शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निवड चाळीसची प्रत्यक्ष मात्र बाराच हजर !

By admin | Updated: May 1, 2015 00:17 IST

बारा सरपंचांच्या उपस्थितीत सरपंच समितीची बैठक : समितीच्या अध्यक्षांनी व्यक्त केले अनुपस्थितीबाबत आश्चर्य

कऱ्हाड : गावातील अपूर्ण कामांबाबत, पिण्याच्या पाण्याच्या उद्भवणाऱ्या समस्यांबाबत विकास करता यावा म्हणून कऱ्हाड विकास गटांतर्गत २०१५-१६ च्या सरपंच समितीसाठी चाळीस गावांची निवड एक वर्षासाठी करण्यात आली. या सरपंच समितीच्या बोलावण्यात आलेल्या बैठकीस केवळ बाराच सरपंचांनी उपस्थिती लावल्यामुळे समितीच्या अध्यक्षांनीही सरपंचांच्या अनुपस्थितीबाबत आश्चर्य व्यक्त केले. या समितीचे महत्त्व तसेच गावातील अडचणी व समस्यांबाबत गांभीर्य नसलेल्या सरपंचाकडून उपस्थिती लावली न गेल्याने ही समिती कशासाठी स्थापन करण्यात आली आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१५ - १६ या वर्षासाठी पंचायत समिती स्थरावर सरपंच समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीसाठी लोकसंख्येच्या निकषानुसार चाळीस गावांची निवड करण्यात आली आहे. त्या गावातील सरपंचांनी आपल्या गावातील प्रश्न, अडचणी तसेच शासकीय कामाविषयी समस्या याविषयी महिन्यातून एकदा घेण्यात येणाऱ्या सरपंच समितीच्या बैठकीत मांडणे गरजेचे असणार आहे.समितीची बैठक गुरुवारी कऱ्हाड येथे पंचायत समितीमध्ये पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कऱ्हाड पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव होते. तसेच सचिव जयवंत दळवी यांची उपस्थिती होती. लोकसंख्येच्या निकषानुसार निवडण्यात गावांमध्ये शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच कामांबाबत उदासीनतेमुळे की काय या बैठकीस बाराच गावांतील सरपंचांनी उपस्थिती लावली.सरपंच समितीच्या बैठकीवेळी उपस्थिती लावलेल्या बारा गावांच्या सरपंचांना शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांबाबत माहिती दिली. तसेच बैठकीस उपस्थिती लावलेल्या सरपंचांनी आपल्या गावातील पाण्यांच्या, अतिक्रमाणाच्या तसेच ग्रामपंचायतींच्या करवसुलीविषयी उद्भवणाऱ्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. गावच्या सुधारणा, पाणीटंचाई आदी गोष्टींविषयी गावचा कारभार चालवणाऱ्या सरपंचांना गावाविषयी किती काळजी आहे हे यावरून दिसून आले. (प्रतिनिधी) चाळीस गावांची निवड २०१५- १६ या वर्षासाठी लोकसंख्येच्या निक षानुसार चाळीस गावांची निवड करण्यात आली आहे, त्यातून सरपंच समिती तयार करण्यात आली आहे. या सरपंच समितीचे तिसरे वर्ष असून, यंदाच्या वर्षी राजमाची, नारायणवाडी, बाबरमाची, खुबी, कापिल, गोंदी, किरपे, आणे, घारेवाडी, अबईचीवाडी, वस्ती साकुर्डी, पोतले, कुसूर, वसंतगड, येणके, म्होप्रे, केसे, साजूर, गोटेवाडी, मालखेड, शेवाळेवाडी, जिंती, येणपे, टाळगाव, नांदगाव, म्हासोली, संजयनगर, कालेटेक, जुने कवठे, हणबरवाडी, खराडे, रिसवड, पाडळी, शहापूर, वराडे, हिंगनोळे, तासवडे, अंधारवाडी, शिरगाव, शिवडे या गावांचा समावेश सरपंच समितीमध्ये करण्यात आला आहे.कसे चालते सरपंच समितीचे कामकाज महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या तरतुदीनुसार सरपंच समितीचे कार्य पाहिले जाते. त्यातून पंचायत समितीने पार पाडावयाच्या ग्रामपंचायतींच्या नियंत्रणविषयक व पर्यावरणविषयक कामांच्या संबंधित सर्व बाबींवर पंचायत समिती सल्ला देते. पंचायत समिती सरपंच समितीकडून देण्यात आलेल्या सल्ल्यावर विचार करून अंमलबजावणी करते.