शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

हजार लाेकांच्या सुरक्षिततेची मदार केवळ एका पोलिसावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहरासह जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असला तरीही जिल्हा पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढताना दिसत नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शहरासह जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असला तरीही जिल्हा पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढताना दिसत नाही. लोकसंख्येच्या तुलनेचा विचार केला तर एक हजार लोकांमागे केवळ एक पोलीस अशी स्थिती आहे. त्यामुळे पोलिसांवर सध्या प्रचंड ताण आहे.

राज्य शासनाने दोन टप्प्यांत पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली आहे. मात्र, यातून सातारा जिल्ह्याला किती मनुष्यबळ मिळणार आहे, हे अद्याप समोर आले नाही. जिल्हा पोलीस दलामध्ये पूर्वी अडीच हजार मनुष्यबळ होते. हळूहळू ही संख्या तीन हजारांहून पुढे गेली. सध्या तीन हजार ९०० मनुष्यबळ आहे. तर जिल्ह्याची लोकसंख्या ३५ लाख आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकांची सुरक्षा या पोलिसांवर अवलंबून आहे. एकापाठोपाठ एक गुन्हे घडत असल्यामुळे पोलिसांना तपासासाठी वेळच मिळत नाही. फारशा सुट्याही मिळत नसल्यामुळे पोलिसांवरील ताण अधिकच जाणवत आहे. जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे चाेरी, मारामारी, दरोडा असे प्रकार घडत असतात. पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. त्याच तुलनेत दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

गुन्हेगारीचा आलेच चढताच...

जिल्ह्यातील जबरी चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, खून, लूटमार अशा घटना अद्यापही कमी झालेल्या नाहीत. दिवसेंदिवस या गुन्ह्यांमध्ये अधिकच वाढ होत चालली आहे. लाॅकडाऊनमध्ये पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच गुन्ह्याचे प्रमाण कमी होते. केवळ आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल होत होते. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा गुन्हेगारी पूर्वीपेक्षा जास्त बोकाळली. घरात बसून लोकांची मानसिक स्थिती बिघडली आणि बेकारी वाढली. त्यामुळे लोकांचा संयम सुटत चालला. छोट्या छोट्या गोष्टींतूनही एकमेकांचे मुडदे पाडले. लाॅकडाऊननंतर जिल्ह्यात एकूण १४ खून झाले. तर अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. अशा प्रकारची गुन्हेगारी रोखण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची गरज आहे. त्याचबरोबर गाव पातळीवरील पोलीस ठाणे, पोलीस चाैकी सक्षम करणे, यासह कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवणे गरजेचे आहे. तरच जिल्हा गुन्हेगारीमुक्त होण्यास मदत होणार आहे.

शहर असो की ग्रामीण दोन्ही पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण आहे. शहरातील पोलिसांना रात्रंदिवस गस्त घालावी लागते. तर ग्रामीण भागातील पोलिसांना वाड्यावस्त्यांवर गस्त नसली तरी जागृत राहावे लागते. ग्रामीण भागामध्ये एका पोलीस चाैकीअंतर्गत दोनशे ते तीनशे गावे असतात. या चाैकीमध्ये सहा ते सात कर्मचारी असतात. याच कर्मचाऱ्यांवर एवढ्या मोठ्या गावांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरही ताण आहेच. ग्रामपंचात, सोसायटी निवडणुकीचा बंदोबस्त या केवळ चार पोलिसांवरच होत असतो. ग्रामीण भागामध्ये चोऱ्या, घरफोडीचे प्रमाण कमी असते. याउलट शहरात चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शहरातील पोलिसांना नेहमी सतर्क राहावे लागते. शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या मदतीला आणखी हजार, दोन हजार पोलिसांची आवश्यकता आहे.

लाेकसंख्या वाढतेय, पोलिसांची संख्या वाढेना

जिल्ह्याची २०११ च्या जनगणनेनुसार ३० लाख लोकसंख्या होती. त्यानंतर मात्र जनगणना झाली नाही. ही संख्या पाच ते दहा लाखांनी वाढली. मात्र, त्या तुलनेत पोलिसांची संख्या केवळ चारशे आणि पाचशेच्या पटीत वाढत आहे. त्यामुळे पोलिसांवर साहजिकच ताण आहे.