शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

ग्रामपंचायत क्षेत्रातील विलगीकरण कक्षास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:39 IST

गावपातळीवर चांगले उपचार : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत क्षेत्रात ३० ...

गावपातळीवर चांगले उपचार : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत क्षेत्रात ३० किंवा त्यापेक्षा अधिक खाटांचा विलगीकरण कक्ष उभारल्यास त्याला १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधित प्राप्त निधीतून २५ टक्क्यांंच्या मर्यादेत खर्च करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे गावपातळीवरही कोरोना रुग्णांवर चांगले उपचार होणार आहेत.

कोरोना विषाणूच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सुरक्षितेसाठी ग्रामविकास विभागामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये अर्सेनिक अल्बम ३० हे औषध ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देणे, जिल्हा परिषदांना रुग्णवाहिका पुरवणे, तसेच जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास ५० लाखांचा विमा कवच असे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर एखाद्या ग्रामपंचायतीने कोरोना रुग्णांसाठी ग्रामपंचायत क्षेत्रात ३० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे विलगीकरण कक्षाची मागणी केल्यास तेथे ते उभारण्यात येणार आहे तसेच विलगीकरण कक्षास १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधित प्राप्त निधीतून खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार निधीच्या २५ टक्के मर्यादित खर्च करता येणार आहे.

यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत क्षेत्रात विलगीकरण कक्ष उभारणीबाबत योग्य नियोजन करावे, असे सुचविण्यात आले आहे तसेच त्याबाबत आढावा घेऊन संबंधित ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाच्या आबंधित निधी खर्च करण्यास परवानगी द्यावी, असेही ग्रामविकास विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरही रुग्णांना चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

.........................................................................