शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

हातात सातबारा.. तरीही कर्जाचा फॉर्म कोरा!

By admin | Updated: December 10, 2015 01:01 IST

शेतकऱ्यांना महसुली फटका : संगणकीकरणाच्या नावाखाली बोजा चढविण्यास प्रशासनाचा नकार; वाई तालुक्यातील शेतकरी त्रस्त

संजीव वरे -- वाई या वर्षी वाई तालुक्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. येत्या काळात पाणीटंचाई व दुष्काळाचे सावट उभे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले असताना अनेक शेतकऱ्यांची गोची झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकेतून पीक व शेतीपूरक कर्जे गेली दोन महिने मंजूर झालेली आहेत; मात्र शेतीच्या सातबाऱ्यावर त्याची नोंद व बोजा न चढवून मिळाल्यामुळे बँका पैसे देईना तर तलाठी, सर्कल व तहसील विभाग शासनाचे संगणीकृत उतारे देण्याचे आदेश असल्याने पूर्वीसारखे हस्तलिखित उतारे व दाखले देता येत नाहीत, हे कारण सांगून अडवणूक केली जातेय.गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी बँका व तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत; परंतु याची दखल कोणीच न घेत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. या विभागाबाबत शेतकऱ्यांच्यात असंतोष निर्माण झाला असून, संतापाची लाट उसळली आहे.दरवर्षी तालुक्यातील शेतकरी हे सोसायट्या, जिल्हा सहकारी बँक व राष्ट्रीयकृत अनेक बँकातून शेतीसाठी पीक कर्जे व पुरक व्यवसायासाठी कर्जे घेत असतात. या वर्षीही अनेक शेतकऱ्यांची बँकांनी कर्जे मंजूर केली आहेत.त्यांच्या खात्यावर रक्कम टाकण्यापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या कर्जाचा बोजा चढवून त्याचा फेरफार व सातबारा बँकांना द्यावा लागतो. दि. २३ आॅक्टोबर २०१५ च्या शासन संगणकाद्वारे सर्व सातबारे व दाखले देणार या आदेशाचे कारण पुढे देत तलाठी सर्कल व तहसील विभाग गेली दोन महिने सातबारे व दाखले देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मंजूर असलेले कर्जाऊ पैसे बँका देत नाहीत. उताऱ्यासाठी शेतकरी बँका व तलाठी कार्यालयामध्ये हेलपाटे मारत आहेत. व आर्थिक अडचणीत आले आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनस्तरावर लवकर निर्णय घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत.हेलपाट्यावर हेलपाटे..!संगणकीकरण उतारे व दाखले यांच्या नोंदी राहतात. परंतु हस्तलिखित उतारे व दाखले यांच्या नोंदी नसतात. याचे पैसे संबंधितांना मिळतात. त्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे त्यामुळेही अनेकवेळा टाळाटाळ व दिरंगाई लावली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारून त्याचा वेळ व प्रवासखर्च जातो.गेली दोन महिने झाले. बँकेतून कर्ज मंजूर झाले आहे. परंतु तलाठ्याकडून त्याचा बोजा चढवून फेरफार व सातबारा न मिळाल्यामुळे मला बँक पैसे देत नाही. याबाबत संबंधित विभागाकडे सारखे हेलपाटे मारत आहेत.- देविदास जगताप, शेतकरी, शेंदुरजणे,ता. वाई.मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र पाठवले आहे. परंतु आमची दखल घेतली जात नाही. संगणकीकरणाला अजून किती कालावधी लागणार व आम्हाला पैसे मिळणार का नाही? या चिंतेत सध्या आम्ही आहोत.- धनाजी शिंदे, परखंदीबँका ‘उदार’ अन्अण्णासाहेब ‘ताठ’बँकांनी शेतकऱ्यांना कर्जे मंजूर केली आहेत. काहीच्या खात्यावरही पैसे टाकले गेले आहेत़; परंतु तलाठ्याच्या कर्जाचा बोजा न चढवून सातबारा उतारा न मिळाल्याने पैसे देत नाहीत. तर आम्हाला अधिकार नाही यामुळे ‘अण्णासाहेब’ ताठ आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचे, त्यांना वाली कोण?तलाठीच मिळेनात..तालुक्यात एका तलाठ्याकडे पाच ते सहा गावे आहेत. त्यामुळे अनेक गावात तलाठीच पोहोचत नाहीत. अनेक गावे असल्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना दाखले उतारे वेळेवर मिळत नाहीत व अडचणी निर्माण होतात.