शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जिल्हा प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिक वेठीस : माळवदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:24 IST

सातारा : जिल्हा प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे वर्ग-२च्या जमिनी वर्ग-१ करण्यामध्ये विलंब होत आहे. यामधील बहुतांश मिळकतधारक हे ज्येष्ठ नागरिक ...

सातारा : जिल्हा प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे वर्ग-२च्या जमिनी वर्ग-१ करण्यामध्ये विलंब होत आहे. यामधील बहुतांश मिळकतधारक हे ज्येष्ठ नागरिक असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांना वेठीस धरले जात आहे, असा आरोप माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी केला आहे.

माळवदे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने २०१९ मध्ये दिलेल्या आदेशानुसार वर्ग-२ (सत्ता प्रकार ब या जमिनी) वर्ग-१ करण्यासाठी संबंधित मिळकत धारण करून कागदपत्रांसह इतर अर्ज मागवले होते. शासनाने दिलेल्या आदेशाचा कालावधी फक्त तीन वर्षे मुदतीचा होता. याची मुदत मार्च २०२२ पर्यंत संपत आहे.

सातारा जिल्ह्यातील संबंधित मिळकतधारकांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत अर्ज करूनदेखील चरण भरण्याचा आदेश प्राप्त होत नाही तसेच ज्यांनी त्याला प्रमाणे रक्कम भरूनदेखील वर्ग-१ मध्ये रूपांतरित झालेला आदेश प्राप्त होत नाही अशा तक्रारी आहेत. प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे मिळकतधारकांना मानसिक व आर्थिक ताण येतो आहे. यापैकी बहुतांशी मिळकतधारक हे वृद्ध आहेत. त्यामुळे वेगळी सामाजिक समस्या निर्माण होऊ शकते. शासनाने जमिनीची किंमत वार्षिक बाजारमूल्य दर तक्त्यात अचानक वाढ केली तर संबंधित मिळकतधारकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाकाळात ज्येष्ठ नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.