गोची झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकेतून पीक व शेतीपूरक कर्जे गेली दोन महिने मंजूर झालेली आहेत; मात्र शेतीच्या सातबाऱ्यावर त्याची नोंद व बोजा न चढवून मिळाल्यामुळे बँका पैसे देईना तर तलाठी, सर्कल व तहसील विभाग शासनाचे संगणीकृत उतारे देण्याचे आदेश असल्याने पूर्वीसारखे हस्तलिखित उतारे व दाखले देता येत नाहीत, हे कारण सांगून अडवणूक केली जातेय.गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी बँका व तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत; परंतु याची दखल कोणीच न घेत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. या विभागाबाबत शेतकऱ्यांच्यात असंतोष निर्माण झाला असून, संतापाची लाट उसळली आहे.दरवर्षी तालुक्यातील शेतकरी हे सोसायट्या, जिल्हा सहकारी बँक व राष्ट्रीयकृत अनेक बँकातून शेतीसाठी पीक कर्जे व पुरक व्यवसायासाठी कर्जे घेत असतात. या वर्षीही अनेक शेतकऱ्यांची बँकांनी कर्जे मंजूर केली आहेत.त्यांच्या खात्यावर रक्कम टाकण्यापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या कर्जाचा बोजा चढवून त्याचा फेरफार व सातबारा बँकांना द्यावा लागतो. दि. २३ आॅक्टोबर २०१५ च्या शासन संगणकाद्वारे सर्व सातबारे व दाखले देणार या आदेशाचे कारण पुढे देत तलाठी सर्कल व तहसील विभाग गेली दोन महिने सातबारे व दाखले देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मंजूर असलेले कर्जाऊ पैसे बँका देत नाहीत. उताऱ्यासाठी शेतकरी बँका व तलाठी कार्यालयामध्ये हेलपाटे मारत आहेत. व आर्थिक अडचणीत आले आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनस्तरावर लवकर निर्णय घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत.हेलपाट्यावर हेलपाटे..!संगणकीकरण उतारे व दाखले यांच्या नोंदी राहतात. परंतु हस्तलिखित उतारे व दाखले यांच्या नोंदी नसतात. याचे पैसे संबंधितांना मिळतात. त्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे त्यामुळेही अनेकवेळा टाळाटाळ व दिरंगाई लावली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारून त्याचा वेळ व प्रवासखर्च जातो.गेली दोन महिने झाले. बँकेतून कर्ज मंजूर झाले आहे. परंतु तलाठ्याकडून त्याचा बोजा चढवून फेरफार व सातबारा न मिळाल्यामुळे मला बँक पैसे देत नाही. याबाबत संबंधित विभागाकडे सारखे हेलपाटे मारत आहेत.- देविदास जगताप, शेतकरी, शेंदुरजणे,ता. वाई.मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र पाठवले आहे. परंतु आमची दखल घेतली जात नाही. संगणकीकरणाला अजून किती कालावधी लागणार व आम्हाला पैसे मिळणार का नाही? या चिंतेत सध्या आम्ही आहोत.- धनाजी शिंदे, परखंदीबँका ‘उदार’ अन्अण्णासाहेब ‘ताठ’बँकांनी शेतकऱ्यांना कर्जे मंजूर केली आहेत. काहीच्या खात्यावरही पैसे टाकले गेले आहेत़; परंतु तलाठ्याच्या कर्जाचा बोजा न चढवून सातबारा उतारा न मिळाल्याने पैसे देत नाहीत. तर आम्हाला अधिकार नाही यामुळे ‘अण्णासाहेब’ ताठ आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचे, त्यांना वाली कोण?तलाठीच मिळेनात..तालुक्यात एका तलाठ्याकडे पाच ते सहा गावे आहेत. त्यामुळे अनेक गावात तलाठीच पोहोचत नाहीत. अनेक गावे असल्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना दाखले उतारे वेळेवर मिळत नाहीत व अडचणी निर्माण होतात.