शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

आला हंगाम.. खतांच्या किंमतीनं फोडला घाम!

By admin | Updated: May 29, 2015 23:56 IST

कुणाचेच नाही नियंत्रण : खरीपाच्या तोंडावर भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी

परळी : यंदा सातारा तालुक्यासह परळी परिसरात ऊस उत्पादनात वाढ झाल्याने बळीराजा ऊसपीक भरणीच्या कामात गुंतला असून खतांची मागणी वाढली आहे. याचा फायदा घेऊन रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्या, दुकानदार यांनी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचे दर भरमसाठ वाढविल्याने शेतकऱ्यांच्यात नाराजी परसली आहे. वाढीव दरामध्ये शासनाचे नियंत्रण नसल्याने कंपन्यांचे फावत असल्याचा आरोप होत आहे.दरवर्षीच खरीप व रब्बी हंगामात हंगामानुसार लागणाऱ्या रासायनिक खतांच्या दरात वाढ होत असली तरी अलीकडे कंपन्यांचे धोरण बदलले आहे. पंधरा दिवसांच्या टप्प्यांनी दरवाढ सुरू ठेवली आहे. दरवाढीचे निकष काय, कोणत्या कारणांमुळे दरवाढ झाली. याचे उत्तर मात्र कंपन्या व शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना देण्यात येत नाही.खरीपात सोयाबीन, भुईमूग, ज्वारी तर रब्बीत गहू, हरभरा, कांदा यांसह भाजीपाला घेतला जातो. महत्त्वाचे म्हणजे खरीपापासूनच शेतीला खऱ्या अर्थाने सुरूवात होते. हाच हंगाम या व्यवसायात महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वी ऊसाला खतांचा डोस द्यावा लागतो. सध्या विक्रेत्यांकडे खतांची मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेऊन कंपन्यांनी किंमत वाढीचे धोरण स्वीकारले आहे. सध्या रासायनिक खताचे पन्नास किलोचे पोते खरेदी करावयाचे झाल्यास शेतकरीवर्गाला अर्ध्या टनाइतके पैसे मोजावे लागत आहेत. वारंवार होणाऱ्या खत दरवाढीवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जाब कोणाला विचारायचा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ऊस अथवा कोणत्याही पिकासाठी एकरी खताची मात्रा द्यायची झाल्यास किमान वेगवेगळ्या प्रकारच्या ८ ते १० रासायनिक खतांची आवश्यकता भासते. सध्याचे दर पाहता एकरी १० पोती लागणाऱ्या ठिकाणी केवळ चार ते पाच पोत्यांचीच मात्रा शेतकरीवर्गाकडून दिली जात आहे. सध्या बाजारपेठेत युरिया खताच्या ५० किलो पोत्याचा दर ३३० ते ३५०, सुफला ९०० रूपये, अमोनियम सल्फेट ६५०, पोटॅश ८६०, डीएपी १२९० रूपये दर आहे. महिन्यापूर्वी असलेल्या मूळ दरात वाढ झाली आहे. कंपन्यांनी दरवाढ केल्याने ज्या किरकोळ विक्रेत्यांकडे पूर्वीच्या कमी दराचा कोटा शिल्लक आहे त्याची नवीन आणि जास्त दराने विक्री केला जात आहे. याकडे कृषी खातेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते आहे. मात्र, शेतीची घात चुकवून चालत नाही. यासाठी मुकाट्याने आहे त्या दराने शेतकरी खताची खरेदी करत आहेत. (वार्ताहर)पंधरा दिवसांच्या टप्प्यांनी दरवाढ सुरू दरवाढीची कारणे गुलदस्त्यात शासकीय यंत्रणा चिडीचूप विक्रेत्यांकडे खतांची मागणी वाढलीजाब कोणाला विचारायचा? या चिंतेत शेतकरी कृषी खात्याचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष रासायनिक खत आवश्यकशेतकरीवर्गाकडून कुठल्याही पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर शेणखताची मात्रा हंगामानुसार दिली जाते. याशिवाय ऊसाला पाला-पाचोळा न पेटवता तो जमिनीत तसाच ठेवून सेंद्रिय खताची मात्रा दिली जाते. परंतु केवळ या खतामुळे जमिनीचा पोत सुधारावा यासाठी शेणखताबरोबरंच रासायनिक खतांचीही मात्रा दिली जाते.