शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ले घातक : सुनीती

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

‘संत तुकाराम, सॉक्रेटीस गॅलिलिओ यांना सत्याच्या, ज्ञानाच्या कारणासाठी प्राण गमवावे लागले. आज जगात सगळीकडे भूलभुलैय्या आहे.

कऱ्हाड : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले समाजासाठी घातक आहेत. मानवतेकडे जाणे हीच खरी माणुसकी आहे. मानवाधिकार आहे,’ असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र. यांनी केले. येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने आयोजित केलेल्या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, प्रा. डॉ. अमृता देशमुख, उपप्राचार्य डॉ. आत्माराम जगदाळे, प्रा. अजित गाढवे आदी उपस्थित होते. सुनीती सु. र. म्हणाल्या, ‘वंचित लोक, स्त्री, दलित, श्रमिक, आदिवासी, अल्पसंख्यांक आपल्या जगण्याच्या हक्कांसाठी लढत आहेत. पण, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावर अशा राष्ट्रीय चर्चासत्रातून चर्चा व्हायला पाहिजे. दुसऱ्याच्या हक्कावर आक्रमण करून त्याचे माणुसपण हिरावून घेण्याची प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ‘संत तुकाराम, सॉक्रेटीस गॅलिलिओ यांना सत्याच्या, ज्ञानाच्या कारणासाठी प्राण गमवावे लागले. आज जगात सगळीकडे भूलभुलैय्या आहे. निसर्गाने स्वत:ला विकसित केले; पण आपण अजूनही स्वत:ला विकसित करू शकलो नाही. त्यामुळे मानवाधिकार हिरावून घेतले जातात,’ अशी खंत यावेळी प्राचार्य पाटील यांनी बोलताना व्यक्त केली. प्रा. अजित गाढवे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनील जाधव यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. आत्माराम जगदाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)