शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

वॉटर कपसाठी बिचुकले दुसऱ्यांदा मैदानात..

By admin | Updated: April 17, 2017 23:21 IST

दररोज चारशे जणांचे श्रमदान : पाण्यासाठी राजकारण बाजूला सारून गाव एकजुटीने कामाला; पाणीदार गावासाठी प्रयत्न

संजय कदम ल्ल वाठार स्टेशन गावाअंतर्गत राजकारण बाजूला ठेवून कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथील ग्रामस्थ जलयुक्त चळवळीतून गाव पाणीदार करण्यासाठी पुन्हा एकदा एकवटले आहेत. गतवर्षी केलेल्या कामामुळे गावच्या पाणीसाठ्यात झालेली वाढ कायम ठेवण्यासाठी या गावाने दुसऱ्यांदा वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. याची सुरुवातच गावच्या यात्रेचा निधी जलयुक्तच्या कामासाठी वळवून केली आहे. आज पुन्हा नव्या जोमाने जलयुक्त कामाचा संकल्प आराखडा बनवत या गावातील चिमुकल्यांपासून ते आबालवृद्धापर्यंत दररोज किमान चारशे लोक श्रमदान करत आहेत.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील साधारण १,५३५ लोकसंख्येचे बिचुकले हे एक छोटंस गाव. मागील तीन ते चार वर्षांपर्यंत दुष्काळाशी लढा देत होते. गावच्या तिन्ही बाजूस डोंगररांगा असल्याने या गावाचा पाणीप्रश्न कायमच बिकट होता. उन्हाळ्यात कायम टँकरद्वारे गावास पाणी प्यावे लागत होते. हा एकच प्रश्न या गावकऱ्यांना सतावत होता. तर गावच्या शिवेवर आपल्यापेक्षाही बिकट असलेली नलवडेवाडी पाण्याबाबत मात्र सबल होती. या गावाने केलेले पाणीदार काम आपण का करू नये, असा प्रश्न बिचुकले ग्रामस्थांना सतावत होता. शेवटी गावच्या काही युवक नेत्यांनी गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी एक बैठक घेतली. त्यासाठी डॉ. अविनाश पोळ यांच्यासारख्या लोकांचे मार्गदर्शन मिळाले आणि यातून गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ‘श्रमदान ग्रुप’ नावाची एक संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून मागील दोन वर्षांत शेजारील डोंगरातील पाणी अडवण्यासाठी छोटे बंधारे बांधण्यात आले आहेत.गतवर्षी आमिर खान, अंबानी यांच्या ‘पाणी’ फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा जाहीर झाली. या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्धार बिचुकले गावाने केला आणि स्पर्धेच्या कालावधीत संपूर्ण गाव, विविध संस्था, शासकीय अधिकारी, कलाकारांनी या गावात येऊन श्रमदानातून गावचा उत्साह वाढवला. यातून अनेक ठिकाणी पाणी अडवण्याचे काम झाले. गाव परिसरातील जुने पाझर तलावांचे खोलीकरण रुंदीकरण झाले. याचा परिणाम म्हणून आज या गावाला दररोज गरजेइतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. चालूवर्षी पुन्हा एकदा नव्या जोमाने अधिक गतीने हे गावकरी वेगवान झाले आहेत. प्रत्येक घरातील एक माणूस आज श्रमदानासाठी बाहेर पडत आहे. चालूवर्षी तारमाळ ते गुजरवाडी या दोन तलावांतील साडेसहा किलोमीटरमधील संपूर्ण ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. या दरम्यान या ओढ्यात आतापर्यंत १२ कोल्हापूर पद्धतीचे सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. तर चालू वर्षात नवीन २ अशा १४ सिमेंट बंधाऱ्यांत पाणीसाठा होणार आहे. यामाध्यमातून जवळपास ९,२०० घनमीटर काम श्रमदानाच्या माध्यमातून तर १ लाख घनमीटर काम हे यांत्रिकी विभागाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा या ग्रामस्थांचा मनोदय आहे. लोकसंख्येएवढे खड्डे काढून वृक्षारोपण...याशिवाय संपूर्ण गावात शोषखड्डे व गावच्या सर्व शेतजमिनीचे माती परीक्षण, सेंद्रिय खताद्वारे शेती व्यवस्थापन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प साकारण्यात येणार आहे. गावच्या लोकसंख्येएवढे खड्डे काढून या खड्ड्यात प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे पालकत्व स्वीकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय शेतीच्या उतारावर बांध बंदिस्तीचे मोठे काम श्रमदानातून होणार आहे. यासाठी आता हे सारं गाव कामाला लागलं आहे. गावच्या या कार्यात शासनाच्या कृषी विभागाची मोठी मदत होणार आहे.