शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कऱ्हाड-चिपळूण मार्गावर अपघातांची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:38 IST

रामापूर : कऱ्हाड-चिपळूण या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून लहान-मोठे शेकडो अपघात झाले आहेत. चौपदरीकरण रस्त्यांचे काम पूर्ण होण्यापूर्वीच ...

रामापूर : कऱ्हाड-चिपळूण या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून लहान-मोठे शेकडो अपघात झाले आहेत. चौपदरीकरण रस्त्यांचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अपघातांची मालिका सुरू आहे. आता तर रस्त्याचे काम पूूर्णतः थांबले आहे. या अपूर्ण कामामुुळे जर मोठा अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न रस्त्यालगत असणारे ग्रामस्थ आणि या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी विचारू लागले आहेत.

कऱ्हाड-चिपळूण हा मार्ग एकूण ९० किलोमीटर लांबीचा आहे. कोयना प्रकल्पाच्या निर्मितीवेळी हा रस्ता तयार करण्यात आला होता. या मार्गाला कोयना धरण प्रकल्पाच्या निर्मितीमुळे अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे . या मार्गावरची वाढती वाहने आणि विकासाकरिता या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर होऊन याचे रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले; पण काही दिवसांमध्येच या मार्गाचे काम पूर्णतः बंद आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या चारचाकी आणि दुचाकीस्वारांन खूपच त्रास सहन करावा लागतो आहे.

या रस्त्याच्या रूंदीकरणामध्ये भर घालण्यासाठी मातीचा मोठ्याप्रमाणात वापर केला गेला आहे. यामुळे यावरून मोठे वाहन गेल्यानंतर मोठया प्रमाणात धुरळा उडतो. त्यामुळे मागील वाहनचालकाला पुढचे काहीच दिसत नाही. परिणामी लहान-मोठे अपघात होऊन अपघातांची मालिकाच सुरू आहे. कऱ्हाड-चिपळूण या मार्गावर प्रवास करणारे नागरिक, प्रवासी हा महामार्ग पूर्ण कधी होणार? असा प्रश्न विचारत आहेत.