शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

आला हंगाम.. खतांच्या किंमतीनं फोडला घाम!

By admin | Updated: May 29, 2015 23:56 IST

कुणाचेच नाही नियंत्रण : खरीपाच्या तोंडावर भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी

परळी : यंदा सातारा तालुक्यासह परळी परिसरात ऊस उत्पादनात वाढ झाल्याने बळीराजा ऊसपीक भरणीच्या कामात गुंतला असून खतांची मागणी वाढली आहे. याचा फायदा घेऊन रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्या, दुकानदार यांनी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचे दर भरमसाठ वाढविल्याने शेतकऱ्यांच्यात नाराजी परसली आहे. वाढीव दरामध्ये शासनाचे नियंत्रण नसल्याने कंपन्यांचे फावत असल्याचा आरोप होत आहे.दरवर्षीच खरीप व रब्बी हंगामात हंगामानुसार लागणाऱ्या रासायनिक खतांच्या दरात वाढ होत असली तरी अलीकडे कंपन्यांचे धोरण बदलले आहे. पंधरा दिवसांच्या टप्प्यांनी दरवाढ सुरू ठेवली आहे. दरवाढीचे निकष काय, कोणत्या कारणांमुळे दरवाढ झाली. याचे उत्तर मात्र कंपन्या व शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना देण्यात येत नाही.खरीपात सोयाबीन, भुईमूग, ज्वारी तर रब्बीत गहू, हरभरा, कांदा यांसह भाजीपाला घेतला जातो. महत्त्वाचे म्हणजे खरीपापासूनच शेतीला खऱ्या अर्थाने सुरूवात होते. हाच हंगाम या व्यवसायात महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वी ऊसाला खतांचा डोस द्यावा लागतो. सध्या विक्रेत्यांकडे खतांची मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेऊन कंपन्यांनी किंमत वाढीचे धोरण स्वीकारले आहे. सध्या रासायनिक खताचे पन्नास किलोचे पोते खरेदी करावयाचे झाल्यास शेतकरीवर्गाला अर्ध्या टनाइतके पैसे मोजावे लागत आहेत. वारंवार होणाऱ्या खत दरवाढीवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जाब कोणाला विचारायचा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ऊस अथवा कोणत्याही पिकासाठी एकरी खताची मात्रा द्यायची झाल्यास किमान वेगवेगळ्या प्रकारच्या ८ ते १० रासायनिक खतांची आवश्यकता भासते. सध्याचे दर पाहता एकरी १० पोती लागणाऱ्या ठिकाणी केवळ चार ते पाच पोत्यांचीच मात्रा शेतकरीवर्गाकडून दिली जात आहे. सध्या बाजारपेठेत युरिया खताच्या ५० किलो पोत्याचा दर ३३० ते ३५०, सुफला ९०० रूपये, अमोनियम सल्फेट ६५०, पोटॅश ८६०, डीएपी १२९० रूपये दर आहे. महिन्यापूर्वी असलेल्या मूळ दरात वाढ झाली आहे. कंपन्यांनी दरवाढ केल्याने ज्या किरकोळ विक्रेत्यांकडे पूर्वीच्या कमी दराचा कोटा शिल्लक आहे त्याची नवीन आणि जास्त दराने विक्री केला जात आहे. याकडे कृषी खातेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते आहे. मात्र, शेतीची घात चुकवून चालत नाही. यासाठी मुकाट्याने आहे त्या दराने शेतकरी खताची खरेदी करत आहेत. (वार्ताहर)पंधरा दिवसांच्या टप्प्यांनी दरवाढ सुरू दरवाढीची कारणे गुलदस्त्यात शासकीय यंत्रणा चिडीचूप विक्रेत्यांकडे खतांची मागणी वाढलीजाब कोणाला विचारायचा? या चिंतेत शेतकरी कृषी खात्याचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष रासायनिक खत आवश्यकशेतकरीवर्गाकडून कुठल्याही पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर शेणखताची मात्रा हंगामानुसार दिली जाते. याशिवाय ऊसाला पाला-पाचोळा न पेटवता तो जमिनीत तसाच ठेवून सेंद्रिय खताची मात्रा दिली जाते. परंतु केवळ या खतामुळे जमिनीचा पोत सुधारावा यासाठी शेणखताबरोबरंच रासायनिक खतांचीही मात्रा दिली जाते.