शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

हजार लाेकांच्या सुरक्षिततेची मदार केवळ एका पोलिसावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहरासह जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असला तरीही जिल्हा पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढताना दिसत नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शहरासह जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असला तरीही जिल्हा पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढताना दिसत नाही. लोकसंख्येच्या तुलनेचा विचार केला तर एक हजार लोकांमागे केवळ एक पोलीस अशी स्थिती आहे. त्यामुळे पोलिसांवर सध्या प्रचंड ताण आहे.

राज्य शासनाने दोन टप्प्यांत पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली आहे. मात्र, यातून सातारा जिल्ह्याला किती मनुष्यबळ मिळणार आहे, हे अद्याप समोर आले नाही. जिल्हा पोलीस दलामध्ये पूर्वी अडीच हजार मनुष्यबळ होते. हळूहळू ही संख्या तीन हजारांहून पुढे गेली. सध्या तीन हजार ९०० मनुष्यबळ आहे. तर जिल्ह्याची लोकसंख्या ३५ लाख आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकांची सुरक्षा या पोलिसांवर अवलंबून आहे. एकापाठोपाठ एक गुन्हे घडत असल्यामुळे पोलिसांना तपासासाठी वेळच मिळत नाही. फारशा सुट्याही मिळत नसल्यामुळे पोलिसांवरील ताण अधिकच जाणवत आहे. जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे चाेरी, मारामारी, दरोडा असे प्रकार घडत असतात. पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. त्याच तुलनेत दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

गुन्हेगारीचा आलेच चढताच...

जिल्ह्यातील जबरी चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, खून, लूटमार अशा घटना अद्यापही कमी झालेल्या नाहीत. दिवसेंदिवस या गुन्ह्यांमध्ये अधिकच वाढ होत चालली आहे. लाॅकडाऊनमध्ये पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच गुन्ह्याचे प्रमाण कमी होते. केवळ आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल होत होते. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा गुन्हेगारी पूर्वीपेक्षा जास्त बोकाळली. घरात बसून लोकांची मानसिक स्थिती बिघडली आणि बेकारी वाढली. त्यामुळे लोकांचा संयम सुटत चालला. छोट्या छोट्या गोष्टींतूनही एकमेकांचे मुडदे पाडले. लाॅकडाऊननंतर जिल्ह्यात एकूण १४ खून झाले. तर अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. अशा प्रकारची गुन्हेगारी रोखण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची गरज आहे. त्याचबरोबर गाव पातळीवरील पोलीस ठाणे, पोलीस चाैकी सक्षम करणे, यासह कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवणे गरजेचे आहे. तरच जिल्हा गुन्हेगारीमुक्त होण्यास मदत होणार आहे.

शहर असो की ग्रामीण दोन्ही पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण आहे. शहरातील पोलिसांना रात्रंदिवस गस्त घालावी लागते. तर ग्रामीण भागातील पोलिसांना वाड्यावस्त्यांवर गस्त नसली तरी जागृत राहावे लागते. ग्रामीण भागामध्ये एका पोलीस चाैकीअंतर्गत दोनशे ते तीनशे गावे असतात. या चाैकीमध्ये सहा ते सात कर्मचारी असतात. याच कर्मचाऱ्यांवर एवढ्या मोठ्या गावांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरही ताण आहेच. ग्रामपंचात, सोसायटी निवडणुकीचा बंदोबस्त या केवळ चार पोलिसांवरच होत असतो. ग्रामीण भागामध्ये चोऱ्या, घरफोडीचे प्रमाण कमी असते. याउलट शहरात चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शहरातील पोलिसांना नेहमी सतर्क राहावे लागते. शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या मदतीला आणखी हजार, दोन हजार पोलिसांची आवश्यकता आहे.

लाेकसंख्या वाढतेय, पोलिसांची संख्या वाढेना

जिल्ह्याची २०११ च्या जनगणनेनुसार ३० लाख लोकसंख्या होती. त्यानंतर मात्र जनगणना झाली नाही. ही संख्या पाच ते दहा लाखांनी वाढली. मात्र, त्या तुलनेत पोलिसांची संख्या केवळ चारशे आणि पाचशेच्या पटीत वाढत आहे. त्यामुळे पोलिसांवर साहजिकच ताण आहे.