शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

हजार लाेकांच्या सुरक्षिततेची मदार केवळ एका पोलिसावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहरासह जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असला तरीही जिल्हा पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढताना दिसत नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शहरासह जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असला तरीही जिल्हा पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढताना दिसत नाही. लोकसंख्येच्या तुलनेचा विचार केला तर एक हजार लोकांमागे केवळ एक पोलीस अशी स्थिती आहे. त्यामुळे पोलिसांवर सध्या प्रचंड ताण आहे.

राज्य शासनाने दोन टप्प्यांत पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली आहे. मात्र, यातून सातारा जिल्ह्याला किती मनुष्यबळ मिळणार आहे, हे अद्याप समोर आले नाही. जिल्हा पोलीस दलामध्ये पूर्वी अडीच हजार मनुष्यबळ होते. हळूहळू ही संख्या तीन हजारांहून पुढे गेली. सध्या तीन हजार ९०० मनुष्यबळ आहे. तर जिल्ह्याची लोकसंख्या ३५ लाख आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकांची सुरक्षा या पोलिसांवर अवलंबून आहे. एकापाठोपाठ एक गुन्हे घडत असल्यामुळे पोलिसांना तपासासाठी वेळच मिळत नाही. फारशा सुट्याही मिळत नसल्यामुळे पोलिसांवरील ताण अधिकच जाणवत आहे. जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे चाेरी, मारामारी, दरोडा असे प्रकार घडत असतात. पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. त्याच तुलनेत दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

गुन्हेगारीचा आलेच चढताच...

जिल्ह्यातील जबरी चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, खून, लूटमार अशा घटना अद्यापही कमी झालेल्या नाहीत. दिवसेंदिवस या गुन्ह्यांमध्ये अधिकच वाढ होत चालली आहे. लाॅकडाऊनमध्ये पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच गुन्ह्याचे प्रमाण कमी होते. केवळ आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल होत होते. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा गुन्हेगारी पूर्वीपेक्षा जास्त बोकाळली. घरात बसून लोकांची मानसिक स्थिती बिघडली आणि बेकारी वाढली. त्यामुळे लोकांचा संयम सुटत चालला. छोट्या छोट्या गोष्टींतूनही एकमेकांचे मुडदे पाडले. लाॅकडाऊननंतर जिल्ह्यात एकूण १४ खून झाले. तर अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. अशा प्रकारची गुन्हेगारी रोखण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची गरज आहे. त्याचबरोबर गाव पातळीवरील पोलीस ठाणे, पोलीस चाैकी सक्षम करणे, यासह कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवणे गरजेचे आहे. तरच जिल्हा गुन्हेगारीमुक्त होण्यास मदत होणार आहे.

शहर असो की ग्रामीण दोन्ही पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण आहे. शहरातील पोलिसांना रात्रंदिवस गस्त घालावी लागते. तर ग्रामीण भागातील पोलिसांना वाड्यावस्त्यांवर गस्त नसली तरी जागृत राहावे लागते. ग्रामीण भागामध्ये एका पोलीस चाैकीअंतर्गत दोनशे ते तीनशे गावे असतात. या चाैकीमध्ये सहा ते सात कर्मचारी असतात. याच कर्मचाऱ्यांवर एवढ्या मोठ्या गावांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरही ताण आहेच. ग्रामपंचात, सोसायटी निवडणुकीचा बंदोबस्त या केवळ चार पोलिसांवरच होत असतो. ग्रामीण भागामध्ये चोऱ्या, घरफोडीचे प्रमाण कमी असते. याउलट शहरात चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शहरातील पोलिसांना नेहमी सतर्क राहावे लागते. शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या मदतीला आणखी हजार, दोन हजार पोलिसांची आवश्यकता आहे.

लाेकसंख्या वाढतेय, पोलिसांची संख्या वाढेना

जिल्ह्याची २०११ च्या जनगणनेनुसार ३० लाख लोकसंख्या होती. त्यानंतर मात्र जनगणना झाली नाही. ही संख्या पाच ते दहा लाखांनी वाढली. मात्र, त्या तुलनेत पोलिसांची संख्या केवळ चारशे आणि पाचशेच्या पटीत वाढत आहे. त्यामुळे पोलिसांवर साहजिकच ताण आहे.