शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या वर्षीही शंभर लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:58 IST

वाठार स्टेशन : मुबलक उसामुळे गतवर्षी पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शंभर लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादनाचा विक्रम केला ...

वाठार स्टेशन : मुबलक उसामुळे गतवर्षी पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शंभर लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादनाचा विक्रम केला होता. हा विक्रम सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी करून गाळप हंगामाचा उच्चांक निर्माण केला.चालू हंगामात उसाची उपलब्धता होती. मात्र, साखर उत्पादनात दुष्काळी परिस्थितीमुळे कमालीची घट झाली. यातच एफआरपी देण्याबाबत द्विधा मनस्थिती राहिल्याने हंगामाचा प्रारंभ उशिरा झाला. मात्र, दैनिक क्षमतेत वाढ झाल्यामुळे गतवर्षीच्या शंभर लाख क्विंटल साखर निर्मितीचा उच्चांक जिल्ह्यातील १५ कारखान्यांनी मोडत ५ एप्रिलअखेर शंभर लाख क्विंटल साखर उत्पादनात मजल मारली आहे.गतवर्षी एफआरपी एकदम न दिल्यामुळे अडचणीत सापडलेला न्यू फलटण शुगर्स वर्कस साखरवाडी हा कारखाना चालू हंगामात बंद राहिला तर याच हंगामात माण-खटाव हा नवीन साखर कारखाना चाचणी गाळप हंगामात कार्यरत झाला. या कारखान्यासह १४ कारखान्यांनी उच्चांकी गाळप करीत शंभर लाख क्विंटल साखर निर्मितीचा टप्पा पार केला.यामध्ये आजअखेर श्रीराम फलटणने ४ लाख ३९ हजार ६८ मेट्रिक टन गाळप करत ५ लाख ५ हजार २६० क्ंिवटल साखर उत्पादन केले. २६ मार्चअखेर गाळप बंद झाले. किसनवीर भुर्इंज कारखान्याने ५ लाख ७७ हजार ९५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करीत ६ लाख २ हजार ३७० क्विंटल साखर उत्पादन घेतले. १६ मार्च रोजी हंगाचा शेवट केला. लो. बा. देसाई पाटण या कारखान्याने १ लाख ९६ हजार ३१५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करीत २ लाख ३० हजार ५७५लाख क्विंटल साखर निर्मिती केली. हा कारखाना १९ मार्चपासून बंद झाला. रयत अथणी कारखान्याने २ लाख ९४ हजार १४० ला मेट्रिक टन गाळप करीत ३ लाख ७५ हजार ४८० क्विंटल साखर उत्पादन पूर्ण करीत १९ मार्च रोजी गाळप हंगामाचा समारोप केला. प्रतापगड कारखान्याने १ लाख ७५ हजार८१२ मेट्रिक टन ऊस गाळप करीत १ लाख ९१ हजार ८६० क्विंटल साखर उत्पादन करीत १५ मार्च रोजी गाळप हंगामाचा समारोप केला. जरंडेश्वर शुगरने १० लाख ०२ हजार ६९३ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करीत १२ लाख ६४ हजार ५८० क्विंटल साखर उत्पादन घेतले.हा कारखाना १९ मार्च रोजी बंद झाला. ग्रीन पॉवर शुगर गोपूज कारखान्याने ४ लाख ४४ हजार ५६६ मेट्रिक टन उसाचे गाळप क रीत ५ लाख १८ हजार ५०० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले. हा कारखाना ७ मार्चपासून बंद झाला. स्वराज फलटणने ६ लाख ३८ हजार २१३ मेट्रिक टन उसाचे गाळपत पूर्ण करीत ६ लाख १९ हजार ३६० मेट्रिक टन क्विंटल साखर उत्पादन घेतले. १४ मार्च रोजी शेवट झाला. शरयू अ‍ॅग्रोने ७ लाख ८५ हजार ४२४ मेट्रिक टन उसाचे गाळप करीत ९ लाख ३५ हजार ४५० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले. हा कारखान्याने १६ मार्च रोजी गाळप हंगामाचा समोराप केला.जिल्ह्यातील चार कारखाने अद्याप सुरूचजिल्ह्यातील एकूण नऊ सहकारी व सहा खासगी अशा पंधरा कारखान्यांपैकी दहा कारखाने उसाअभावी बंद झाले आहेत. कृष्णा, सह्याद्री अजिंक्यतारा, जयवंत शुगर्स व खटाव-माण या कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप सुरू आहे. एप्रिलअखेर कारखाने बंद होतील, अशी महिती कारखानदारांनी दिली आहे.